शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

विजेच्या लपंडावामुळे सुधागडवासी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 01:30 IST

पाली महावितरणवर मोर्चा : अधिकाऱ्यांना धरले धारेवर

पाली : तालुक्यातील परळी, पेडली, रासळ, राबगाव, कानसळ, नाडसूर, जांभूळपाडा, सिद्धेश्वर, नांदगाव भागासह आदिवासी वाड्यावर गेली ७ ते८ दिवस विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी गुरुवारी पालीतील वीजवितरण कार्यालयालावर धडक देऊन घेराव घातला व अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. १५ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास रास्ता रोको करणार असल्याचा इशारा या वेळी नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे. तसेच तालुक्यातील वीज ग्राहकांशी उद्धटपणे वागणाºया अधिकाºयांची बदली करण्यात यावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली आहे.

पाली बस स्थानकातून बाजारपेठ मार्गे पाली महावितरण कार्यालयावर निघालेल्या मोर्चात आरपीआय तालुकाध्यक्ष राहुल सोनावणे, सुरेश जाधव, सुधागड बौद्धजन पंचायत अध्यक्ष दीपक पवार, मनसे तालुकाध्यक्ष सुनील साठे, भगवान शिदे, ह.भ.प. महेश पोंगडे, हेमंत गायकवाड आदीसह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी महावितरणचे सहायक उपअभियंत्यांना समस्यांचे निवेदन देण्यात आले. त्या वेळी त्यांच्यासमावेत पाली पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे हे उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून सुधागड तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी वीजवितरणच्या अखत्यारीत असलेली महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण न झाल्याने जनतेला खंडित वीज पुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. येथील वीजवाहिन्या जीर्ण तर खांब धोकादायक झाले आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यावसायिक तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पावसाळ्यात निघणारे सरपटणारे प्राणी, साप, विंचू व कीटक काळोखात दिसत नाहीत. तसेच डासांच्या उपद्रवाने नागरिकांचा जीव व आरोग्य धोक्यात आले आहे.विजेच्या कडकडाटासह पाऊस आल्यास लाइट ट्रिप होते. दिवसा ऊन व पाऊस असे वातावरण असल्याने चीनमातीचे फिडर उन्हामुळे तापतात तर काही वेळानं त्यावर पाऊस पडल्यास हे फिडर तडकल्याने वीजपुरवठा खंडित होतो. सुधागडसाठी एकूण ६७ कर्मचारी संख्या मंजूर आहे सध्या केवळ ३५ कर्मचारी कार्यरत असल्याने कामाचा ताण वाढला आहे. तरीही लवकरात लवकर समस्यांचे निराकरण करण्यात येईल.- संतोष पालवे, सहायक उप अभियंता, पाली महावितरणसुधागड तालुका हा आदिवासीबहुल तालुका आहे. वीजपुरवठा खंडित झाला तर नागरिकांपुढे अनेक समस्या व अडचणी निर्माण होतात. त्यामुळे पावसाळ्यात व येणाºया सणासुदीत वीजपुरवठा कायम सुरळीत राहावा या दृष्टिकोनातून वीजवितरण विभागाने अधिक दक्षता घेऊन योग्य ती उपाययोजना करावी.- रवींद्रनाथ ओव्हाळ,सामाजिक कार्यकर्ते, पाली

टॅग्स :Raigadरायगडelectricityवीज