शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

किनारी गावांना उधाणाचा तडाखा, घरांचे नुकसान, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 02:57 IST

जोरदार पाऊस आणि समुद्राला आलेल्या उधाणामुळे तब्बल पाच मीटर उंचीच्या लाटा रविवारी उसळल्या.

अलिबाग : जोरदार पाऊस आणि समुद्राला आलेल्या उधाणामुळे तब्बल पाच मीटर उंचीच्या लाटा रविवारी उसळल्या. फेसाळलेल्या लाटांचा थरार पाहण्यासाठी स्थानिकांसह पर्यटकांनीही अलिबागच्या समुद्रकिनारी मोठी गर्दी केली होती. लाटांचा तडाखा एवढा भयंकर होती की, किनाऱ्यावरील संरक्षक बंधारे ओलांडून समुद्राचे पाणी लोकवस्तीत शिरले. किनारी भागामधील गावांतील घरांना त्याचा चांगलाच फटका बसला. समुद्राचे रौद्ररूप पुढील दोन दिवस असेच कायम राहणार असल्याने जिल्हा प्रशासनाने मात्र सतर्कतेचा इशारा दिला आहे.पावसाळ्यात उधाणाच्या लाटा सर्वाधिक उंच असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. दुपारी १२च्या सुमारास समुद्र खवळलेला असल्याने भरतीचा जोर प्रचंड वाढला होता.लाटांनी संरक्षक बंधारा ओलांडल्याने किनारी लोकवस्तीत सर्वत्र पाणीच पाणी झाले. अलिबाग संरक्षक बंधाºयांना असणाºया पायºयांवर बसून बच्चे कंपनीने पावसासह समुद्राच्या लाटांचा मनमुराद आनंद लुटला. दरम्यान, समुद्राचे उधाण पुढील दोन दिवस असेच कायम राहणार असल्याने उंच लाटांचा थरार पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मात्र, तरीही लाटांचे शहारे अंगावर घेण्यासाठी तरुणाई गर्दी करीत आहे.>नऊ सार्वजनिक मालमत्तेचे सुमारे सहा लाख रुपयांचे, तर १६१ खासगी मालमत्तेचे ६९ लाख ४० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. एकूण आर्थिक नुकसान ७५ लाख ४१ हजार रुपये.>महाड येथे घर पडले; गोठ्याला लागलेल्या आगीत दोन बैल जळून खाकमहाड : सोसाट्यांच्या वाºयासह आलेल्या मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातील खुठील हनुमानवाडी येथील बळीराम देऊ जगताप यांचे घर कोसळले, त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तालुक्यातील सव येथील जाधव यांच्या गोठ्याला आग लागल्याने गोठ्यातील दोन बैलांचा मृत्यू झाला. दोन्ही घटनांचे पंचनामा करण्याचे काम तहसीलदार स्तरावरून सुरू आहे.>नुकसानग्रस्तांना८ लाखांची मदतपावसाळा सुरू झाल्यापासून रायगड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत चार व्यक्तींना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यामध्ये तीन जणांचा पुराच्या पाण्यात वाहून, तर एकाचा दगड खाणीमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. पैकी तीन पात्र प्रकरणांमध्ये दोघांना आठ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.सात मोठी दुधाळ जनावरे मरण पावली, तर दोन लहान दुधाळ जनावरे आणि ओढकाम करणाºया दोन मोठ्या जनावरांना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यामध्ये फक्त एकाच प्रकरणामध्ये ३० हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे.पावसाची हजेरीरेवदंडा : विश्रांतीनंतर शनिवारपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. दुपारी भरतीच्या वेळी किनाºयावर लाटा उसळणार असल्याने नागरिकांनी किनारी भागात गर्दी केली होती. कोळीवाड्यात दुपारी नेहमीप्रमाणे व्यवहार दिसत होते. कुठेही नुकसान झालेले नाही.