शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

खारेपाटातील नापीक जमिनीचे होणार सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 23:29 IST

दहा दिवसांत आखणार कार्यक्रम : शेतकऱ्यांचे उपोषण यशस्वी

- जयंत धुळप

अलिबाग : खारेपाटातील नापीक जमिनींचे सर्वेक्षण तत्काळ करावे, या मागणीकरिता गुरुवारी श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली मोठे शहापूर, धाकटे शहापूर आणि धेरंड गावांतील सुमारे ६० शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास प्रारंभ केला. यामुळे खारभूमी विभाग खडबडून जागा झाला. खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाच्या पेण येथील कार्यालयातील कार्यकारी अभियंता आर. एस. बदाणे यांनी, अलिबाग तालुक्यातील खारभूमी नापीक (बाधित) क्षेत्राचे संयुक्त सर्वेक्षण करण्याबाबत येत्या दहा दिवसांपर्यंत नियोजन करण्यात येईल, असे लेखी आश्वासन श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांना दिले आहे.

अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील खारभूमी विभागाने नापीक केलेल्या जमिनींचे सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी १८ एप्रिल २०१८ रोजी देऊनदेखील खारभूमी विभागाने आदेशाची अंमलबजावणी करून नापीक जमिनींचे सर्वेक्षण करून अहवाल दिला नाही. दुष्काळ लपवण्यासाठी नापीक जमिनीच्या ऐवजी कांदळवनांनी बाधित व ओसाड असल्याची माहिती खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाने देऊन राज्य सरकारची दिशाभूल केली. या पार्श्वभूमीवर श्रमिक मुक्ती दलाने पाठपुरावा करूनदेखील खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग सर्वेक्षण प्रक्रिया सुरू करीत नव्हते. २२ नोव्हेंबर २०१८ रोजी खारभूमी नापिकी क्षेत्राचे सर्वेक्षण १५ दिवसांत करावे, किमान कार्यक्र म आखावा तसे न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याची नोटीस संघटनेने दिली होती. ५४ दिवसांनंतर देखील कोणताच संवाद खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाने साधला नाही. अखेर शेतकºयांवर उपोषण करण्याची वेळ आल्याचे संघटनेचे पदाधिकारी प्रा. सुनील नाईक यांनी दिली.

जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील १६६ शासकीय खारभूमी योजना व ७ खासगी खारभूमी योजना असून ५३ हजार २४० एकर खारभूमी क्षेत्र आहे; परंतु सात-बारावर खारभूमीची नोंद नसल्याने शासन तसेच सांख्यिकी विभागाकडे खारभूमीचे वेगळे क्षेत्र आहे याची नोंदच नाही. यामुळे सुपीक व नापीक जमिनीची आकडेवारी राज्य सरकारकडे उपलब्ध नसल्याचे राजन भगत यांनी सांगितले.

अलिबाग तालुक्यातील ३७ शासकीय खारभूमी योजनांचे व ७ खासगी खारभूमी योजनांचे मिळून एकूण ९ हजार ८५५ एकर क्षेत्र आहे. त्यातील ३०२४ एकर क्षेत्र १९८५ सालापासून नापीक आहे. गेल्या ३२ वर्षांपासून माणकुले, बहिरीचापाडा, रामकोठा,सोनकोठा, हाशिवरे, कावाडे, देहेनकोनी, मेढेखार खातीवरे या खारभूमी योजनांची देखभाल व दुरुस्ती अंदाजपत्रकेच केली नाही. ३३ टक्क्यांपेक्षा पेरणी कमी झाली तर दुष्काळ जाहीर केला जातो. मात्र, अलिबाग तालुक्यात गेली ३२ वर्षे या खारभूमींच्या उपजाऊ क्षेत्रात पेरणी झालीच नाही तरी दुष्काळ जाहीर झाला नाही आणि शेतकºयांना भरपाई मिळाली नसल्याचे भगत म्हणाले.३२ वर्षांत ४८३ कोटी रु पयांचे आर्थिक नुकसानच्एकरी सरासरी २० क्विंटल भात उत्पादन होऊ शकले नाही, गेल्या ३२ वर्षांत ४८३ कोटी रु पयांचे आर्थिक नुकसान झाले याकडे श्रमिक मुक्ती दलाने सरकारचे लक्ष वेधले तेव्हा ५ डिसेंबर २०१५ रोजी नियोजन समितीच्या बैठकीमध्ये खारभूमी क्षेत्राचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना प्रथम दिल्या. श्रमिक मुक्ती दलाने याचा तांत्रिक अभ्यास करून उपविभागीय अधिकारी, उपविभाग खारभूमी अलिबाग यांच्याकडे नुकसानभरपाईकरिता शेतकºयांचे ५४० अर्ज १६ मे २०१६ रोजी दाखल केले. तर २७ जून २०१७ रोजी खारेपाटातील शेतकºयांना ३० वर्षांची नुकसानभरपाई मिळावी म्हणून मुख्यमंत्र्यांना १०० शेतकºयांनी लेखी पत्रे पाठवली, तरी खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग कार्यवाही करण्याचे नियोजन करीत नव्हता. अखेर उपोषण आंदोलनांती ते जागे झाले आहेत, अशी माहिती शेतकरी प्रतिनिधी राजेंद्र वाघ व एन. जी. पाटील यांनी दिली आहे.‘खारभूमी संरक्षित क्षेत्र’ म्हणून नोंद अनिवार्यच्महाराष्ट्र खार जमिनी विकास अधिनियम १९७९ मधील कलम १२ अन्वये खारभूमी उपजाऊ क्षेत्राच्या सात-बारा सदरी इतर हक्कात ‘खारभूमी संरक्षित क्षेत्र’ म्हणून नोंद करणे अनिवार्य होते. अधिनियमातील कलम ३ अन्वये खारभूमी उपजाऊ क्षेत्रास सिंचनाची अथवा गोड्या पाण्याची तरतूद करणे नमूद आहे.