शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद BJP कडे ठेवले, २० वर्षांनंतर गृह खाते सोडले
2
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
3
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
4
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
5
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
6
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
7
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
8
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
9
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
10
"बँक खात्यात ५ लाख आले, तरीही म्हणाला आणखी पैसे लागतील"; डॉ. आदिलच्या whatsApp चॅटमध्ये काय काय?
11
केरळ, यूपीसह अनेक राज्यात SIR ला आव्हान; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मागितले उत्तर...
12
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
13
Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!
14
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
15
रात्री लाईट ऑन करून झोपण्याची सवय असेल तर आताच बदला, आरोग्याचं होईल मोठं नुकसान
16
IND A vs BAN A 1st Semi Final : १२ चेंडूत ५० धावा! बांगलादेशनं भारतीय संघासमोर ठेवलं मोठं टार्गेट
17
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
18
पाच वर्ष लपूनछपून डेटिंग, मग भरमैदानात प्रपोज... अशी फुलली स्मृती मंधाना-पलाशची Love Story
19
'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा...
20
BSNL ने किंमत न वाढवताही प्लॅन्स केले महाग; 'या' लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी घटवली!
Daily Top 2Weekly Top 5

पोलादपूर विद्युत वितरण विभागाकडे मंडळाचे दुर्लक्ष, विभागीय कार्यालयांची दुरवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 01:16 IST

Poladpur News : पोलादपूर विद्युत वितरण विभागाकरिता ६५ पदे मंजूर असून, पैकी सध्या केवळ २१ पदांवर कर्मचारी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत, तर ४४ पदे ही गेल्या १० वर्षांपेक्षा जास्त काळापासून रिक्त आहेत.

पोलादपूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाच्या पोलादपूर कार्यालयात १० वर्षांपेक्षा जास्त काळापासून रिक्त असणारी पदे भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे नागरिकांकडून केल्या जाणाऱ्या तक्रारींची दखल घेण्याकरिता कर्मचारी व अधिकाऱ्यांना अतिरिक्त वेळात कामे करावी लागत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे .पोलादपूर विद्युत वितरण विभागाकरिता ६५ पदे मंजूर असून, पैकी सध्या केवळ २१ पदांवर कर्मचारी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत, तर ४४ पदे ही गेल्या १० वर्षांपेक्षा जास्त काळापासून रिक्त आहेत. यापैकी ३६ पदे ही तांत्रिक विभागातील म्हणजेच लाइनमन सहायक अभियंता उपअभियंता दर्जाची पदे असल्याचे समजते. सबस्टेशनमध्ये ४ पदे मंजूर असून, पैकी २ पदे रिक्त आहेत, तर कार्यालयातील ८ पैकी ७ पदे रिक्त आहेत.डोंगराळ व दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलादपूरमध्ये एकूण एकाहत्तर गावांतून १९ हजार ग्राहकांना या २१ कर्मचारी अधिकाऱ्यांमार्फत गेल्या १० वर्षांपेक्षा जास्त काळापासून सेवा अविरत अखंडित देण्याचे कार्य करावे लागत आहे. पोलादपूर तालुक्याचे वार्षिक उत्पन्न सुमारे २ कोटी रुपये एवढे आहे, असे असूनही पोलादपूर विभागाच्या कार्यालयांमध्ये असणारी दुरवस्था व विभागीय कार्यालयांमध्येही किमान नसणाऱ्या सुविधा पाहता, मंडळाकडून अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलादपूरकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.विद्युत वितरण विभागाच्या पोलादपूरमधील दुरवस्थेस मंडळाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत असून, या संदर्भात तातडीने कार्यवाही न झाल्यास नागरिकांकडून आंदोलनाचे हत्यार उपसण्यात येणार आहे.  

वरध विभाग तीन दशकांपासून पोलादपूरकडेचगेल्या ४ दशकांपासून महाड तालुक्यातील वरंध विभाग हा पोलादपूर लाच जोडला गेला असल्याने, या भागातील नागरिकांना आपल्या तक्रारींसाठी अथवा बिले भरण्याकरिता मोठा त्रास सहन करावा लागत असून, याबाबत अनेकदा शासनाकडे मागणी करूनही हा विभाग महाडला जोडण्याकरिता विद्युत मंडळाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याबद्दल वरध विभागातील नागरिक आगामी काळात कधीही आंदोलनाचे हत्यार उपसतील, अशी मानसिकता या भागातील विविध गावांतील नागरिकांची आहे. 

टॅग्स :electricityवीजRaigadरायगड