शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात प्रचार शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 23:05 IST

उमेदवारांच्या पायाला लागली भिंगरी : प्रचारातील शेवटच्या रविवारी मतदार भेटीवर दिला जोर

- आविष्कार देसाईअलिबाग : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता फक्त आठ दिवस उरले आहेत, तर प्रचाराला फक्त सहा दिवसांचा अवधी शिल्लक आहे. आज प्रचारातील शेवटचा रविवार असल्याने जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारांचा चांगलाच धुरळा उडवला आहे. प्रमुख नेत्यांच्या सभांबरोबरच कॉर्नर सभा, मतदारांच्या गाठीभेटी, गावबैठका यावर प्रामुख्याने उमेदवारांसह त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चांगलेच रान पेटवले आहे. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत पायाला भिंगरी लावल्यासारखे उमेदवार आपापला मतदारसंघ पालथा घालत आहेत. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असल्याचे दिसते.

सात विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने आघाडी विरोधात युती अशीच लढत पाहावयास मिळत आहे. अपवाद फक्त उरण, अलिबाग आणि श्रीवर्धन मतदारसंघाचा आहे. उरणमध्ये शिवसेनेचे मनोहर भोईर यांच्या विरोधात भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी यांनी आव्हान उभे केले आहे. तर अलिबागमध्ये काँग्रेसच्या उमेदवार अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर यांच्या विरोधात त्यांचे दीर राजेंद्र ठाकूर यांनी बंडखोरी केली आहे, तसेच श्रीवर्धन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांना काँग्रेसचे ज्ञानदेव पवार, दानेश लांबे, मोईझ शेख यांनी आव्हान दिले आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या युतीत फूट पडली आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत बिघाडी झाली आहे. प्र ितस्पर्धी वाढल्याने या उमेदवारांना विरोधकांबरोबर लढताना आपल्याच स्वकीयांचेही व्यवस्थापन करावे लागणार असल्याने त्यांची क्रयशक्ती अधिक खर्च होत असल्याचे दिसून येते.विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने आता रंगत चढू लागली आहे.

प्रचंड उन्हातपायपीटच्सकाळी ७ वाजल्यापासून उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे पायाला भिंगरी लावल्यासारखे संपूर्ण मतदारसंघात मतदारांच्या भेटी घेत होते.च्प्रचंड उन्हाचा तडाखा असतानासुद्धा त्यांनी पायपीट केली.च्वेळ कमी असल्याने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवार करत असल्याचे चित्र आहे.स्थानिक पातळीवरील नेत्यांवर धुरा१नवी मुंबईमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे १६ आॅक्टोबर रोजी येणार आहेत. काहीच दिवसांपूर्वी पेण येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा पार पडली होती.२राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. हे दिग्गज नेते सोडले तर विविध राजकीय पक्षांचे स्थानिक पातळीवरील नेते प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.३१९ आॅक्टोबरला प्रचाराच्या तोफा थंड होणार असल्याने प्रचारातील आजचा शेवटचा रविवार असल्याने सर्वच राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी मतदारांना सुट्टीच्या दिवशी गाठण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यांची भेट घेऊन निवडून देण्यासाठी आम्हालाच मत द्या, अशी विनंती मतदारांना केली.

टॅग्स :raigad-pcरायगड