शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

टोळ पुलाला वाळू वाहतुकीचा फटका, स्ट्रक्चर आॅडिटचा प्राथमिक अहवाल प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 02:58 IST

दासगाव : सावित्री खाडीत ड्रेझरद्वारे वाळू उत्खननाला परवाना मिळाला आहे. येत्या काही दिवसांतच ड्रेझर खाडीमध्ये वाळू उत्खनन सुरू करतील.

सिकंदर अनवारे दासगाव : सावित्री खाडीत ड्रेझरद्वारे वाळू उत्खननाला परवाना मिळाला आहे. येत्या काही दिवसांतच ड्रेझर खाडीमध्ये वाळू उत्खनन सुरू करतील. परवाना मिळालेल्या बंदरावर यंत्रसामग्री दुरुस्तीचे काम देखील सुरू झाले आहे. वाळू उत्खननाला मिळालेला परवाना व्यावसायिक दृष्ट्या आनंदाची गोष्ट असली तरी वाळू वाहतूक करणारी मोठी वाहने ज्या पुलावरून ये-जा करणार आहेत, तो टोळ पूल गेली अनेक वर्षांपासून धोकादायक स्थितीत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या स्ट्रक्चर आॅडिटच्या प्राथमिक अहवालानुसार या पुलाचा पाया धोकादायक स्थितीत आहे, तर पुलावरून वाहतुकीची क्षमता केवळ २० टन आहे. यामुळे या पुलावर होणाºया वाळू वाहतुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.महाडमधून वाहणारी सावित्री नदी, माणगाव तालुक्यातून येणारी काळ नदी यांच्या संगमापासून पुढे सुरू होणारी सावित्री आणि बाणकोट खाडी यामधील उत्खनन होणाºया वाळूला सर्वाधिक मागणी आहे. काळी दाणेदार वाळू या भागात मिळत असल्याने जिल्हा तसेच मुंबईमधील बांधकाम व्यावसायिकांची महाडमध्ये उत्खनन होणारी वाळू ही पहिली पसंती आहे. गेली १५ वर्षांपासून ड्रेझरद्वारे वाळू उत्खननाला सावित्री खाडीत बंदी होती. हातपाटीद्वारे वाळू उत्खननाला मर्यादा असल्याने वाहतुकीचा प्रश्न गेल्या १० वर्षांत कधीही निर्माण झाला नाही. मात्र मागील महिन्यात महाराष्टÑ शासनाने आणि पर्यावरण विभागाने सावित्री खाडीत ड्रेझरद्वारे वाळू उत्खननाला हिरवा कंदील दिला. दोन व्यावसायिकांना ड्रेझरचे परवानेही दिले. आता ड्रेझर या अजस्त्र मशिनरीद्वारे होणारे वाळू उत्खनन टोळ परिसरात वाहतुकीचा प्रश्न निर्माण करेल, अशी साशंकता स्थानिक ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाली आहे.>खासगी सर्वेअरकडून या पुलाचे आॅडिट करण्यात आले आहे. प्राथमिक अहवालानुसार पुलाची क्षमता २० टन असून या पुलाचा पाया म्हणजेच फाउंडेशन धोकादायक स्थितीत आहे. रेलिंग आणि पुलावरील रस्त्याला दुरुस्तीची गरज आहे. आॅडिटचा परिपूर्ण अहवाल हाती आल्यानंतर दुरुस्तीबाबत विचार करण्यात येईल. पुलाच्या पायथ्याशी झालेल्या वाळू उत्खननामुळे पुलाला हा धोका निर्माण झाला आहे.- संजय पाटील, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग महाडजीव मुठीत धरून पुलावरून प्रवासकाळ नदीवरील या टोळ पुलाचा वापर परिसरातील नागरिक येण्या-जाण्यासाठी नेहमीच करतात. मात्र, माणूस चालत असतो, अगर गाडीवर शेजारून एखादी मोठी गाडी गेल्यावर धरणीकंपाप्रमाणे पूल हादरतो.या हादºयामुळे लोक भयभीत होतात. काही वर्षांपूर्वी पुलाच्या काँक्रीटला मोठमोठे खड्डे आणि होल देखील पडले होते. पंचक्रोशीतील नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर पुलाची डागडुजी झाली असली तरी हा पूल धोकादायक स्थितीत नाही, याबद्दल साशंकता आहे.