शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

संघराज्याच्या संकल्पनेला केंद्र सरकारकडून तडा - सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 00:43 IST

जोरदार टीका : अलिबागमध्ये घेतली पत्रकार परिषद

रायगड : केंद्र सरकारने पावसाळी अधिवेशनामध्ये विविध विधेयके बहुमतांच्या जोरावर पारीत केली आहेत. अशा विधेयकांमुळे केंद्र सरकार राज्य सरकारांच्या अधिकारावर गदा आणत आहे. त्यामुळे घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील मूळ संघराज्याची संकल्पना धुळीत मिळवली जात आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी केली.

निसर्ग चक्रीवादळात पोल्ट्री व्यावसायिकांच्या प्रश्नांबाबत आढावा घेण्यासाठी ते अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कृषी विधेयक, कामगार विधयेक, पोर्ट संबंधीची अशी विविध विधेयके केंद्र सरकारने बहुमतांच्या जोरावर पारीत केली आहेत. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या या भूमिकेला प्रखर विरोध केला आहे. पोर्टच्या विधेयकामुळे पोर्टचे खासगीकरण करण्यात येणार आहे, तसेच विविध राज्यांत असणाºया या पोर्टच्या परिसरातील जमिनींचे झोन बदलून राज्य सरकारच्या पूर्वपरनावगी, शिवाय केंद्र सरकार जमिनींचा ताबा घेणार आहे. त्यामुळे घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघराज्याच्या संकल्पनेलाच तडा जाणार आहे.राज्य सरकारच्या अधिकारावर गदा आणून केंद्र सरकारची मनमानी होणार असल्याने, त्याला सर्वच विरोधकांनी कडाडून विरोध केला असल्याचे, खासदार तटकरे यांनी सांगितले.

सरकारने शेतकरी, कामगार यांच्या विरोधात आणणलेल्या विधयेकांविरोधात राज्यात असंतोष आहे. या प्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून जन आंदोलन छेडणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. मच्छीमारी बंदरांचा विकास व्हावा, यासाठी मुरुड तालुक्यातील खोरा बंदर, श्रीवर्धन तालुक्यातील जीवना बंदर आणि दापोली तालुक्यातील हर्णे बंदरांचा विकास सागरमाला योजनेंतर्गत करावा, अशी मागणी संबंधित विभागाच्या केंद्रीय मंत्र्यांकडे केली आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी तातडीने द्यावा, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.महाड येथे कायमस्वरूपी एनडीआरएफचा कॅम्प द्यावाकांदा निर्यातीवरील बंदी उठवून उरण तालुक्यातील जेएनपीटी बंदरातून लवकरच ती सुरू करून शेतकऱ्यांना संरक्षण द्यावे, राज्याचा जीएसटीचा परतावा तातडीने द्यावा, महाड येथे कायमस्वरूपी एनडीआरएफचा कॅम्प द्यावा, मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यासाठी निधी उपलब्ध करावा, एलआयसीचे खासगीकरण करू नये, कुलाबा किल्ल्याच्या डागडुजीसाठी निधी द्यावा, अशा मागण्या केंद्र सरकारकडे केल्याचे खासदार तटकरे यांनी सांगितले.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेRaigadरायगड