शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

संघराज्याच्या संकल्पनेला केंद्र सरकारकडून तडा - सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 00:43 IST

जोरदार टीका : अलिबागमध्ये घेतली पत्रकार परिषद

रायगड : केंद्र सरकारने पावसाळी अधिवेशनामध्ये विविध विधेयके बहुमतांच्या जोरावर पारीत केली आहेत. अशा विधेयकांमुळे केंद्र सरकार राज्य सरकारांच्या अधिकारावर गदा आणत आहे. त्यामुळे घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील मूळ संघराज्याची संकल्पना धुळीत मिळवली जात आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी केली.

निसर्ग चक्रीवादळात पोल्ट्री व्यावसायिकांच्या प्रश्नांबाबत आढावा घेण्यासाठी ते अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कृषी विधेयक, कामगार विधयेक, पोर्ट संबंधीची अशी विविध विधेयके केंद्र सरकारने बहुमतांच्या जोरावर पारीत केली आहेत. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या या भूमिकेला प्रखर विरोध केला आहे. पोर्टच्या विधेयकामुळे पोर्टचे खासगीकरण करण्यात येणार आहे, तसेच विविध राज्यांत असणाºया या पोर्टच्या परिसरातील जमिनींचे झोन बदलून राज्य सरकारच्या पूर्वपरनावगी, शिवाय केंद्र सरकार जमिनींचा ताबा घेणार आहे. त्यामुळे घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघराज्याच्या संकल्पनेलाच तडा जाणार आहे.राज्य सरकारच्या अधिकारावर गदा आणून केंद्र सरकारची मनमानी होणार असल्याने, त्याला सर्वच विरोधकांनी कडाडून विरोध केला असल्याचे, खासदार तटकरे यांनी सांगितले.

सरकारने शेतकरी, कामगार यांच्या विरोधात आणणलेल्या विधयेकांविरोधात राज्यात असंतोष आहे. या प्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून जन आंदोलन छेडणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. मच्छीमारी बंदरांचा विकास व्हावा, यासाठी मुरुड तालुक्यातील खोरा बंदर, श्रीवर्धन तालुक्यातील जीवना बंदर आणि दापोली तालुक्यातील हर्णे बंदरांचा विकास सागरमाला योजनेंतर्गत करावा, अशी मागणी संबंधित विभागाच्या केंद्रीय मंत्र्यांकडे केली आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी तातडीने द्यावा, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.महाड येथे कायमस्वरूपी एनडीआरएफचा कॅम्प द्यावाकांदा निर्यातीवरील बंदी उठवून उरण तालुक्यातील जेएनपीटी बंदरातून लवकरच ती सुरू करून शेतकऱ्यांना संरक्षण द्यावे, राज्याचा जीएसटीचा परतावा तातडीने द्यावा, महाड येथे कायमस्वरूपी एनडीआरएफचा कॅम्प द्यावा, मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यासाठी निधी उपलब्ध करावा, एलआयसीचे खासगीकरण करू नये, कुलाबा किल्ल्याच्या डागडुजीसाठी निधी द्यावा, अशा मागण्या केंद्र सरकारकडे केल्याचे खासदार तटकरे यांनी सांगितले.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेRaigadरायगड