शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
4
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
5
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
6
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
7
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
8
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
9
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
10
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
11
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
12
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
13
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
14
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
15
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
16
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
17
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
18
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
19
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
20
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?

काळ आला होता पण, वेळ आली नव्हती; बस दरीत कोसळली, नवी मुंबईचे ४५ प्रवासी सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 05:49 IST

सुदैवाने बसमधील सर्वजण सुखरूप बाहेर पडले. बसमध्ये चालकासह ४५ जण होते.

महाड :  नवी मुंबईतील ऐरोली येथून रायगड दर्शनासाठी गेलेल्या शिवभक्तांच्या बसला परतीच्या मार्गावर असताना अपघात झाला. बस एका अवघड वळणार ७० फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने बसमधील सर्वजण सुखरूप बाहेर पडले. बसमध्ये चालकासह ४५ जण होते.

रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रायगडापासून काही अंतरावर असलेल्या कोणझर गाव हद्दीत हा अपघात झाला. घटनास्थळी पोलिस प्रशासनासह रुग्णवाहिका तसेच रेस्क्यू पथक दाखल झाले होते. ऐरोली येथून स्वामी समर्थ ट्रॅव्हलच्या बसने हे सर्वजण रविवारी सकाळी किल्ले रायगडावर आले होते. गड पाहून आल्यावर ते रायगडच्या पायथ्यावरून बसने परत निघाले होते.

महाड तालुक्यातील कोंझर घाटामध्ये एका अवघड वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे बस सुमारे ७० फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले. प्रवाशांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. काहीजण किरकोळ जखमी आहेत. अपघात झाल्याचे समजताच कोंझर गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली.

टॅग्स :Accidentअपघात