शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मुरूडमध्ये मच्छीमारांचे कोट्यवधीचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 23:56 IST

आगरदांडा येथील २० बोटी फु टल्या

संजय करडे।लोकमत न्यूज नेटवर्कमुरुड : तालुक्यातील आगरदांडा येथील समुद्रात वादळ होणार म्हणून राजपुरी येथील लोकांनी आपल्या सहा सिलिंडर असणाऱ्या मोठ्या बोटी आगरदांडा येथील बंदरात शाकारून ठेवल्या होत्या; परंतु वादळी वाºयाने येथील २० बोटींचे मोठे नुकसान केले आहे. वाºयाच्या प्रचंड वेगामुळे येथील मोठ्या बोटी एकमेकांवर आदळून फुटल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. एक बोट नवीन उभरणीसाठी किमान ३५ लाखांचा खर्च येत असतो. अशा वादळामुळे मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. २० बोटी फुटल्यामुळे मच्छीमारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

मुरूड शहरातील मासळी मार्केटच्या मागे मासळी विक्रीसाठी लिलाव करण्यासाठी मोठ्या पत्र्याच्या शेडची उभारणी करण्यात आली होती; परंतु या वादळात ती शेड भुईसपाट झाली आहे. चार वर्षांपूर्वीच ही शेड सुमारे साडेसात लाख रुपये खर्च करून बांधण्यात आली होती; परंतु या वादळात ती पडल्याने मोठे नुकसान कोळी समाजाला सहन करावे लागले आहे.

याबाबत अधिक माहिती सांगताना कोळी समाजाचे अध्यक्ष मनोहर बैले यांनी या शेडमधून मासळी विक्री चालत असे. मात्र वादळामुळे शेड पडली असून शासनाने आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आहे.नांदगाव मुरुड सर्वे काशीद येथील मोठमोठ्या सुपारी व नारळाच्या बागा आहेत; परंतु वेगाने वाहणाºया वाºयाने सुपारीचे झाडे मुळासकट पडल्याने येथील बगायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. एक सुपारीचे झाड १० वर्षांनंतर पीक देते; परंतु या वादळाने सदरची झाडे पडल्याने सुपारीच्या पिकात मोठी घट होणार आहे. मुरुड तालुक्यात ९०० हेक्टर जमिनीवर नारळ-सुपारीचे उत्पन्न घेतले जाते. त्यापैकी सर्वच बागायत जमिनीतील सुपारीची झाडे सर्वाधिक पडल्यामुळे सुमारे तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त मोठे नुकसान झाले आहे.याबाबत नांदगाव येथील बागायतदार चिंतामणी जोशी यांनी या नारळ-सुपारीच्या बागा आमच्या पूर्वजांनी विकसित केल्या होत्या. या वादळामुळे सर्व झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे अतीव दु:ख झाले आहे. सर्व बागायतदारांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

एनडीआरएफने केले रस्ते मोकळेमहसूल प्रशासनाने मुरूड तालुक्यातील सुमारे ३,४५० लोकांना धोक्याच्या ठिकाणाहून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले होते. त्यामुळे मुरूड तालुक्यात जीवितहानी झाली नाही; परंतु मालमतेचे प्रचंड नुकसान झाले आहे. रस्त्यावर मोठमोठी वडाची झाडे उन्मळून पडली. ती बाजूला करण्यासाठी एनडीआरएफचे पोलीस निरीक्षक मनोज घोष यांच्या नेतृत्वाखाली २२ जवानांची टीम मुरूडमध्ये आली होती, त्यांनी रस्त्यावर पडलेली मोठमोठी झाडे कटरच्या साह्याने तोडून रस्ता मोकळा करून दिला आहे.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ