शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

गजबजलेले खोरा बंदर पर्यटकांअभावी सुनेसुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 23:59 IST

व्यवसाय ठप्प : किल्ले, धार्मिकस्थळांना परवानगी नसल्याने बंदच

मुरुड : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे लोकांनी बाहेर जाणे टाळले. त्याचा परिणाम पर्यटनस्थळांना बसला आहे. पर्यटक येत नसल्याने सर्व व्यवसाय बंद आहेत. स्वयंरोजगाराला खीळ बसली आहे, परंतु आता ई-पास रद्द केल्यामुळे थोडे-फार पर्यटक बाहेर फिराव्यास येत आहेत, परंतु ऐतिहासिक किल्ले अथवा धार्मिकस्थळांना परवानगी नसल्याने ही ठिकाणे बंदच ठेवण्यात आली आहेत.

मुरुड तालुक्यातील ऐतिहासिक जंजिरा किल्लाही पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे येथील बोट चालक व मालक प्रतीक्षेत आहेत. जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी ३३ शिडाच्या बोटी, त्याचप्रमाणे मशीन बोट या एकाच जागेवर गेल्या मार्च महिन्यापासून बसून आहेत.एके काळी गजबजणारी राजपुरी व खोरा बंदर सुनेसुने झाले असून, या ठिकाणी निरव शांतता दिसून येत आहे. शनिवार-रविवार या दोन्ही जेट्ट्यांवर मोठी गर्दी असायची, परंतु येथे कोणीही फिरकत नसल्याने शांतता पसरली आहे. बोटींची रेलचेल, आॅटोरिक्षा, टांगा स्वारी, शहाळी विक्रेते, सरबत, टोपी व गॉगल विक्रेते दिसेनासे झाले आहेत. फक्त शांतता असून, एके काळी शेकडोंच्या संख्येने असणारी वर्दळ शांत झाली आहे. 

टॅग्स :Raigadरायगड