शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जेएनपीएतून एप्रिल २०२५ पर्यंत एक कोटीहून अधिक कंटेनर मालाची हाताळणी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 19:43 IST

वाढवणं बंदराच्या विकासासाठी ४० हजार कोटींच्या गुंतवणूकीच्या करारावर स्वाक्षऱ्या 

मधुकर ठाकूर 

उरण : येत्या एप्रिल २०२५ पर्यत भारत मुंबई कंटेनर टर्मिनल या जेएनपीए अंतर्गत असलेल्या चौथ्या खासगी बंदराच्या पुर्णत्वानंतर वार्षिक कंटेनर मालाच्या हाताळणीची क्षमता एक कोटी चार लाखांपर्यंत पोहचणार आहे.त्यामुळे जेएनपीएचे भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणून त्याचे स्थान मजबूत होईल असा विश्वास जेएनपीएचे प्रभारी अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी ३५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने व्यक्त केला आहे.यावेळी वाढवण येथील ग्रीनफील्ड बंदराच्या विकासासाठी जेएनपीएने सिंगापूर पोर्ट, सीएमएसीजीएम यांच्याबरोबर ४० हजार कोटींच्या दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या. 

देशातील सर्वात मोठे आणि युवा पोर्ट म्हणून ओळखला जाणाऱ्या जेएनपीएने ३५ वर्षात पदार्पण केले आहे.३५ व्या वर्धापनाचे औचित्य साधत जेएनपीएने महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी राज्याचे बंदरे, वाहतूक विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, मुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा, जेएनपीए बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेष वाघ, विविध शिपिंग लाईन्स, भागीदार आदी उपस्थित होते.

जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी हे भारतातील पहिले १०० टक्के जमीनदार आणि प्रमुख कंटेनर पोर्ट बनले आहे.३५ वर्षांच्या कारकिर्दीतील बंदराच्या प्रगतीचा आलेख आणि "समृद्धी बंदर" या थीमवर आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात राज्यपाल रमेश बैस यांनी प्रशंसा केली. यावेळी जेएनपीएच्या मागील ३५ वर्षातील प्रगती,विकास, वाटचालीचा जेएनपीए बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी आढावा सादर केला. जनेपीएने गेल्या काही वर्षांत सातत्याने दरवर्षी सहा दशलक्ष टीईयुस कंटेनरर्सची हाताळणी करीत आहे. त्याचबरोबर डिजिटलायझेशन, ऑटोमेशन, वचनबद्धता आणि ग्रीन पोर्ट उपक्रमांमध्ये बंदराच्या धोरणात्मक पुढाकाराने उद्योगात नवीन बेंचमार्क स्थापित केले असल्याचेही वाघ यांनी सांगितले.

एप्रिल २०२५ पर्यत भारत मुंबई कंटेनर टर्मिनल या जेएनपीए अंतर्गत असलेल्या चौथ्या खासगी बंदराची वार्षिक कंटेनर मालाच्या हाताळणीची क्षमता एक कोटी चार लाखांपर्यंत पोहचणार आहे.त्यामुळे जेएनपीएचे भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणून त्याचे स्थान मजबूत होईल असा विश्वास जेएनपीएचे प्रभारी अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी ३५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने व्यक्त केला आहे.यावेळी वाढवण येथील ग्रीनफील्ड बंदराच्या विकासासाठी जेएनपीएने सिंगापूर पोर्ट, सीएमएसीजीएम यांच्याबरोबर ४० हजार कोटींच्या दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्याही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जेएनपीए येत्या दोन महिन्यात ३८ एकलव्य मॉडेल शाळा सुसज्ज करण्यासाठी साडेतीन कोटी खर्चून एक हजार संगणक आणि १०० टॅब्लेट देणार असल्याची ग्वाही वाघ यांनी दिली. यावेळी बंदराच्या यशात दिलेल्या मौलिक योगदानाची दखल घेऊन पंचवीस जेएनपीए भागधारक आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आला.

टॅग्स :Raigadरायगडuran-acउरण