शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील पुलांचा खर्च खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 04:17 IST

जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे सायन-पनवेल रस्त्यावर अपघातांना निमंत्रण

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावर प्रतिवर्षी पावसाळ्यात जागोजागी खड्डे पडत आहेत. त्यापैकी सर्वाधिक खड्डे तीन वर्षांपूर्वीच बांधलेल्या पुलांवर पडत असल्याचे दिसून येत आहे, यामुळे अपघातांची मालिका सुरूच असून पुलांच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची कोंडी टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने चार वर्षांपूर्वी सायन-पनवेल मार्गाचे रुंदीकरण केले आहे, यामुळे सदर मार्गावर वाहनांना गती मिळून मुंबई-पुणे दरम्यानचे अंतर कमी होण्यास मदत होईल, असा प्रशासनाचा दावा होता. त्याकरिता सहा ठिकाणी नवे पूलही उभारण्यात आले आहेत. त्यापूर्वी सायन-पनवेल मार्गावर जुई, तुर्भे, नेरुळ, सीबीडी व खारघर या ठिकाणचे पूल होते. त्यात वाशी गाव, सानपाडा जंक्शन, शिरवणे, उरणफाटा, कोपरा व कामोठे या पुलांची भर पडली आहे, यामुळे सायन-पनवेल मार्गावरील सुमारे १६ कि.मी.च्या अंतरावर ११ पूल निर्माण झाले आहेत. त्यापैकी नव्या पुलांसह बहुतांश पुलांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी पुलावरील डांबर व खडी पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेल्याने बांधकामाच्या सळई वर आल्या आहेत, यामुळे मागील चार वर्षांत सायन-पनवेल महामार्गावर उभारण्यात आलेल्या पुलांचा दर्जा तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा, एखाद्या पुलावर भगदाड पडून मोठ्या हानीची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावर सुरू असलेल्या अपघातांच्या मालिकेमुळे वर्षभरात १०० हून अधिक छोटे-मोठे अपघात घडले असून, बहुतांश अपघात पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे झालेले आहेत. त्यात अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत.सायन-पनवेल मार्गासाठी सुमारे १२०० कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करण्यात आलेला आहे. मात्र, मार्गाचा काही भाग वगळता सर्व पूल व उर्वरित रस्त्यावर छोटे-मोठे खड्डे पडल्याचे दिसत आहेत. प्रतिवर्षी पावसाळ्यात त्या ठिकाणचे डांबर वाहून जात असल्याने कामाच्या दर्जावर संशय निर्माण झाला आहे. यावरून अनेकांनी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला धारेवरही धरले आहे. मात्र, त्यानंतर खात्याचे मंत्री व अधिकारी यांनी पाहणीदौरे करूनही प्रत्यक्षात मात्र गैरसोईत कसलाही सुधार झालेला नाही; परंतु वाहनचालकांकडून टोल मात्र नित्य नियमितपणे वसूल केला जात आहे. यामुळे सायन-पनवेल मार्गावरील सुविधेसाठी की पडलेल्या खड्ड्यांचा टोल भरत आहोत, असा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सायन-पनवेल टोलवेज कंपनी वाद सुरू आहेत. हा वाद न्यायालयात गेल्यापासून टोलवेज कंपनीने दुरुस्तीच्या कामासाठी हात वर केले आहेत. त्यामुळे सायन-पनवेल मार्गावरील प्रवाशांना नरकयातना सोसाव्या लागत असतानाही सार्वजनिक बांधकाम खात्याने खासगी कंपनीमार्फत टोलवसुली मात्र सुरूच ठेवलेली आहे.महामार्गावर गैरसोर्इंचे भांडारच्अनेक महिन्यांपासून महामार्गावरील पथदिवे बंद आहेत, यामुळे कोपरा तसेच सानपाडा पुलालगत अनेक अपघात घडले आहेत. उरण फाटा पुलाचा सुरक्षा कठडा तुटून पडलेला असतानाही त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. तर पादचाºयांसाठी बांधलेल्या भुयारी मार्गाच्या नियोजनातील त्रुटींमुळे ते वापरात आलेले नाहीत, यामुळे सायन-पनवेल महामार्ग वाहनचालकांसह पादचाºयांसाठी गैरसोईचा ठरत आहे.पुलाच्या उताराचे खड्डे जीवघेणेच्सानपाडा जंक्शन येथील पुलाच्या मुंबईकडे जाणाºया मार्गावर चढ आणि उतारालाच मोठमोठे खड्डे पडले आहेत. अचानक नजरेस पडणाºया या खड्ड्यांमुळे त्या ठिकाणी एखाद्या दुचाकीस्वाराने ब्रेक दाबल्यास त्याला पाठीमागून येणाºया भरधाव वाहनाची धडक बसण्याची शक्यता आहे. अशाच प्रकारातून शिरवणे पुलावर एका दुचाकीस्वाराला डम्परची धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.खळखट्याकचाही परिणाम नाहीसायन-पनवेल महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघात घडून इब्राहिम खुर्शीद (५८) व सनी विश्वकर्मा (२७) या दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. यामुळे गतमहिन्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी तुर्भेतील पीडब्ल्यूडीच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यानंतरही खात्याच्या मंत्री व अधिकारी यांच्यावर फारसा परिणाम झालेला नसल्याचे दिसून येत आहेत. तर अद्यापही अपघातांची मालिका सुरूच असतानाही राजकीय पक्षांनी बाळगलेले मौन संशय निर्माण करत आहे.

टॅग्स :Potholeखड्डेRaigadरायगड