शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

Atal Bihari Vajpayee : ग्वाल्हेरच्या वाड्यात जनसंघाच्या बैठका, रघुजीराजे आंग्रे यांनी दिला आठवणींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 02:32 IST

राजकारणात ज्यांचा आदर्श समोर ठेवावा अशी फार थोडी माणसे सध्या आहेत. त्यातील विख्यात अभ्यासू, चारित्र्यसंपन्न, सुसंस्कृत चेहरा म्हणून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी असल्याची भावुक प्रतिक्रिया सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी ‘लोकमत’ला दिली.

- जयंत धुळपअलिबाग - राजकारणात ज्यांचा आदर्श समोर ठेवावा अशी फार थोडी माणसे सध्या आहेत. त्यातील विख्यात अभ्यासू, चारित्र्यसंपन्न, सुसंस्कृत चेहरा म्हणून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी असल्याची भावुक प्रतिक्रिया सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी ‘लोकमत’ला दिली. ग्वाल्हेरमधील बालपणीच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. अटलबिहारी वाजपेयी यांचे बंधू बृजबिहारी वाजपेयी हे ग्वाल्हेरमधील आमच्या संभाजी विलास वाड्याच्या शेजारीच राहायला होते. माझे मोठे काका सरदार संभाजीराजे आंग्रे आणि त्यांचा अत्यंत घनिष्ट स्नेह होता. माझ्या बालपणी अटलबिहारी वाजपेयी, राजमाता विजयाराजे शिंदे ही सारी त्या वेळची जनसंघाची मंडळी संभाजी विलास वाड्यात आवर्जून येत असत.ग्वाल्हेरच्या संभाजी विलास वाड्यात धोतर, कुडता, जोडे आणि उंच काळे मोजे घालून येणारी व्यक्ती किती महान आहे, हे समजायला वयाची १२ वर्षे जावी लागली. राजमाता विजयाराजे शिंदे, थोरले काका सरदार संभाजीराजे, बाबा यांच्याशी गप्पांत रंगणारे कविमनाचा राजकारणी भारतीय राजकारणातील मातब्बर होते.

रोह्यात १९८२ मध्ये वाजपेयींबरोबर लाभला सहवासअटलबिहारी वाजपेयी यांचा एक तासाचा सहवास अलिबागचे नंदकुमार चाळके व त्यांचे आणीबाणीतील सहकारी गिरीश तुळपुळे यांना रोहा येथे १९८२ मध्ये लाभला. तत्कालीन संघाचे ज्येष्ठ सदस्य माधवराव वैद्य यांच्या निवासस्थानी वाजपेयी यांच्या समवेत भेट झाली होती.राजकारण, साहित्य, कविता, समाजकारण, संस्कृती, इतिहास अशा अनेक विषयांवर त्यांचा गाढा अभ्यास होता. त्या वेळी अलिबागमध्ये आम्ही संघ विचाराच्या एका साप्ताहिकाचे काम करीत होतो. त्याच साप्ताहिकाचा अटलजींवरील विशेषांक केला होता. त्याचे प्रकाशन त्यांनी केले. संपूर्ण अंकातील मजकूर जाणून घेतला आणि दिलेली शाब्बासकीची थाप आजही स्मरणात असल्याचे चाळके सांगतात.वाजपेयी यांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा सहवास लाभल्याने त्यांची वैचारिक प्रगल्भता अनुभवल्याने आयुष्यच बदलून गेले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असताना नाशिक कारागृहात एक महिना तर ठाणे कारागृहात १२ महिने असा एकूण १३ महिने कारावास भोगला. अटलजींचे साहित्य मनात घर करून गेल्याचेही त्यांनी अखेरीस सांगितले.

अटलबिहारी वाजपेयी विरुद्ध माधवराव शिंदे ग्वाल्हेरची निवडणूकवाजपेयी हे वारंवार ग्वाल्हेरमध्ये येत असत आणि त्यांच्या बैठका वाड्यात होत. त्या वेळी ग्वाल्हेर हा अटलबिहारी वाजपेयी यांचा मतदार संघ होता. १९८३ मध्ये वाजपेयी यांनी माधवराव शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. ती निवडणूक आणि त्या वेळच्या प्रचाराची धामधूम आजही स्मरणात असल्याचे रघुजीराजे यांनी सांगितले.माझ्या उपनयन सोहळ््यासाठी अटलबिहारी येणार होते, परंतु काही कारणामुळे ते येऊ शकले नाहीत. त्यानंतर आवर्जून ते भेटण्यासाठी वाड्यात आले होते. माझी शेंडी हातात घेऊन दीर्घायुष्यासाठी आशीर्वादही दिले होते.- रघुजीराजे आंग्रेदेशासाठी समर्पित जीवन जगणारे राजकारणातील अटल नेतृत्व हरपले आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पार्टीचेच नव्हे, तर देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे.- रवींद्र चव्हाण, पालकमंत्री, रायगडपराकोटीची संवेदनशीलता जपणारे व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून निघून गेले आहे, देशाने उत्तम संसदपटू गमावला आहे.- आमदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्षकणखर आणि सहृदयी नेता भारताने गमावला आहे. त्यांच्या जाण्याने भाजपाबरोबरच देशाची प्रचंड हानी झाली आहे. लाल बहादूर शास्त्रींच्या पठडीतील अटलजींनी, ‘जय जवान, जय किसानच्या जोडीला जय विज्ञान’ची जोड देऊन देशाच्या प्रगतीला दिशा दिली.- आमदार प्रशांत ठाकूरप्रतिभावंत, प्रगल्भ, सर्वसमावेशक, मानवतावादी, राजकीय विचारसरणीचे, अजातशत्रू असे नेते आपल्यातून गेले आहेत. खंबीर कवी मनाचा माणूस असूनही प्रयोगशील राष्ट्रीय धोरणाने त्यांनी आंतरराष्ट्रीय छाप पाडली होती. भाजपाच्या कार्यकर्त्यांची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.- सतीश धारप, रायगड उपाध्यक्ष, भाजपा

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीRaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई