शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

महामार्गावर १६ ठिकाणी सीसीटीव्ही, गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 01:32 IST

या मार्गावर महत्त्वाच्या अशा १६ ठिकाणांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत तर २५ पोलीस अधिकारी व सुमारे २१७ पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्तही लावण्यात आला आहे.

निखिल म्हात्रेअलिबाग : गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने सध्या चाकरमानी कोकणात जाण्यास सुरुवात झाली आहे. गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी रायगड पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, या मार्गावर महत्त्वाच्या अशा १६ ठिकाणांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत तर २५ पोलीस अधिकारी व सुमारे २१७ पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्तही लावण्यात आला आहे.गणेशोत्सव हा कोकणवासीयांचा महत्त्वाचा सण मानला जातो. यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथून अनेक चाकरमानी हे कोकणातील आपल्या घरी जात असतात. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर होणारी वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सुमारे १४५ किलोमीटरच्या मार्गावर २१७ पोलीस कर्मचारी आणि २५ अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. तर, रायगड जिल्ह्यातील या मार्गावरील १६ ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले असून यामुळे वाहतूक नियंत्रणासाठी मदत होणार आहे. तर मुंबई-गोवा हायवेवरील रहदारीची महत्त्वाची ठिकाणे असलेल्या खारपाडा, हमरापूर, पेण, वडखळसमवेत महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस चौक्यांसह, अ‍ॅम्ब्युलन्स आणि क्रेनचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे.मुंबईसह इतर ठिकाणांहून प्रवास करणाºया गणेशभक्तांचा प्रवास सुखकर करण्यासाठी तसेच महत्त्वाच्या बाजारपेठांवर नजर ठेवण्यासाठी पोलीस विभागामार्फत पेण तालुक्यातील पेण - खोपोली बायपास ४, रामवाडी चौकी ३, वडखळ ३ असे पेण तालुक्यात१०, माणगाव तालुक्यातील इंदापूर स्टॅण्डवर १, महाड शहरातील नातेखिंड मदत केंद्रात ३, विसावा हॉटेल परिसरात १ तर पाली येथे ४ अशा एकूण १६ ठिकाणी हे सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.>रायगडमधील नियोजनसीसीटीव्ही १६पोलीस उपविभागीय अधिकारी 0६पोलीस निरीक्षक 0६साहाय्यक पोलीस निरीक्षक/साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक १३वाहतूक पोलीस कर्मचारी,पोलीस कर्मचारी २१७मदत केंद्रे 0९वॉकीटॉकी २०क्रेन 0९रु ग्णवाहिका 0९>रायगड जिल्ह्यात २८७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. १ लाख २३९ खाजगी गणपती आहेत तर १३ हजार ३७२ ठिकाणी गौरी स्थापना होते. या काळात होम गार्ड्स व राज्य राखीव दलाची मदत घेतली जाणार आहे.