शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

मुरूडमध्ये मच्छीमारांचे कोट्यवधीचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 23:56 IST

आगरदांडा येथील २० बोटी फु टल्या

संजय करडे।लोकमत न्यूज नेटवर्कमुरुड : तालुक्यातील आगरदांडा येथील समुद्रात वादळ होणार म्हणून राजपुरी येथील लोकांनी आपल्या सहा सिलिंडर असणाऱ्या मोठ्या बोटी आगरदांडा येथील बंदरात शाकारून ठेवल्या होत्या; परंतु वादळी वाºयाने येथील २० बोटींचे मोठे नुकसान केले आहे. वाºयाच्या प्रचंड वेगामुळे येथील मोठ्या बोटी एकमेकांवर आदळून फुटल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. एक बोट नवीन उभरणीसाठी किमान ३५ लाखांचा खर्च येत असतो. अशा वादळामुळे मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. २० बोटी फुटल्यामुळे मच्छीमारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

मुरूड शहरातील मासळी मार्केटच्या मागे मासळी विक्रीसाठी लिलाव करण्यासाठी मोठ्या पत्र्याच्या शेडची उभारणी करण्यात आली होती; परंतु या वादळात ती शेड भुईसपाट झाली आहे. चार वर्षांपूर्वीच ही शेड सुमारे साडेसात लाख रुपये खर्च करून बांधण्यात आली होती; परंतु या वादळात ती पडल्याने मोठे नुकसान कोळी समाजाला सहन करावे लागले आहे.

याबाबत अधिक माहिती सांगताना कोळी समाजाचे अध्यक्ष मनोहर बैले यांनी या शेडमधून मासळी विक्री चालत असे. मात्र वादळामुळे शेड पडली असून शासनाने आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आहे.नांदगाव मुरुड सर्वे काशीद येथील मोठमोठ्या सुपारी व नारळाच्या बागा आहेत; परंतु वेगाने वाहणाºया वाºयाने सुपारीचे झाडे मुळासकट पडल्याने येथील बगायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. एक सुपारीचे झाड १० वर्षांनंतर पीक देते; परंतु या वादळाने सदरची झाडे पडल्याने सुपारीच्या पिकात मोठी घट होणार आहे. मुरुड तालुक्यात ९०० हेक्टर जमिनीवर नारळ-सुपारीचे उत्पन्न घेतले जाते. त्यापैकी सर्वच बागायत जमिनीतील सुपारीची झाडे सर्वाधिक पडल्यामुळे सुमारे तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त मोठे नुकसान झाले आहे.याबाबत नांदगाव येथील बागायतदार चिंतामणी जोशी यांनी या नारळ-सुपारीच्या बागा आमच्या पूर्वजांनी विकसित केल्या होत्या. या वादळामुळे सर्व झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे अतीव दु:ख झाले आहे. सर्व बागायतदारांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

एनडीआरएफने केले रस्ते मोकळेमहसूल प्रशासनाने मुरूड तालुक्यातील सुमारे ३,४५० लोकांना धोक्याच्या ठिकाणाहून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले होते. त्यामुळे मुरूड तालुक्यात जीवितहानी झाली नाही; परंतु मालमतेचे प्रचंड नुकसान झाले आहे. रस्त्यावर मोठमोठी वडाची झाडे उन्मळून पडली. ती बाजूला करण्यासाठी एनडीआरएफचे पोलीस निरीक्षक मनोज घोष यांच्या नेतृत्वाखाली २२ जवानांची टीम मुरूडमध्ये आली होती, त्यांनी रस्त्यावर पडलेली मोठमोठी झाडे कटरच्या साह्याने तोडून रस्ता मोकळा करून दिला आहे.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ