शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

उरण परिसरात भुरट्या चोऱ्या,वाढत्या घरफोड्या; चिरनेरमध्ये गावाच्या सुरक्षिततेसाठी युवकांच्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 18:05 IST

उरणच्या ग्रामीण भागात चोऱ्या, घरफोड्यांच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

मधुकर ठाकूर 

उरण : उरणच्या ग्रामीण भागात चोऱ्या, घरफोड्यांच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पोलिसही या वाढत्या प्रकाराला आवर घालण्यात अपयशी ठरत असल्याने गावकऱ्यांनी गावाच्या सुरक्षिततेसाठी चक्क युवकांची रात्रीची गस्ती पथके तयार केली आहेत.

उरण परिसरातील काही गावांमध्ये चोरी, घरफोड्यांच्या वाढत्या प्रकारांमुळे गावकरी त्रस्त झाले आहेत.चिरनेर गावाचाही यामध्ये समावेश आहे. भुरट्या चोऱ्या,घरफोड्यांच्या तक्रारीनंतरही पोलिस बंदोबस्त करण्यात अपयशी ठरले आहेत. परिणामी रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

त्यामुळे स्वतःबरोबर गावाची सुरक्षा स्वतः करण्याची वेळ गावातील नागरिकांवर येऊन ठेपली आहे. चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच सचिन घबाडी आणि ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या सुरक्षिततेसाठी गावातील तरुणांचे रात्रीच्यावेळी गस्त घालण्यासाठी गस्ती पथके तयार केली आहेत.रात्री दहा वाजल्यापासून पहाटे तीन वाजेपर्यंत गावातील नाके, गल्ली बोळात ही तरुणाच्या या पथकांनी गस्त घालत खडा पहारा देण्यास सुरुवात केली आहे.गस्तीचा फायदा झाल्याचे दिसून येत आहे.चिरनेर गावातील प्रमोद ठाकूर यांच्या बंगल्यात चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरांनी घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र घरात असलेल्या त्यांच्या सुरक्षारक्षकांनी आरडाओरडा करताच चोर पळून गेले.

मारुती म्हात्रे, कमलाकर केणी यांच्या घरात देखील चोरी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र घरातील माणसांनी प्रसंगावधान राखून गस्ती पथकाला मोबाईलद्वारे संपर्क केला.चोरट्यांना गस्त घालणाऱ्या युवकांची चाहूल लागताच चोरांनी काढता पाय घेतला. गस्त घालणाऱ्या तरुणांनी चोरांचा पाठलाग केला. मात्र चोरांनी शेतातून आड मार्ग काढून चोर पसार झाले. त्यामुळे चोरांचा हा चोरीचा प्रयत्न असफल ठरला.दहा दिवसांपूर्वी कळंबुसरे गावातील हेमंत नाईक, चंद्रशेखर राऊत, वसंत राऊत तर चिरनेर येथील ठकुबाई ठाकूर यांच्यासह इतर बंद घरातील दरवाजांच्या कड्या -कोयंडे तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्या चांदीचे दागिने, व रोख रकमेवर मोठा डल्ला मारला आहे. तसेच याआधी विंधणे, जासई, चिर्ले, धुतुम, बोकडवीरा, नागाव या सारख्या गावात मोठ्या प्रमाणावर घरफोड्या झाल्या आहेत. 

चोरट्यांकडे धारदार शस्त्र असून, चेहरा कापडांनी झाकून ठेवतात. या सराईत चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत, चिरनेर परिसरात बंद असलेली काही घरे फोडून घरातील किमती ऐवज चोरून नेण्याचा धडाका लावला आहे.वाढत्या चोऱ्यांमुळे  ग्रामस्थ मात्र हैराण झाले आहेत.त्यांच्यात घबराट निर्माण झाल्याने विनाकारण जागावे लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. चोऱ्या, घरफोड्यांच्या घटनांपेक्षाही अफवांचे पीक अधिक असल्याचेही काही ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे.

पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे.खबरदारीची उपाययोजना रात्रीच्या वेळी तरुणांची गस्ती पथके तयार करण्यात आली आहेत.तसेच मुख्य आणि गावातील रस्त्यावरील दुकानदार आणि ज्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत त्या सर्वांना सीसीटीव्ही कॅमेरे रस्त्याच्या दिशेने फिरवून घेण्याची  विनंती केली आहे.त्याचबरोबर काही संशयास्पद हालचाली दिसून आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे. ----भास्कर मोकल सरपंच : चिरनेर ग्रामपंचायत

 चिरनेर गावात ग्रामपंचायतीने बेकायदा फेरीवाल्यांना गावात फिरण्यास सक्त मनाई केली आहे. गावात परप्रांतीय भाडेकरुंचीही डोकेदुखी वाढली आहे. 

 सचिन घबाडीउपसरपंच:  ग्रामपंचायत चिरनेर

घटनांपेक्षाही अफवांचे पीक अधिक आहे.तरीही ग्रामपंचायत ,सरपंच यांच्याशी संपर्क साधून सीसीटीव्ही फुटेज मागविण्यात आले आहे. तसेच पोलिसांची गस्त वाढविली आहे. लवकरच चोरांचा बंदोबस्त केला जाईल.

सतीश निकम,वरिष्ठ पोलीस निरीक्षक-- उरण