शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

विजेच्या लपंडावामुळे सुधागडवासी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 01:30 IST

पाली महावितरणवर मोर्चा : अधिकाऱ्यांना धरले धारेवर

पाली : तालुक्यातील परळी, पेडली, रासळ, राबगाव, कानसळ, नाडसूर, जांभूळपाडा, सिद्धेश्वर, नांदगाव भागासह आदिवासी वाड्यावर गेली ७ ते८ दिवस विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी गुरुवारी पालीतील वीजवितरण कार्यालयालावर धडक देऊन घेराव घातला व अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. १५ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास रास्ता रोको करणार असल्याचा इशारा या वेळी नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे. तसेच तालुक्यातील वीज ग्राहकांशी उद्धटपणे वागणाºया अधिकाºयांची बदली करण्यात यावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली आहे.

पाली बस स्थानकातून बाजारपेठ मार्गे पाली महावितरण कार्यालयावर निघालेल्या मोर्चात आरपीआय तालुकाध्यक्ष राहुल सोनावणे, सुरेश जाधव, सुधागड बौद्धजन पंचायत अध्यक्ष दीपक पवार, मनसे तालुकाध्यक्ष सुनील साठे, भगवान शिदे, ह.भ.प. महेश पोंगडे, हेमंत गायकवाड आदीसह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी महावितरणचे सहायक उपअभियंत्यांना समस्यांचे निवेदन देण्यात आले. त्या वेळी त्यांच्यासमावेत पाली पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे हे उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून सुधागड तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी वीजवितरणच्या अखत्यारीत असलेली महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण न झाल्याने जनतेला खंडित वीज पुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. येथील वीजवाहिन्या जीर्ण तर खांब धोकादायक झाले आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यावसायिक तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पावसाळ्यात निघणारे सरपटणारे प्राणी, साप, विंचू व कीटक काळोखात दिसत नाहीत. तसेच डासांच्या उपद्रवाने नागरिकांचा जीव व आरोग्य धोक्यात आले आहे.विजेच्या कडकडाटासह पाऊस आल्यास लाइट ट्रिप होते. दिवसा ऊन व पाऊस असे वातावरण असल्याने चीनमातीचे फिडर उन्हामुळे तापतात तर काही वेळानं त्यावर पाऊस पडल्यास हे फिडर तडकल्याने वीजपुरवठा खंडित होतो. सुधागडसाठी एकूण ६७ कर्मचारी संख्या मंजूर आहे सध्या केवळ ३५ कर्मचारी कार्यरत असल्याने कामाचा ताण वाढला आहे. तरीही लवकरात लवकर समस्यांचे निराकरण करण्यात येईल.- संतोष पालवे, सहायक उप अभियंता, पाली महावितरणसुधागड तालुका हा आदिवासीबहुल तालुका आहे. वीजपुरवठा खंडित झाला तर नागरिकांपुढे अनेक समस्या व अडचणी निर्माण होतात. त्यामुळे पावसाळ्यात व येणाºया सणासुदीत वीजपुरवठा कायम सुरळीत राहावा या दृष्टिकोनातून वीजवितरण विभागाने अधिक दक्षता घेऊन योग्य ती उपाययोजना करावी.- रवींद्रनाथ ओव्हाळ,सामाजिक कार्यकर्ते, पाली

टॅग्स :Raigadरायगडelectricityवीज