शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने आधी स्वत:चा पक्ष बांधावा: राज ठाकरे, मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत संताप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 06:07 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख करताच अजित पवार भाजपमध्ये गेले. आता ते लपून गाडीत जातात, असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल : अमित ठाकरे एका मार्गावरून जात असताना टोल नाका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्यावर भाजपने रस्ते बांधायला आणि उभारायला शिका, अशी टीका मनसेवर केली होती. या टीकेला बुधवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. भाजपने दुसऱ्यांचे आमदार न फोडता स्वतःचा पक्ष बांधायला शिकावे, असा सल्ला देत भाजपवर टीका केली. पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित निर्धार मेळाव्यात ठाकरे बोलत होते. 

२०२४ पर्यंत मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री सांगतात. मग आताचे काय, माणसे मेली त्याचे काय? गणेशोत्सवात जाताना पुन्हा याच दुरवस्था झालेल्या मार्गांवरून कोकणवासी जातील का, अशी टीका ठाकरेंनी सरकारवर केली. रस्ते व्यवस्थित केले तर पैसे खायला कसे मिळणार, तो सहा महिन्यांत खराब व्हायला पाहिजे. तेव्हाच टेंडर, टक्केवारी, कंत्राट मिळेल हा धंदा सुरूच असून हे कुठे तरी थांबायला हवे. मुंबई - गोवा महामार्गाबाबत गडकरींना विचाराल तर ते सांगतात कंत्राटदार पळून गेला. 

मी भाषण करायला आलो नाही, मी तुम्हाला झेंडा दाखवायला आलो असल्याचे सांगून मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला. चंद्रयान चंद्रावर जाऊन उपयोग काय, तिथे जाऊन खड्डेच बघायचे होते तर ते चंद्रयान महाराष्ट्रात सोडायचे होते, महाराष्ट्रातही खड्डे दिसले असते, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. २००७ सालापासून काँग्रेसनंतर कोणाकोणाचे सरकार आले. मात्र, या खड्ड्यातून जात असताना तेच तेच लोकप्रतिनिधी का निवडता? खोटे आश्वासन दिलेल्या नेत्यांवर विश्वास का ठेवता, असा प्रश्न त्यांनी केला. कोकणवासीयांनी थोड्याशा पैशासाठी आपल्या जमिनी विकू नयेत, असे आवाहनही यावेळी कोकणवासीयांना केले.

२५०० जीव गेले

२००७ साली सुरू झालेला मुंबई गोवा महामार्गाच्या कामावर आजपर्यंत १५ हजार ५६६ कोटी रुपये खर्च झालेत. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आजपर्यंत २५०० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, रस्त्याचे काम अर्धवटच असून जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी करतात तरी काय, असा संतप्त सवाल केला.

आरोप होताच अजित पवार भाजपमध्ये

सध्याच्या राजकारणावरही राज ठाकरेंनी असूड ओढले. राष्ट्रवादीच्या नेत्यांचा ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख करताच अजित पवार भाजपमध्ये गेले. आता ते लपून गाडीत जातात, असा टोला लगावला. मिझोरम, आसाम, मणिपूर, हिमाचल प्रदेश या ठिकाणी जमिनी घेऊन दाखवा. मात्र, महाराष्ट्रात सगळीकडून लोक येत आहेत, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेpanvelपनवेल