शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

बाप्पाला द्यावा लागणार दारातूनच निरोप, प्रशासनच करणार गणेशमूर्तीचे विसर्जन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 06:42 IST

प्रशासनाकडे बाप्पाची मूर्ती सुपुर्द केल्यावर, तेच बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करणार आहेत.

निखिल म्हात्रेअलिबाग : जिल्ह्यात गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्याची परंपरा आहे. मात्र, कोरोनाचे सावट सर्वच सणांवर पडत असल्याचे दिसून येते. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करताना आता थेट कोणालाच विसर्जन ठिकाणी जाता येणार नाही. प्रशासनाकडे बाप्पाची मूर्ती सुपुर्द केल्यावर, तेच बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करणार आहेत.डिजेच्या ठेक्यावर थिरकणारी पावल, पारंपरिक वाद्याच्या आधार घेत गणपती विसर्जनासाठी निघणाऱ्या, विसर्जनाच्या वेळी नागरिकांच्या मनोरंजनासाठी आणण्यात येणारे सेलिब्रिटी या वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे दिसणार नाहीत. अगदी शांततेत गणपती विसर्जन होणार असून, नागरिक जिल्हा प्रशासनाने दिलेल्या नियमांचे अगदी काटेकोर पालन करताना दिसून येत आहेत.गणेशोत्सव म्हणजे कोकणवासियांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. गणपती सणासाठी बाहेरगावी राहत असलेले नागरिक गावाकडे परतले आहेत. गावाकडे आल्यावर गणपतीत काहीतरी वेगळेपण करावे, असे त्यांचे नियोजन असायचे. मात्र, त्यांना या वर्षी गणपती उत्सवासाठी काही वेगळे करता आले नाही. त्यामुळे या वर्षी अगदी घरगुती वस्तू वापरून गणपती आरास सजावटीच्या कामांना सुरुवात केली आहे. या वर्षी संपूर्ण कोकणात पहिल्यांदाच साधेपणात गणेशोत्सव सण साजरा होत आहे.गणेश उत्सवालाही सध्या इव्हेंटचे स्वरूप प्राप्त झाले आहे. प्रत्येक विभागात राजाच्या नावे गणेशोत्सव साजरा होतो. नवसाला पावणाºया गणपतींचे फॅड वाढते आहे. मात्र, आता कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या वर्षी सणांना इव्हेन्ट बनविणाºया मंडळांना छेद लागला आहे. या वर्षी डीजेच्या ढणढणाटही थांबणार आहे.>भाजी विकणाºया आदिवासी महिला आल्या नाहीतगणपती दोन दिवसांवर असताना पायनू तांदूळ, पायनू मीठ, तसेच भाजीपाला विकण्यासाठी गावागावांमध्ये आदिवासी महिला येत असत. त्यांच्याकडून गावातील महिला अशा विविध वस्तुंची खरेदी करायच्या. मात्र, कोरोनाच्या सावटामुळे विविध भागातीलआदिवासी महिला भाजीपाला विकण्यासाठी गावागावात मोठ्यासंख्येने पोहोचल्या नाहीत.>पारंपरिक पद्धत जपण्याचा प्रशासनाचा प्रयत्नशहरी व ग्रामीण भागातील गणपती विसर्जन घाटावर नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तैनात केलेल्या सुरक्षा रक्षकांकडे आपले बाप्पा देऊन जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे अवाहन करण्यात आले आहे. संबंधित कर्मचारी बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केल्यावर संबंधित भक्ताला गणपतीचा पाट आणि त्यावर माती देणार आहेत.>१० दिवस असणारचोख पोलीस बंदोबस्तनागरिकांनी गर्दी करू नये, म्हणून सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांच्या मदतीसाठी राज्य राखीव दलाची एक कंपनी, शीघ्रकृती दलाचे पथक जिल्ह्यात तळ ठोकून आहे. हा पोलीस बंदोबस्त गणपतीच्या१० दिवसांच्या कालावधीत असणार आहे.