शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
3
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
4
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
5
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
6
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
7
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
8
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
9
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
10
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
11
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
12
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
13
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
14
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
15
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
16
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
17
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
18
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
19
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
20
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका

भाजपने आधी स्वत:चा पक्ष बांधावा: राज ठाकरे, मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत संताप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 06:07 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख करताच अजित पवार भाजपमध्ये गेले. आता ते लपून गाडीत जातात, असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल : अमित ठाकरे एका मार्गावरून जात असताना टोल नाका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्यावर भाजपने रस्ते बांधायला आणि उभारायला शिका, अशी टीका मनसेवर केली होती. या टीकेला बुधवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. भाजपने दुसऱ्यांचे आमदार न फोडता स्वतःचा पक्ष बांधायला शिकावे, असा सल्ला देत भाजपवर टीका केली. पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित निर्धार मेळाव्यात ठाकरे बोलत होते. 

२०२४ पर्यंत मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री सांगतात. मग आताचे काय, माणसे मेली त्याचे काय? गणेशोत्सवात जाताना पुन्हा याच दुरवस्था झालेल्या मार्गांवरून कोकणवासी जातील का, अशी टीका ठाकरेंनी सरकारवर केली. रस्ते व्यवस्थित केले तर पैसे खायला कसे मिळणार, तो सहा महिन्यांत खराब व्हायला पाहिजे. तेव्हाच टेंडर, टक्केवारी, कंत्राट मिळेल हा धंदा सुरूच असून हे कुठे तरी थांबायला हवे. मुंबई - गोवा महामार्गाबाबत गडकरींना विचाराल तर ते सांगतात कंत्राटदार पळून गेला. 

मी भाषण करायला आलो नाही, मी तुम्हाला झेंडा दाखवायला आलो असल्याचे सांगून मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला. चंद्रयान चंद्रावर जाऊन उपयोग काय, तिथे जाऊन खड्डेच बघायचे होते तर ते चंद्रयान महाराष्ट्रात सोडायचे होते, महाराष्ट्रातही खड्डे दिसले असते, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. २००७ सालापासून काँग्रेसनंतर कोणाकोणाचे सरकार आले. मात्र, या खड्ड्यातून जात असताना तेच तेच लोकप्रतिनिधी का निवडता? खोटे आश्वासन दिलेल्या नेत्यांवर विश्वास का ठेवता, असा प्रश्न त्यांनी केला. कोकणवासीयांनी थोड्याशा पैशासाठी आपल्या जमिनी विकू नयेत, असे आवाहनही यावेळी कोकणवासीयांना केले.

२५०० जीव गेले

२००७ साली सुरू झालेला मुंबई गोवा महामार्गाच्या कामावर आजपर्यंत १५ हजार ५६६ कोटी रुपये खर्च झालेत. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आजपर्यंत २५०० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, रस्त्याचे काम अर्धवटच असून जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी करतात तरी काय, असा संतप्त सवाल केला.

आरोप होताच अजित पवार भाजपमध्ये

सध्याच्या राजकारणावरही राज ठाकरेंनी असूड ओढले. राष्ट्रवादीच्या नेत्यांचा ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख करताच अजित पवार भाजपमध्ये गेले. आता ते लपून गाडीत जातात, असा टोला लगावला. मिझोरम, आसाम, मणिपूर, हिमाचल प्रदेश या ठिकाणी जमिनी घेऊन दाखवा. मात्र, महाराष्ट्रात सगळीकडून लोक येत आहेत, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेpanvelपनवेल