शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

महामार्गावरील पुलांचा खर्च खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 04:17 IST

जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे सायन-पनवेल रस्त्यावर अपघातांना निमंत्रण

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावर प्रतिवर्षी पावसाळ्यात जागोजागी खड्डे पडत आहेत. त्यापैकी सर्वाधिक खड्डे तीन वर्षांपूर्वीच बांधलेल्या पुलांवर पडत असल्याचे दिसून येत आहे, यामुळे अपघातांची मालिका सुरूच असून पुलांच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची कोंडी टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने चार वर्षांपूर्वी सायन-पनवेल मार्गाचे रुंदीकरण केले आहे, यामुळे सदर मार्गावर वाहनांना गती मिळून मुंबई-पुणे दरम्यानचे अंतर कमी होण्यास मदत होईल, असा प्रशासनाचा दावा होता. त्याकरिता सहा ठिकाणी नवे पूलही उभारण्यात आले आहेत. त्यापूर्वी सायन-पनवेल मार्गावर जुई, तुर्भे, नेरुळ, सीबीडी व खारघर या ठिकाणचे पूल होते. त्यात वाशी गाव, सानपाडा जंक्शन, शिरवणे, उरणफाटा, कोपरा व कामोठे या पुलांची भर पडली आहे, यामुळे सायन-पनवेल मार्गावरील सुमारे १६ कि.मी.च्या अंतरावर ११ पूल निर्माण झाले आहेत. त्यापैकी नव्या पुलांसह बहुतांश पुलांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी पुलावरील डांबर व खडी पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेल्याने बांधकामाच्या सळई वर आल्या आहेत, यामुळे मागील चार वर्षांत सायन-पनवेल महामार्गावर उभारण्यात आलेल्या पुलांचा दर्जा तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा, एखाद्या पुलावर भगदाड पडून मोठ्या हानीची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावर सुरू असलेल्या अपघातांच्या मालिकेमुळे वर्षभरात १०० हून अधिक छोटे-मोठे अपघात घडले असून, बहुतांश अपघात पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे झालेले आहेत. त्यात अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत.सायन-पनवेल मार्गासाठी सुमारे १२०० कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करण्यात आलेला आहे. मात्र, मार्गाचा काही भाग वगळता सर्व पूल व उर्वरित रस्त्यावर छोटे-मोठे खड्डे पडल्याचे दिसत आहेत. प्रतिवर्षी पावसाळ्यात त्या ठिकाणचे डांबर वाहून जात असल्याने कामाच्या दर्जावर संशय निर्माण झाला आहे. यावरून अनेकांनी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला धारेवरही धरले आहे. मात्र, त्यानंतर खात्याचे मंत्री व अधिकारी यांनी पाहणीदौरे करूनही प्रत्यक्षात मात्र गैरसोईत कसलाही सुधार झालेला नाही; परंतु वाहनचालकांकडून टोल मात्र नित्य नियमितपणे वसूल केला जात आहे. यामुळे सायन-पनवेल मार्गावरील सुविधेसाठी की पडलेल्या खड्ड्यांचा टोल भरत आहोत, असा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सायन-पनवेल टोलवेज कंपनी वाद सुरू आहेत. हा वाद न्यायालयात गेल्यापासून टोलवेज कंपनीने दुरुस्तीच्या कामासाठी हात वर केले आहेत. त्यामुळे सायन-पनवेल मार्गावरील प्रवाशांना नरकयातना सोसाव्या लागत असतानाही सार्वजनिक बांधकाम खात्याने खासगी कंपनीमार्फत टोलवसुली मात्र सुरूच ठेवलेली आहे.महामार्गावर गैरसोर्इंचे भांडारच्अनेक महिन्यांपासून महामार्गावरील पथदिवे बंद आहेत, यामुळे कोपरा तसेच सानपाडा पुलालगत अनेक अपघात घडले आहेत. उरण फाटा पुलाचा सुरक्षा कठडा तुटून पडलेला असतानाही त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. तर पादचाºयांसाठी बांधलेल्या भुयारी मार्गाच्या नियोजनातील त्रुटींमुळे ते वापरात आलेले नाहीत, यामुळे सायन-पनवेल महामार्ग वाहनचालकांसह पादचाºयांसाठी गैरसोईचा ठरत आहे.पुलाच्या उताराचे खड्डे जीवघेणेच्सानपाडा जंक्शन येथील पुलाच्या मुंबईकडे जाणाºया मार्गावर चढ आणि उतारालाच मोठमोठे खड्डे पडले आहेत. अचानक नजरेस पडणाºया या खड्ड्यांमुळे त्या ठिकाणी एखाद्या दुचाकीस्वाराने ब्रेक दाबल्यास त्याला पाठीमागून येणाºया भरधाव वाहनाची धडक बसण्याची शक्यता आहे. अशाच प्रकारातून शिरवणे पुलावर एका दुचाकीस्वाराला डम्परची धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.खळखट्याकचाही परिणाम नाहीसायन-पनवेल महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघात घडून इब्राहिम खुर्शीद (५८) व सनी विश्वकर्मा (२७) या दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. यामुळे गतमहिन्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी तुर्भेतील पीडब्ल्यूडीच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यानंतरही खात्याच्या मंत्री व अधिकारी यांच्यावर फारसा परिणाम झालेला नसल्याचे दिसून येत आहेत. तर अद्यापही अपघातांची मालिका सुरूच असतानाही राजकीय पक्षांनी बाळगलेले मौन संशय निर्माण करत आहे.

टॅग्स :Potholeखड्डेRaigadरायगड