शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

ग्रामीण भागात भातलावणीचा उत्सव न्यारा

By निखिल म्हात्रे | Updated: July 20, 2024 15:07 IST

‘ये रे ये रे माझ्या पाण्या, माझे पोटाची भूक भागाया, लेक जावाय लं पाहण्या आणाया!’

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: यावर्षी बळीराजा आनंदून गेला आहे. भात पिकाचा चांगला उतारा मिळेल, परिवार, लेकीबाळी सुखी होतील, अशी आस त्याला लागली असून, शिवारात तो भातलावणीची कामे करताना आपला आनंदात तो गुणगुणत आहे.

‘ये रे ये रे माझ्या पाण्या, माझे पोटाची भूक भागाया, लेक जावाय लं पाहण्या आणाया!’ या भलरीतून तो आपला आनंद व्यक्त करीत आहे.भातलावणी करताना आदिवासी भागात पारंपरिक लोकगीते गायची परंपरा आहे. याला भलरी असेही म्हणतात. कामे करताना ही गीते त्यांना एकप्रकारे स्फूर्ती व ऊर्जाही देत असते.

सध्या रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी लोकगीतांचे मधुर सूर कानी पडत आहे. यातून घर, कुटुंब आणि लेकराबाळांवरील प्रेम ते व्यक्त करत असतात. माहेराबद्दलचे प्रेम आणि आप्त स्वकीयांबद्दलचा जिव्हाळा अशा अनेक लोकगीतांमधून ते व्यक्त करतात. तरुणवर्गही सध्या भातलावणीत व्यस्त दिसत आहे. मात्र ते पारंपरिक लोक गीतांऐवजी डीजेची गाणी म्हणत काम करीत आहेत.आदिवासी परंपरा

लावणी संपणे हा शेतकरी व मजूरवर्गासाठी आनंदाचा सण असतो. जिथे अन्नाचा बेत उत्तम तिथे मजूर धाव घेत असतात. मात्र, परंपरा न विसरता कथा, चुटकुले व लोकगीतांचे सादरीकरण करण्याची प्रथा ग्रामीण भागात कायम असल्याचे दिसते.शेतकरी व मजुरांच्या घरी अगदी पहाटेपासून उठून घरकामाची आवरासावर करण्यासोबतच स्वयंपाक करणे, दुपारची व्यवस्था करत डबा भरणे अशी कसरत महिला मजुरांना करावी लागते. पावसापासून बचाव करण्यासाठी प्लास्टिकची खोळ सोबत न्यावी लागते. - अनिता चवरकर, शेतकरीगेली अनेक वर्षे आम्ही भातलावणी करीत आहोत. भातलावणीला बदली पद्धत असते. एकमेकास साहाय्य करू या उक्तीप्रमाणे आम्ही शेत लावणीला एकत्रित येऊन भर पावसात पारंपरिक लोकगीते गात काम करत असतो. - नंदकिशोर म्हात्रे, शेतकरी

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीfarmingशेती