शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

विजेच्या लपंडावामुळे सुधागडवासी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 01:30 IST

पाली महावितरणवर मोर्चा : अधिकाऱ्यांना धरले धारेवर

पाली : तालुक्यातील परळी, पेडली, रासळ, राबगाव, कानसळ, नाडसूर, जांभूळपाडा, सिद्धेश्वर, नांदगाव भागासह आदिवासी वाड्यावर गेली ७ ते८ दिवस विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी गुरुवारी पालीतील वीजवितरण कार्यालयालावर धडक देऊन घेराव घातला व अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. १५ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास रास्ता रोको करणार असल्याचा इशारा या वेळी नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे. तसेच तालुक्यातील वीज ग्राहकांशी उद्धटपणे वागणाºया अधिकाºयांची बदली करण्यात यावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली आहे.

पाली बस स्थानकातून बाजारपेठ मार्गे पाली महावितरण कार्यालयावर निघालेल्या मोर्चात आरपीआय तालुकाध्यक्ष राहुल सोनावणे, सुरेश जाधव, सुधागड बौद्धजन पंचायत अध्यक्ष दीपक पवार, मनसे तालुकाध्यक्ष सुनील साठे, भगवान शिदे, ह.भ.प. महेश पोंगडे, हेमंत गायकवाड आदीसह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी महावितरणचे सहायक उपअभियंत्यांना समस्यांचे निवेदन देण्यात आले. त्या वेळी त्यांच्यासमावेत पाली पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे हे उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून सुधागड तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी वीजवितरणच्या अखत्यारीत असलेली महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण न झाल्याने जनतेला खंडित वीज पुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. येथील वीजवाहिन्या जीर्ण तर खांब धोकादायक झाले आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यावसायिक तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पावसाळ्यात निघणारे सरपटणारे प्राणी, साप, विंचू व कीटक काळोखात दिसत नाहीत. तसेच डासांच्या उपद्रवाने नागरिकांचा जीव व आरोग्य धोक्यात आले आहे.विजेच्या कडकडाटासह पाऊस आल्यास लाइट ट्रिप होते. दिवसा ऊन व पाऊस असे वातावरण असल्याने चीनमातीचे फिडर उन्हामुळे तापतात तर काही वेळानं त्यावर पाऊस पडल्यास हे फिडर तडकल्याने वीजपुरवठा खंडित होतो. सुधागडसाठी एकूण ६७ कर्मचारी संख्या मंजूर आहे सध्या केवळ ३५ कर्मचारी कार्यरत असल्याने कामाचा ताण वाढला आहे. तरीही लवकरात लवकर समस्यांचे निराकरण करण्यात येईल.- संतोष पालवे, सहायक उप अभियंता, पाली महावितरणसुधागड तालुका हा आदिवासीबहुल तालुका आहे. वीजपुरवठा खंडित झाला तर नागरिकांपुढे अनेक समस्या व अडचणी निर्माण होतात. त्यामुळे पावसाळ्यात व येणाºया सणासुदीत वीजपुरवठा कायम सुरळीत राहावा या दृष्टिकोनातून वीजवितरण विभागाने अधिक दक्षता घेऊन योग्य ती उपाययोजना करावी.- रवींद्रनाथ ओव्हाळ,सामाजिक कार्यकर्ते, पाली

टॅग्स :Raigadरायगडelectricityवीज