शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मीच्या आराधनेसाठी ‘को जागर्ति’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:45 IST

भारतातील प्रत्येक सण ऋतुमानातील बदलांच्या अनुषंगाने साजरे केले जातात. शरद ऋतूच्या आगमनाने वातावरणात एक प्रसन्नता असते. आकाश स्वच्छ होऊन चंद्र आणि चांदण्याचा प्रकाश थेट जमिनीवर येतो.

भारतातील प्रत्येक सण ऋतुमानातील बदलांच्या अनुषंगाने साजरे केले जातात. शरद ऋतूच्या आगमनाने वातावरणात एक प्रसन्नता असते. आकाश स्वच्छ होऊन चंद्र आणि चांदण्याचा प्रकाश थेट जमिनीवर येतो. हवेत हळूहळू गारवा वाढू लागतो. चंद्र व चांदण्यांच्या शीतल, शांत किरणांची अनुभूती कौजागिरी पौर्णिमेच्या दिवशी येते. शेतकरी तयार पिकांची कापणी करून, नव्या पिकाची म्हणजेच, भाताच्या कणसांच्या दाण्यांची पूजा या दिवशी करतात. हा उत्सव महाराष्ट्राबरोबर पश्चिम बंगाल, ओडिसा व गोव्यामध्येही साजरा केला जातो.अश्विन पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. कोजागिरी पौर्णिमेला अध्यात्मिक महत्त्व असून, या दिवशी करण्यात येणाºया व्रताला ‘कोजागिरी व्रत’ असेही म्हणतात. या दिवशी लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्र देवाची पूजा केली जाते. लक्ष्मी प्रसन्न व्हावी, तिचा वरदहस्त लाभावा म्हणून मोठ्या उत्साहाने तिची आराधना करतात. याबाबत अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत.या दिवसाबाबत अशी आख्यायिका आहे की, उत्तररात्री साक्षात लक्ष्मी देवी पृथ्वीवर येऊन ‘को जागर्ति’ ( म्हणजे, कोण जागत आहे) असे विचारते. त्यामुळे या दिवसाला ‘कोजागिरी पौर्णिमा’ असेही म्हणतात. लक्ष्मीच्या स्वागतार्ह रस्ते, घर, मंदिर, उद्यान आदी ठिकाणी दिवे लावले जातात.महाराष्ट्रात लक्ष्मीची विधिवत पूजा करून आटीव दुधांचा नैवेद्य बनवून तो चंद्राला दाखवितात. त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ घालतात. चंद्राची पूजा करून त्या दुधात त्याचे प्रतिबिंब बघून त्यानंतर कुटुंबीय तो नैवेद्य प्राशन करतात. उत्तररात्री लक्ष्मी आगमन होत असल्याने तिच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी दिवे लावले जातात. जेणेकरून घरात तिने प्रवेश करून ते घर धनधान्यांनी समृद्ध राहते, अशी श्रद्धा आहे.राजस्थानात या दिवशी स्त्रिया शुभ्र वस्त्रे परिधान करून चांदीचे दागिने घालतात. राजपूत रात्री चंद्राची पूजा करून ब्राह्मणांना शर्करायुक्त दूध देतात.बंगाली राज्यात ‘लोख्खी पूजा’ या नावाने हा उत्सव साजरा केला जातो. देवी लक्ष्मीची सेवा केली जाते.गुजरातमध्ये अश्विन पौर्णिमेला ‘शरद पूनम’ म्हणून संबोधले जाते. गरबा आणि दांडिया रास हे पांरपरिक नृत्य खेळून, रात्रीचा जागर करून, भक्तिभावाने शरद पूनम साजरी करतात.गोव्यात हा दिवस ‘नवे’ उत्सव म्हणून साजरा होतो. रात्री चंद्राची पूजा करून आटवलेल्या दुधाचा नैवेद्य दाखविला जातो. त्यामुळेच या पौर्णिमेला ‘कौमुदी’ असे म्हणतात. कौमुदी म्हणजे चंद्राचे शुभ्र चांदणे. चंद्राला नैवेद्य दाखवून सहकुटुंब एकत्र येऊन गप्पा, गाणी, खेळ खेळून रात्रीचा जागर केला जातो. देवी-देवतांच्या मंदिर परिसरात दीप लावून कोजागिरीनिमित्त दिव्यांच्या प्रकाशात आणि चंद्राच्या शीतल चांदण्यांत विधिवत लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते.ओडिसा राज्यात ‘कोजागराह’ या नावाने अश्विन पौर्णिमा साजरी केली जाते. घर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून दारात रांगोळी काढली जाते. देव्हाºयातील देव स्वच्छ करून घरासमोर ठेवले जातात. त्यानंतर मूर्तीची विधिवत पूजा करून देवासाठी लोणी, बत्ताशे, पायस आदी गोड पदार्थ पानावर वाढून ते देवांना अर्पण करतात. पौर्णिमेच्या रात्री त्या देवांच्या मूर्ती तिथेच ठेवून रात्रभर जागर करतात.रीना चव्हाण

टॅग्स :Raigadरायगड