शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

भाजपा-सेना सरकारने महाराष्ट्राला चुलीत घातले- अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 04:49 IST

केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा-सेना सरकारने महाराष्ट्राला चुलीत घालण्याचे काम केले आहे.

महाड : केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा-सेना सरकारने महाराष्ट्राला चुलीत घालण्याचे काम केले आहे. या सरकारच्या अपयशाविरोधात काँग्रेसने संघर्षाचा अग्नी पेटविला आहे. आता महाराष्ट्रातील जनतेने भाजपा-सेनेचे हे सरकार चुलीत घालण्याचे काम करावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी केले.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या महाड येथील सभेत ते बोलत होते. या सभेला काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकांनी प्रचंड गर्दी केली. आझाद मैदान अपुरे पडल्याने हजारो लोकांना मैदानाबाहेर उभे राहावे लागले.या वेळी चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात टीकास्त्र सोडले. शेतकरी कर्जमाफी असो, महिला सुरक्षा असो, नोटाबंदी असो, जीएसटी, गंगा स्वच्छता असो, या सर्व आघाड्यांवर सरकार फेल झाले आहे. देशातील जनता आता ‘अब की बार बस कर यार’ असेच म्हणते. चाय आणि गाय म्हणणाऱ्यांना आता बाय म्हणायची वेळ आल्याचे ते म्हणाले.या सभेला प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नसीम खान, काँग्रेसचे कोकण विभागाचे निरीक्षक बी. एम. संदीप, खासदार हुसैन दलवाई, आ. सुभाष चव्हाण, आ. भाई जगताप, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माणिक जगताप आदी पदाधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नसिम खान यांनी खोटे बोला आणि रेटून बोला हेच या सरकारचे धोरण असल्याची टिका केली. ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला कोकणाचा प्रदेश या सरकारने विकासापासून वंचित ठेवला आहे. या देशाची घटना बदलण्याचा त्यांचा डाव आहे. हा डाव हाणून पाडायचा आहे, असे आवाहन खान यांनी केले.माजी आमदार माणिक जगताप यांनी शिवसेना आणि भाजपा हे दोन पक्ष म्हणजे दोन बोके आहेत. सत्तेसाठी त्यांचे भांडण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. आज कोकणात कोणत्याही पक्षात असलेला कार्यकर्ता हा मूळचा काँग्रेसचाच आहे. प्रदेश काँग्रेसने आम्हाला साथ द्यावी, संपूर्ण कोकण आम्ही काँग्रेसमय करू, अशी ग्वाही त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना दिली.>‘महिलाच सरकार उलथवतील’आमदार भाई जगताप यांनी भाषणात, काँग्रेस सरकारच्या काळात सिलिंडरचे दर चारशे, साडेचारशे रुपये झाल्यानंतर आंदोलने करणाºया स्मृती इराणी, हेमामालिनी, सुषमा स्वराज आज सिलिंडरचे दर ९६० रुपयांवर गेले असताना गप्प का? असा प्रश्न त्यांनी केला. या महागाईविरोधात आता महिलाच रस्त्यावर उतरल्या असून, त्याच हे सरकार उलथवून टाकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.बुधवारी दुपारी १२च्या सुमारास या जनसंघर्ष यात्रेचे महाडमध्ये आगमन झाले. नांगलवाडी फाटा येथून युवक काँग्रेसच्या ५०० बाइक्सच्या रॅलीत ही यात्रा महाड शहरात आली. त्यानंतर, छत्रपती शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली अर्पण केली.त्यानंतर, ही रॅली शिवाजी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक- दस्तुरी नाका मार्गे चवदार तळ्यावर गेली. त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण