शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
3
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
4
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
5
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
9
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
10
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
11
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
12
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
13
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
14
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
15
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
16
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
17
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
18
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
19
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी: भाजप, काँग्रेसकडून बी फॉर्मचे वाटप; तीन-चार दिवसांत उमेदवारही ठरणार
20
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ

भाजपा-सेना सरकारने महाराष्ट्राला चुलीत घातले- अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 04:49 IST

केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा-सेना सरकारने महाराष्ट्राला चुलीत घालण्याचे काम केले आहे.

महाड : केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा-सेना सरकारने महाराष्ट्राला चुलीत घालण्याचे काम केले आहे. या सरकारच्या अपयशाविरोधात काँग्रेसने संघर्षाचा अग्नी पेटविला आहे. आता महाराष्ट्रातील जनतेने भाजपा-सेनेचे हे सरकार चुलीत घालण्याचे काम करावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी केले.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या महाड येथील सभेत ते बोलत होते. या सभेला काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकांनी प्रचंड गर्दी केली. आझाद मैदान अपुरे पडल्याने हजारो लोकांना मैदानाबाहेर उभे राहावे लागले.या वेळी चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात टीकास्त्र सोडले. शेतकरी कर्जमाफी असो, महिला सुरक्षा असो, नोटाबंदी असो, जीएसटी, गंगा स्वच्छता असो, या सर्व आघाड्यांवर सरकार फेल झाले आहे. देशातील जनता आता ‘अब की बार बस कर यार’ असेच म्हणते. चाय आणि गाय म्हणणाऱ्यांना आता बाय म्हणायची वेळ आल्याचे ते म्हणाले.या सभेला प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नसीम खान, काँग्रेसचे कोकण विभागाचे निरीक्षक बी. एम. संदीप, खासदार हुसैन दलवाई, आ. सुभाष चव्हाण, आ. भाई जगताप, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माणिक जगताप आदी पदाधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नसिम खान यांनी खोटे बोला आणि रेटून बोला हेच या सरकारचे धोरण असल्याची टिका केली. ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला कोकणाचा प्रदेश या सरकारने विकासापासून वंचित ठेवला आहे. या देशाची घटना बदलण्याचा त्यांचा डाव आहे. हा डाव हाणून पाडायचा आहे, असे आवाहन खान यांनी केले.माजी आमदार माणिक जगताप यांनी शिवसेना आणि भाजपा हे दोन पक्ष म्हणजे दोन बोके आहेत. सत्तेसाठी त्यांचे भांडण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. आज कोकणात कोणत्याही पक्षात असलेला कार्यकर्ता हा मूळचा काँग्रेसचाच आहे. प्रदेश काँग्रेसने आम्हाला साथ द्यावी, संपूर्ण कोकण आम्ही काँग्रेसमय करू, अशी ग्वाही त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना दिली.>‘महिलाच सरकार उलथवतील’आमदार भाई जगताप यांनी भाषणात, काँग्रेस सरकारच्या काळात सिलिंडरचे दर चारशे, साडेचारशे रुपये झाल्यानंतर आंदोलने करणाºया स्मृती इराणी, हेमामालिनी, सुषमा स्वराज आज सिलिंडरचे दर ९६० रुपयांवर गेले असताना गप्प का? असा प्रश्न त्यांनी केला. या महागाईविरोधात आता महिलाच रस्त्यावर उतरल्या असून, त्याच हे सरकार उलथवून टाकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.बुधवारी दुपारी १२च्या सुमारास या जनसंघर्ष यात्रेचे महाडमध्ये आगमन झाले. नांगलवाडी फाटा येथून युवक काँग्रेसच्या ५०० बाइक्सच्या रॅलीत ही यात्रा महाड शहरात आली. त्यानंतर, छत्रपती शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली अर्पण केली.त्यानंतर, ही रॅली शिवाजी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक- दस्तुरी नाका मार्गे चवदार तळ्यावर गेली. त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण