शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भाजपने आधी स्वत:चा पक्ष बांधावा: राज ठाकरे, मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत संताप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 06:07 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख करताच अजित पवार भाजपमध्ये गेले. आता ते लपून गाडीत जातात, असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल : अमित ठाकरे एका मार्गावरून जात असताना टोल नाका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्यावर भाजपने रस्ते बांधायला आणि उभारायला शिका, अशी टीका मनसेवर केली होती. या टीकेला बुधवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. भाजपने दुसऱ्यांचे आमदार न फोडता स्वतःचा पक्ष बांधायला शिकावे, असा सल्ला देत भाजपवर टीका केली. पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित निर्धार मेळाव्यात ठाकरे बोलत होते. 

२०२४ पर्यंत मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री सांगतात. मग आताचे काय, माणसे मेली त्याचे काय? गणेशोत्सवात जाताना पुन्हा याच दुरवस्था झालेल्या मार्गांवरून कोकणवासी जातील का, अशी टीका ठाकरेंनी सरकारवर केली. रस्ते व्यवस्थित केले तर पैसे खायला कसे मिळणार, तो सहा महिन्यांत खराब व्हायला पाहिजे. तेव्हाच टेंडर, टक्केवारी, कंत्राट मिळेल हा धंदा सुरूच असून हे कुठे तरी थांबायला हवे. मुंबई - गोवा महामार्गाबाबत गडकरींना विचाराल तर ते सांगतात कंत्राटदार पळून गेला. 

मी भाषण करायला आलो नाही, मी तुम्हाला झेंडा दाखवायला आलो असल्याचे सांगून मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला. चंद्रयान चंद्रावर जाऊन उपयोग काय, तिथे जाऊन खड्डेच बघायचे होते तर ते चंद्रयान महाराष्ट्रात सोडायचे होते, महाराष्ट्रातही खड्डे दिसले असते, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. २००७ सालापासून काँग्रेसनंतर कोणाकोणाचे सरकार आले. मात्र, या खड्ड्यातून जात असताना तेच तेच लोकप्रतिनिधी का निवडता? खोटे आश्वासन दिलेल्या नेत्यांवर विश्वास का ठेवता, असा प्रश्न त्यांनी केला. कोकणवासीयांनी थोड्याशा पैशासाठी आपल्या जमिनी विकू नयेत, असे आवाहनही यावेळी कोकणवासीयांना केले.

२५०० जीव गेले

२००७ साली सुरू झालेला मुंबई गोवा महामार्गाच्या कामावर आजपर्यंत १५ हजार ५६६ कोटी रुपये खर्च झालेत. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आजपर्यंत २५०० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, रस्त्याचे काम अर्धवटच असून जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी करतात तरी काय, असा संतप्त सवाल केला.

आरोप होताच अजित पवार भाजपमध्ये

सध्याच्या राजकारणावरही राज ठाकरेंनी असूड ओढले. राष्ट्रवादीच्या नेत्यांचा ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख करताच अजित पवार भाजपमध्ये गेले. आता ते लपून गाडीत जातात, असा टोला लगावला. मिझोरम, आसाम, मणिपूर, हिमाचल प्रदेश या ठिकाणी जमिनी घेऊन दाखवा. मात्र, महाराष्ट्रात सगळीकडून लोक येत आहेत, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेpanvelपनवेल