शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमधील सहा उद्योग सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारचाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 03:01 IST

२४ मार्च २०२० रोजीच्या पत्रान्वये त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना तसे आदेश दिले. यामुळे रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगड जिल्ह्यातील सहा उद्योग सुरू ठेवण्याला परवानगी दिली.

- आविष्कार देसाईअलिबाग : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्यातील सर्व सरकारे विविध उपाय योजना करत आहेत. त्यानुसार काही राज्यांमध्ये बंदी आदेश लागू करण्यात आल्याने सर्वत्रच कारभार ठप्प झाला आहे. मात्र स्टील उद्योग, सिमेंट उद्योगांच्या उत्पादन, पुरवठा आणि वितरण करण्याला केंद्र सरकारच्याच इस्पात मंत्रालयाचे सचिव बिनय कुमार यांनी सूट दिली आहे.२४ मार्च २०२० रोजीच्या पत्रान्वये त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना तसे आदेश दिले. यामुळे रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगड जिल्ह्यातील सहा उद्योग सुरू ठेवण्याला परवानगी दिली. केंद्र सरकारने एका ठरावीक उद्योगाच्याच बाजूने का निर्णय घेतला याबाबत मात्र उलटसुलट चर्चा आहे. राज्य सरकारने जमावबंदीचे आदेश जारी केल्यानंतर रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी सहा कंपन्यांना त्यातून सूट दिली आहे. यातील विशेष बाब म्हणजे राज्यातील सत्तेमध्ये असणाºया तीन आमदारांनी कंपनी बंद ठेवावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयावरुन चांगलीच टीकेची झोड उठली आहे. मात्र, सरकारच्या नियमानुसारच या कंपन्यांना परवानगी देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.राज्यभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. रेल्वे, एसटी, विमानसेवा, जलवाहतूक त्याचप्रमाणे काही ठिकाणी सीमाही सील करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी गर्दी करू नये यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. जे बाहेर पडतात त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे, तसेच पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसादही खावा लागत आहे. तर दुसरीकडे मोठ्या संख्येने गर्दी होणाºया कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जेएसडब्ल्यू डोलवी-पेण, जेएसडब्ल्यू डोलवी सिमेंट कंपनी-पेण, जेएसडब्ल्यू साळाव, रिलायन्स नागोठणे, रिलायन्स -पाताळगंगा आणि टेक्नोव्हा इमेजिंग-तळोजा अशी या सहा कंपन्यांची नावे आहेत. या कंपन्यांमध्ये हजारोंच्या संख्येने हे कामगार काम करत असल्याने या कंपन्या बंद ठेवण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.सोशल मीडियावर टीकेची झोडकेंद्र सरकारच्या इस्पात मंत्रालयाचे सचिव बिनय कुमार यांनी २४ मार्च २०२० रोजी राज्यातील सर्व मुख्य सचिवांना हे पत्र लिहले आहे. या कंपन्या बंद ठेवल्यास मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याने या कंपन्यांना यातून वगळण्यात आले. त्याचाच आधार घेत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सहा कंपन्यांना उत्पादन, पुरवठा व वितरणला परवानगी दिली. मात्र, यामुळे संपूर्ण कंपनीलाच कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकरता येणार नाही. त्यामुळे या निर्णयावर सोशल मीडियावर टीकेची झोड उठवण्यात आली.

टॅग्स :Raigadरायगड