शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

संघराज्याच्या संकल्पनेला केंद्र सरकारकडून तडा - सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 00:43 IST

जोरदार टीका : अलिबागमध्ये घेतली पत्रकार परिषद

रायगड : केंद्र सरकारने पावसाळी अधिवेशनामध्ये विविध विधेयके बहुमतांच्या जोरावर पारीत केली आहेत. अशा विधेयकांमुळे केंद्र सरकार राज्य सरकारांच्या अधिकारावर गदा आणत आहे. त्यामुळे घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील मूळ संघराज्याची संकल्पना धुळीत मिळवली जात आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी केली.

निसर्ग चक्रीवादळात पोल्ट्री व्यावसायिकांच्या प्रश्नांबाबत आढावा घेण्यासाठी ते अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कृषी विधेयक, कामगार विधयेक, पोर्ट संबंधीची अशी विविध विधेयके केंद्र सरकारने बहुमतांच्या जोरावर पारीत केली आहेत. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या या भूमिकेला प्रखर विरोध केला आहे. पोर्टच्या विधेयकामुळे पोर्टचे खासगीकरण करण्यात येणार आहे, तसेच विविध राज्यांत असणाºया या पोर्टच्या परिसरातील जमिनींचे झोन बदलून राज्य सरकारच्या पूर्वपरनावगी, शिवाय केंद्र सरकार जमिनींचा ताबा घेणार आहे. त्यामुळे घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघराज्याच्या संकल्पनेलाच तडा जाणार आहे.राज्य सरकारच्या अधिकारावर गदा आणून केंद्र सरकारची मनमानी होणार असल्याने, त्याला सर्वच विरोधकांनी कडाडून विरोध केला असल्याचे, खासदार तटकरे यांनी सांगितले.

सरकारने शेतकरी, कामगार यांच्या विरोधात आणणलेल्या विधयेकांविरोधात राज्यात असंतोष आहे. या प्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून जन आंदोलन छेडणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. मच्छीमारी बंदरांचा विकास व्हावा, यासाठी मुरुड तालुक्यातील खोरा बंदर, श्रीवर्धन तालुक्यातील जीवना बंदर आणि दापोली तालुक्यातील हर्णे बंदरांचा विकास सागरमाला योजनेंतर्गत करावा, अशी मागणी संबंधित विभागाच्या केंद्रीय मंत्र्यांकडे केली आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी तातडीने द्यावा, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.महाड येथे कायमस्वरूपी एनडीआरएफचा कॅम्प द्यावाकांदा निर्यातीवरील बंदी उठवून उरण तालुक्यातील जेएनपीटी बंदरातून लवकरच ती सुरू करून शेतकऱ्यांना संरक्षण द्यावे, राज्याचा जीएसटीचा परतावा तातडीने द्यावा, महाड येथे कायमस्वरूपी एनडीआरएफचा कॅम्प द्यावा, मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यासाठी निधी उपलब्ध करावा, एलआयसीचे खासगीकरण करू नये, कुलाबा किल्ल्याच्या डागडुजीसाठी निधी द्यावा, अशा मागण्या केंद्र सरकारकडे केल्याचे खासदार तटकरे यांनी सांगितले.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेRaigadरायगड