शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

जिद्द आणि योग्य नियोजनामुळे कर्जत मतदारसंघात परिवर्तन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 00:09 IST

महायुतीचा विजय। निकाला वेळी आभाळ फाटल्यागत झाली होती राष्ट्रवादीची परिस्थिती

कर्जत : कर्जत विधानसभा मतदारसंघात महाआघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार सुरेश लाड आणि महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये अत्यंत चुरशीची निवडणूक होईल, अशी भाकिते होत होती; परंतु थोरवे यांनी जिद्द आणि योग्य नियोजनाच्या आधारावर ही निवडणूक सहज जिंकली. या मतदारसंघात अद्याप एकाही उमेदवाराने एक लाख मते मिळविली नाहीत मात्र थोरवे यांनी एक लाखा पेक्षा जास्त मते मिळवून विक्रमच केला आहे; त्यामुळे ते ‘जायंट किलर’ ठरले. ‘आभाळच फाटलेय त्याला ठिगळ कुठे कुठे लावायची’ अशी परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची या मतदारसंघात झाल्याचे निकालावरून स्पष्ट दिसून आले.

मागील निवडणुकीत लाड आणि थोरवे यांच्यामध्ये चुरशीची निवडणूक झाली त्यामध्ये नवख्या असलेल्या महेंद्र थोरवे यांनी उमेदवारी नाकारल्याने शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शेतकरी कामगार पक्षची उमेदवारी मिळविली आणि सर्व नाराज शिवसैनिकांना बरोबर घेत तब्बल ५५ हजार मतांपेक्षा जास्त मते घेऊन आपली ताकद दाखवून दिली होती. त्यावेळी त्यांचा अवघ्या १९०० मतांनी पराभव झाला होता. त्यांनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हनुमंत पिंगळे यांना मोठ्या फरकाने तिसऱ्या क्रमांकावर फेकले. विजया समीप आलेल्या थोरवे यांनी जिद्द सोडली नाही. पुन्हा शिवबंधन बांधून चार सव्वा चार वर्षे शिवसेनेची बांधणी केली. या कालावधीत माथेरान, कर्जत नगरपालिकेत सत्तांतर करून शिवसेनेचे नगराध्यक्ष बसविले. तसेच नेरळ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकविला.

निवडणुकीचे अर्ज दाखल झाल्यानंतर लगेचच नाराज असलेल्या हनुमंत पिंगळे यांनी शिवबंधन तोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले. दोनच दिवसांनी शिवबंधनात अडकलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे स्वगृही परतले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निर्धार मेळाव्याचे आयोजन करून सुरेश लाड यांना पाठिंबा जाहीर केला. महायुतीचे उमेदवार थोरवे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत उद्धव ठाकरेंची अनुपस्थिती आणि शेवटी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी तातडीची पत्रकार परिषद घेऊन केलेली तालुका कार्यकारिणीची बरखास्ती आणि सुरेश लाडांना दिलेला पाठिंबा या साºया मुळे लाडांचे पारडे जड झाल्यासारखे वाटले. या घटनांमुळे महाआघाडी भक्कम झाल्याचे वातावरण तयार झाल्या सारखे वाटले. ‘भाऊ जुना खिलाडी आहे आयत्या वेळी काही करील.’ अशा वल्गना केल्या त्यांचेही दात पडले. तसे पाहिले तर त्यांचेही काही चुकले नाही अनुभवाचे बोल त्यांनी बोलून दाखविले. बेरजेचे गणित कागदावरच राहिले. नेत्यांच्या भूमिकेला कार्यकर्ते किंवा मतदारांनी साथ दिली नाही. हे निकालाअंती चांगलेच समजले.

निवडणुकीच्या मतदानाच्या वेळीसुद्धा बुथवरील परिस्थिती यावरून सुद्धा अनेकांनी अंदाज बांधले; परंतु प्रत्यक्ष मतमोजणीत भलतेच घडले. सर्वांचेच आखाडे चुकले. प्रत्येक मतदान केंद्रावर आघाडी मिळवीत थोरवे यांची विजयाकडे होत असलेली घोडदौड लाड रोखू शकले नाहीत.विजयाची हॅट्ट्रिक हुकलीतब्बल १८ हजार मतांच्या वर मताधिक्य घेऊन महेंद्र थोरवे यांनी विधानसभेत पाऊल ठेवले यात त्यांचे मोठे बंधू माजी उपसभापती मनोहर थोरवे यांचे अथक परिश्रम आहेत. त्यांनी नियोजनाकडे लक्ष घातले. त्यांनी मागील वेळी निसटता पराभव कोणत्या कारणाने झाला याचा अभ्यास करून त्या - त्या भागात संपूर्ण लक्ष केंद्रित करून तेथील मते आपल्याकडे कशी येतील यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्याला महायुतीतील सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भक्कम साथ दिली. स्वत: उमेदवार महेंद्र थोरवे यांनी ‘अभी नही तो कभी नही’ या जिद्दीने निवडणूक रिंगणात उडी घेऊन विजयश्री सहज खेचून आणली आणि मतदार संघातील विजयाची हॅट्ट्रिक न करून देण्याची परंपरा कायम राखली. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांंना आत्मचिंतनाची गरज आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस