शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
5
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
6
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
8
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
9
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
10
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
11
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
12
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
13
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
14
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
15
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
16
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
17
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
18
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
19
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
20
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा

भाजपने आधी स्वत:चा पक्ष बांधावा: राज ठाकरे, मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत संताप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 06:07 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख करताच अजित पवार भाजपमध्ये गेले. आता ते लपून गाडीत जातात, असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल : अमित ठाकरे एका मार्गावरून जात असताना टोल नाका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्यावर भाजपने रस्ते बांधायला आणि उभारायला शिका, अशी टीका मनसेवर केली होती. या टीकेला बुधवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. भाजपने दुसऱ्यांचे आमदार न फोडता स्वतःचा पक्ष बांधायला शिकावे, असा सल्ला देत भाजपवर टीका केली. पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित निर्धार मेळाव्यात ठाकरे बोलत होते. 

२०२४ पर्यंत मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री सांगतात. मग आताचे काय, माणसे मेली त्याचे काय? गणेशोत्सवात जाताना पुन्हा याच दुरवस्था झालेल्या मार्गांवरून कोकणवासी जातील का, अशी टीका ठाकरेंनी सरकारवर केली. रस्ते व्यवस्थित केले तर पैसे खायला कसे मिळणार, तो सहा महिन्यांत खराब व्हायला पाहिजे. तेव्हाच टेंडर, टक्केवारी, कंत्राट मिळेल हा धंदा सुरूच असून हे कुठे तरी थांबायला हवे. मुंबई - गोवा महामार्गाबाबत गडकरींना विचाराल तर ते सांगतात कंत्राटदार पळून गेला. 

मी भाषण करायला आलो नाही, मी तुम्हाला झेंडा दाखवायला आलो असल्याचे सांगून मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला. चंद्रयान चंद्रावर जाऊन उपयोग काय, तिथे जाऊन खड्डेच बघायचे होते तर ते चंद्रयान महाराष्ट्रात सोडायचे होते, महाराष्ट्रातही खड्डे दिसले असते, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. २००७ सालापासून काँग्रेसनंतर कोणाकोणाचे सरकार आले. मात्र, या खड्ड्यातून जात असताना तेच तेच लोकप्रतिनिधी का निवडता? खोटे आश्वासन दिलेल्या नेत्यांवर विश्वास का ठेवता, असा प्रश्न त्यांनी केला. कोकणवासीयांनी थोड्याशा पैशासाठी आपल्या जमिनी विकू नयेत, असे आवाहनही यावेळी कोकणवासीयांना केले.

२५०० जीव गेले

२००७ साली सुरू झालेला मुंबई गोवा महामार्गाच्या कामावर आजपर्यंत १५ हजार ५६६ कोटी रुपये खर्च झालेत. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आजपर्यंत २५०० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, रस्त्याचे काम अर्धवटच असून जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी करतात तरी काय, असा संतप्त सवाल केला.

आरोप होताच अजित पवार भाजपमध्ये

सध्याच्या राजकारणावरही राज ठाकरेंनी असूड ओढले. राष्ट्रवादीच्या नेत्यांचा ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख करताच अजित पवार भाजपमध्ये गेले. आता ते लपून गाडीत जातात, असा टोला लगावला. मिझोरम, आसाम, मणिपूर, हिमाचल प्रदेश या ठिकाणी जमिनी घेऊन दाखवा. मात्र, महाराष्ट्रात सगळीकडून लोक येत आहेत, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेpanvelपनवेल