शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

टोळ पुलाला वाळू वाहतुकीचा फटका, स्ट्रक्चर आॅडिटचा प्राथमिक अहवाल प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 02:58 IST

दासगाव : सावित्री खाडीत ड्रेझरद्वारे वाळू उत्खननाला परवाना मिळाला आहे. येत्या काही दिवसांतच ड्रेझर खाडीमध्ये वाळू उत्खनन सुरू करतील.

सिकंदर अनवारे दासगाव : सावित्री खाडीत ड्रेझरद्वारे वाळू उत्खननाला परवाना मिळाला आहे. येत्या काही दिवसांतच ड्रेझर खाडीमध्ये वाळू उत्खनन सुरू करतील. परवाना मिळालेल्या बंदरावर यंत्रसामग्री दुरुस्तीचे काम देखील सुरू झाले आहे. वाळू उत्खननाला मिळालेला परवाना व्यावसायिक दृष्ट्या आनंदाची गोष्ट असली तरी वाळू वाहतूक करणारी मोठी वाहने ज्या पुलावरून ये-जा करणार आहेत, तो टोळ पूल गेली अनेक वर्षांपासून धोकादायक स्थितीत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या स्ट्रक्चर आॅडिटच्या प्राथमिक अहवालानुसार या पुलाचा पाया धोकादायक स्थितीत आहे, तर पुलावरून वाहतुकीची क्षमता केवळ २० टन आहे. यामुळे या पुलावर होणाºया वाळू वाहतुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.महाडमधून वाहणारी सावित्री नदी, माणगाव तालुक्यातून येणारी काळ नदी यांच्या संगमापासून पुढे सुरू होणारी सावित्री आणि बाणकोट खाडी यामधील उत्खनन होणाºया वाळूला सर्वाधिक मागणी आहे. काळी दाणेदार वाळू या भागात मिळत असल्याने जिल्हा तसेच मुंबईमधील बांधकाम व्यावसायिकांची महाडमध्ये उत्खनन होणारी वाळू ही पहिली पसंती आहे. गेली १५ वर्षांपासून ड्रेझरद्वारे वाळू उत्खननाला सावित्री खाडीत बंदी होती. हातपाटीद्वारे वाळू उत्खननाला मर्यादा असल्याने वाहतुकीचा प्रश्न गेल्या १० वर्षांत कधीही निर्माण झाला नाही. मात्र मागील महिन्यात महाराष्टÑ शासनाने आणि पर्यावरण विभागाने सावित्री खाडीत ड्रेझरद्वारे वाळू उत्खननाला हिरवा कंदील दिला. दोन व्यावसायिकांना ड्रेझरचे परवानेही दिले. आता ड्रेझर या अजस्त्र मशिनरीद्वारे होणारे वाळू उत्खनन टोळ परिसरात वाहतुकीचा प्रश्न निर्माण करेल, अशी साशंकता स्थानिक ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाली आहे.>खासगी सर्वेअरकडून या पुलाचे आॅडिट करण्यात आले आहे. प्राथमिक अहवालानुसार पुलाची क्षमता २० टन असून या पुलाचा पाया म्हणजेच फाउंडेशन धोकादायक स्थितीत आहे. रेलिंग आणि पुलावरील रस्त्याला दुरुस्तीची गरज आहे. आॅडिटचा परिपूर्ण अहवाल हाती आल्यानंतर दुरुस्तीबाबत विचार करण्यात येईल. पुलाच्या पायथ्याशी झालेल्या वाळू उत्खननामुळे पुलाला हा धोका निर्माण झाला आहे.- संजय पाटील, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग महाडजीव मुठीत धरून पुलावरून प्रवासकाळ नदीवरील या टोळ पुलाचा वापर परिसरातील नागरिक येण्या-जाण्यासाठी नेहमीच करतात. मात्र, माणूस चालत असतो, अगर गाडीवर शेजारून एखादी मोठी गाडी गेल्यावर धरणीकंपाप्रमाणे पूल हादरतो.या हादºयामुळे लोक भयभीत होतात. काही वर्षांपूर्वी पुलाच्या काँक्रीटला मोठमोठे खड्डे आणि होल देखील पडले होते. पंचक्रोशीतील नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर पुलाची डागडुजी झाली असली तरी हा पूल धोकादायक स्थितीत नाही, याबद्दल साशंकता आहे.