शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
2
राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानवा महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
3
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
4
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
5
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
6
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
7
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
8
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
9
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
10
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
11
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
12
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
13
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
14
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
15
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
16
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
17
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
18
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
19
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
20
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

मुरुडमध्ये अतिवृष्टीमुळे सुपारी उत्पादनाला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 02:38 IST

मुरुड तालुक्यात अतिवृष्टीमुळे बागायत जमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे. ३५५ हेक्टर परिक्षेत्रात सुपारीच्या झाडांची मोठी लागवड केली जाते.

मुरुड जंजिरा : मुरुड तालुक्यात अतिवृष्टीमुळे बागायत जमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे. ३५५ हेक्टर परिक्षेत्रात सुपारीच्या झाडांची मोठी लागवड केली जाते. मुरुड तालुक्यात नांदगाव, आगरदांडा, मुरुड शहर, आंबोली, माजगाव, सर्वे, काशीद, बोर्ली, भोईघर आदी ठिकाणी सुपारीची मोठी लागवड केली जाते. सुपारीचे उत्पादन वर्षातून एकदाच घेता येते; परंतु यंदा मुरुड तालुक्यात ४२२४ पेक्षा जास्त अतिवृष्टी झाल्याने सुपारी उत्पादनाला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.अतिवृष्टीमुळे सुपारीच्या झाडाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले. त्याचप्रमाणे बुरशीची लागण झाल्याने यंदाच्या सुपारी उत्पादानात घट होणार आहे.मुरुड तालुक्यातील बागायत जमिनी फार मोठ्या प्रमाणात असून प्रत्येकाच्या एक एकरपेक्षा जास्त सुपारी व नारळाच्या मोठ्या बागायत जमिनी आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही भारतातील सुपारीला विशेष दर्जा असून चांगली मागणी आहे.यंदा सर्वाधिक पाऊस पडल्याने सुपारीचे उत्पादन कमी प्रमाणात येणार असल्याचे असंख्य बागायतदारांनी सांगितले. जास्त पाऊस हा सुपारीला अनुकूल नसतो. मध्यम स्वरूपाच्या पावसाची गरज योग्य मानली जाते. एकट्या मुरुड तालुक्यात सुपारी उत्पादनाची साडेतीन कोटीची उलाढाल आहे.मुरुड तालुका सहकारी सुपारी खरेदी-विक्री संघामुळे सर्व सदस्यांना चांगला भाव मिळवून देण्याचे उत्तम काम या संस्थेद्वारे केले जाते; परंतु यंदा पावसाचे प्रमाण खूप वाढल्याने सुपारीला मोठी बाधा निर्माण झाली आहे.कोकणातील महत्त्वाच्या अशा सर्वच ठिकाणी अतिवृष्टीही झाल्याने मोठा धोका निर्माण होऊन सुपारी उत्पादनाचे प्रमाण कमी होणार आहे. काही ठिकाणी बुरशी तर काही ठिकाणी सुपारी गळून पडली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून वर्षभरातून येणारे उत्पादन वाया गेल्याने आर्थिक विवंचनेत सापडला आहे. निसर्गाने अवकृपा केल्याने या अस्मानी संकटाला तोंड कसे द्यावे हा मोठा प्रश्न येथे निर्माण झाला आहे.मुरुड तालुक्यातील सुपारीच्या उत्पादनासाठी वर्षभरात खूप मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी शेणखत व असणारी विविध फवारणीसुद्धा करावी लागते. त्यानंतर झाडाची पूर्णवाढ झाल्यावर गर्द पिवळी अशी सुपारीची फळे तयार होतात; परंतु यंदा पावसामुळे काही शेतकऱ्यांनी फवारणी केली होती.पाऊस पडल्याने सर्व असणारे औषध वाया गेले आहे. बुरशीजन्य रोग झाल्याने झाडावरची सर्व सुपारी गळून जात असून सध्या झाडावर कोणतेही फळ दिसत नाही. शासनाकडून नुकसानभरपाई मिळण्याची मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.सुपारीच्या उत्पादनाला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. काही ठिकाणी बुरशी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सुपारीच्या लागवडीसाठी मोठा खर्च होतो, परंतु उत्पादन कमी आल्याने झालेला खर्चसुद्धा सुटणार नाही. त्यामुळे शासनाने सुपारी बागायतदारांना नुकसानभरपाई द्यावी.- सचिन पाटील,बागायतदार, नांदगाव 

टॅग्स :Raigadरायगड