शहरं
Join us  
Trending Stories
1
पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच भाजपाने तीन ठिकाणी उधळला गुलाल
2
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
3
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
4
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
5
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
6
सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
7
अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
8
VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी 'संकटमोचक' ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल
9
झटपट, पटापट! स्मार्टफोन, इंटरनेट नसेल तरी नो टेन्शन; 'हा' नंबर डायल, काही सेकंदात UPI पेमेंट
10
“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
11
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
12
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
13
Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
14
'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार?
15
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
16
जिभेचे चोचले की निसर्गाचा चमत्कार? जगातला असा एकमेव बेट, जिथे चक्क माती खातात लोक!
17
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
18
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
19
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
20
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 00:03 IST

अलिबाग-सुडकोली रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत.

- आविष्कार देसाई अलिबाग : तालुक्यातील अलिबाग-सुडकोली रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणचे रस्ते पहिल्याच पावसात वाहून गेले आहेत, त्यामुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असल्याने तब्बल २४ गावांतील सुमारे ३० हजार नागरिकांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागत असल्याने मेटाकुटीला आले आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीलाच रस्ते बनवण्याचे काम हाती घेतल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला पाऊस पडल्यानंतर काम बंद करावे लागले होते. सार्वजनिक विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे रस्त्याची विल्हेवाट लागल्याची नागरिकांची तक्रार आहे. तालुक्यातील ग्रामीण भागांना जोडणाऱ्या बहुतांश रस्त्यांची अशाच प्रकारे दुर्दशा झाल्याने बांधकाम विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.निधी उपलब्ध नसल्याची ओरड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सातत्याने करण्यात येते, त्यामुळे जिल्ह्यातील रस्ते सुस्थितीत करण्यात बांधकाम विभागाला अनेक अडचणी येतात. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नसणे, यंत्रसामग्री नसणे, अशी विविध कारणे त्यांच्याकडून देण्यात येतात, त्यामुळे नागरिकांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागतो. बांधकाम विभागाला निधी प्राप्त झालाच तर तो निधी खर्च करताना पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे या कालावधीत केलेले रस्ते टिकतील का याचा विचार केला जात नसल्याचे अलिबाग-सुडकोली या रस्त्याच्या कामाने दाखवून दिले आहे.अलिबाग-सुडकोली हा रस्ता अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे. येथूनच पुढे हा रस्ता रोहा तालुक्याला जोडण्याचे काम करतो. त्यामुळे या रस्त्याची स्थिती भक्कम आणि प्रवास करण्यायोग्य असलीच पाहिजे. मात्र, गेली काही वर्षे रस्त्यांची नुसतीच डागडुजी केली जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे रस्त्यांवर सातत्याने खड्डे पडत आहेत. खड्डे बुजवतानाही चिखल-मातीचा उपयोग केलाजात असल्याने पावसाच्या एका सरीमध्येच रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरते.अलिबाग-सुडकाली रस्त्याचे काम जून महिन्यात सुरू करण्यात आले. अलिबाग ते बामणगावपर्यंत रस्ता करण्यात आला. नंतर मात्र पावसाने हजेरी लावल्याने बांधकाम विभागाला काम थांबवावे लागले होते. रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने एकतर उशिरा सुरू केले होते. त्यामुळे जून महिन्यात कामाला सुरुवात केल्याने काम पूर्णच होणार नव्हते आणि झालेच असते तर पहिल्याच पावसात केलेले रस्ते आहे तशा अवस्थेतच राहिले असते, असे ग्रामस्थ सचिन भोईर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.पावसाला सुरुवात झाली की यांना रस्त्यांची कामे आठवतात. आताच्या पावसाच्या काही दिवसआधी रस्त्यांची कामे केली जातात, त्यामुळे पावसात रस्ते वाहून जातात. त्यानंतर पुन्हा कामे काढायची आणि कामासाठी येणारा निधी खर्च करून जनतेलाच भुर्दंड बसवायचा, असेच चित्र सध्या पाहायला मिळत असल्याचे ग्रामस्थ सिद्धेश भगत यांनी सांगितले.१५ मे नंतर डांबरीकरणाच्या रस्त्यांची कामे नियमानुसार करता येत नाहीत. येथे तर जून महिन्यातच कामाला कशी सुरुवात केली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.>अलिबाग-सुडकोली टप्प्यातील गावेअलिबाग-बामणगावपर्यंत रस्त्याचे काम झाले आहे. कुंठ्यांची गोठी, वढाव, वेलवली-खानाव, खानाव, उसर, घोटवडे, मल्याण, वावे, चिंचोटी, दिवी-पारंगी, फणसापूर, बाफळे, भोनंग, बोरघर, भिलजी, रामराज, उमटे, महानवाडी फाटा, नवघर, नांगरवाडी, तलवली, भागवाडी, नवखार आणि सुडकोली या गावांचा समावेश होतो.>अलिबाग-सुडकोली रस्त्यावर खड्डे पडले असून यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता आहे.>ग्रामीण भागातून अलिबागला कामासाठी रोजच यावे लागते. वर्षानुवर्षे रस्त्यांची हालत काही सुधारलेली दिसत नाही. खड्ड्यांतून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो, असे उमटे येथील रहिवासी आरती पुनकर यांनी सांगितले. दरम्यान, सार्वजनिक विभागाचे उपअभियंता मधुकर चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.