शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

रायगडमध्ये केंद्रीय पथकाचा ताफा रोखला; काही काळ तणाव :

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 04:42 IST

नागाव, नांदगाव येथे ग्रामस्थांनी वाचला समस्यांचा पाढा

- आविष्कार देसाई अलिबाग : कोकणात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाचा ताफा स्थानिकांनी मंगळवारी रोखला. अलिबाग तालुक्यातील नागाव आणि मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील नागरिकांच्या रोषाला पथकाला सामोरे जावे लागले आहे. आमचे म्हणणे ऐकून घ्या नंतरच पुढे जा, असा पवित्रा त्यांनी घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.मंगळवारी सकाळी १० वाजता अलिबाग-मांडवा जेट्टी येथे रोरो सेवेने आगमन झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात बैठक घेतल्यानंतर ते प्रत्यक्ष पाहणीसाठी निघाले. सुरुवातीला अलिबाग, नागाव येथील पडझड झालेल्या एका खासगी शाळेची पाहणी केली. त्यानंतर पथक चौलकडे जात असताना वाटेत वीजेचे खांब बसवण्याचे काम ग्रामस्थांच्या मदतीने महावितरण करत होते. त्यामुळे रस्ता पूर्णत: बंद झाला होता. त्यावेळी, केंद्रीय पथकाचा ताफा चालला आहे. रस्ता मोकळा करा असे पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधितांना सांगितले. तेंव्हा ग्रामस्थ नाराज झाले. गेले १५ दिवस गावात लाईट नाही, पाणी नाही असे सांगत गोंधळ घातला. तेव्हा प्रांताधिकारी शारदा पोवार यांनी ग्रामस्थांची समजूत काढल्यावर रस्ता मोकळा करण्यात आला. हे पथक नुकसानग्रस्त नारळ, सुपारीसह अन्य फळांच्या बागांची पहाणी न करता परस्पर निघून जात होते. त्यावेळी नांदगावमधील बागायतदारांनी त्यांचा रस्ता रोखला आणि आपल्या व्यथा पथकासमोर मांडल्या.केंद्रीय पथक अलिबाग, नागाव, चौलहून बोर्ली आणि काशिद या भागातील नुकसानीचा आढावा घेऊन नांदगावमार्गे मुरुड शहराकडे रवाना होणार होते. नांदगावमधील केवळ बागायतींची पहाणी ते करणार होते; परंतु सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे या पथकातील सदस्यांना नियोजित स्थळी वेळेत पोचता आले नाही. त्यामुळे आधीच वाट पाहून कंटाळलेल्या बागायतदारांना डावलून मुरुडक डे रवाना होणाºया या पथकाला नांदगावच्या बागायतदारांनी रस्त्यातच रोखले आणि आपले म्हणणे ऐकण्यास भाग पाडले. रमाकांत खोत यांच्या बागायती जवळ नांदगावचे उपसरपंच अस्लम हलडे, पंकज दळवी, विशाल चोरघे, श्रद्धा गद्रे, उदय खोत, सतीश देशपांडे, विलास ठोसर, रमेश चौलकर, सचिन खोत आदींनी पथकाच्या गाड्यांसमोर उभे राहून आपल्या नुकसानीचा पाढाच वाचला. कोकणासाठी पाच हजार कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली. ही मदत तातडीने देण्यात यावी असेही त्यांनी या वेळी पथकातील सदस्यांना सांगितले.त्यानंतर हे पथक श्रीवर्धनकडे रवाना झाले. १७ जूनला केंद्रीय पथक महाडहून रत्नागिरीकडे प्रयाण करून दिवसभर तेथील नुकसानीची पाहणी करणार आहे. १८ जून रोजी दापोलीहून सकाळी लवकर निघून ते मांडवा जेट्टी येथून रो-रो सेवेने मुंबईला रवाना होणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.पथकात समाविष्ट अधिकारीकेंद्र सरकारने नेमलेल्या या पथकाचे प्रमुख रमेश कुमार गांता (संयुक्त सचिव) हे आहेत. त्याचबरोबर त्यांच्या पथकामध्ये बी.के.कौल (संचालक, अर्थमंत्रालय, नवी दिल्ली), एन.आर.एल.के.प्रसाद (संचालक, ऊर्जा मंत्रालय, नवी दिल्ली), एस.एस.मोदी (उपसचिव, ग्रामीण विकास, मंत्रालय, नवी दिल्ली), आर.पी.सिंग. (संचालक, कृषी मंत्रालय, नागपूर) आणि अनशुमाली श्रीवास्तव (मुख्य अभियंता, रस्ते, वाहतूक, महामार्ग, मुंबई) यांचा समावेश आहे.