शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

Atal Bihari Vajpayee : ग्वाल्हेरच्या वाड्यात जनसंघाच्या बैठका, रघुजीराजे आंग्रे यांनी दिला आठवणींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 02:32 IST

राजकारणात ज्यांचा आदर्श समोर ठेवावा अशी फार थोडी माणसे सध्या आहेत. त्यातील विख्यात अभ्यासू, चारित्र्यसंपन्न, सुसंस्कृत चेहरा म्हणून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी असल्याची भावुक प्रतिक्रिया सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी ‘लोकमत’ला दिली.

- जयंत धुळपअलिबाग - राजकारणात ज्यांचा आदर्श समोर ठेवावा अशी फार थोडी माणसे सध्या आहेत. त्यातील विख्यात अभ्यासू, चारित्र्यसंपन्न, सुसंस्कृत चेहरा म्हणून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी असल्याची भावुक प्रतिक्रिया सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी ‘लोकमत’ला दिली. ग्वाल्हेरमधील बालपणीच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. अटलबिहारी वाजपेयी यांचे बंधू बृजबिहारी वाजपेयी हे ग्वाल्हेरमधील आमच्या संभाजी विलास वाड्याच्या शेजारीच राहायला होते. माझे मोठे काका सरदार संभाजीराजे आंग्रे आणि त्यांचा अत्यंत घनिष्ट स्नेह होता. माझ्या बालपणी अटलबिहारी वाजपेयी, राजमाता विजयाराजे शिंदे ही सारी त्या वेळची जनसंघाची मंडळी संभाजी विलास वाड्यात आवर्जून येत असत.ग्वाल्हेरच्या संभाजी विलास वाड्यात धोतर, कुडता, जोडे आणि उंच काळे मोजे घालून येणारी व्यक्ती किती महान आहे, हे समजायला वयाची १२ वर्षे जावी लागली. राजमाता विजयाराजे शिंदे, थोरले काका सरदार संभाजीराजे, बाबा यांच्याशी गप्पांत रंगणारे कविमनाचा राजकारणी भारतीय राजकारणातील मातब्बर होते.

रोह्यात १९८२ मध्ये वाजपेयींबरोबर लाभला सहवासअटलबिहारी वाजपेयी यांचा एक तासाचा सहवास अलिबागचे नंदकुमार चाळके व त्यांचे आणीबाणीतील सहकारी गिरीश तुळपुळे यांना रोहा येथे १९८२ मध्ये लाभला. तत्कालीन संघाचे ज्येष्ठ सदस्य माधवराव वैद्य यांच्या निवासस्थानी वाजपेयी यांच्या समवेत भेट झाली होती.राजकारण, साहित्य, कविता, समाजकारण, संस्कृती, इतिहास अशा अनेक विषयांवर त्यांचा गाढा अभ्यास होता. त्या वेळी अलिबागमध्ये आम्ही संघ विचाराच्या एका साप्ताहिकाचे काम करीत होतो. त्याच साप्ताहिकाचा अटलजींवरील विशेषांक केला होता. त्याचे प्रकाशन त्यांनी केले. संपूर्ण अंकातील मजकूर जाणून घेतला आणि दिलेली शाब्बासकीची थाप आजही स्मरणात असल्याचे चाळके सांगतात.वाजपेयी यांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा सहवास लाभल्याने त्यांची वैचारिक प्रगल्भता अनुभवल्याने आयुष्यच बदलून गेले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असताना नाशिक कारागृहात एक महिना तर ठाणे कारागृहात १२ महिने असा एकूण १३ महिने कारावास भोगला. अटलजींचे साहित्य मनात घर करून गेल्याचेही त्यांनी अखेरीस सांगितले.

अटलबिहारी वाजपेयी विरुद्ध माधवराव शिंदे ग्वाल्हेरची निवडणूकवाजपेयी हे वारंवार ग्वाल्हेरमध्ये येत असत आणि त्यांच्या बैठका वाड्यात होत. त्या वेळी ग्वाल्हेर हा अटलबिहारी वाजपेयी यांचा मतदार संघ होता. १९८३ मध्ये वाजपेयी यांनी माधवराव शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. ती निवडणूक आणि त्या वेळच्या प्रचाराची धामधूम आजही स्मरणात असल्याचे रघुजीराजे यांनी सांगितले.माझ्या उपनयन सोहळ््यासाठी अटलबिहारी येणार होते, परंतु काही कारणामुळे ते येऊ शकले नाहीत. त्यानंतर आवर्जून ते भेटण्यासाठी वाड्यात आले होते. माझी शेंडी हातात घेऊन दीर्घायुष्यासाठी आशीर्वादही दिले होते.- रघुजीराजे आंग्रेदेशासाठी समर्पित जीवन जगणारे राजकारणातील अटल नेतृत्व हरपले आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पार्टीचेच नव्हे, तर देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे.- रवींद्र चव्हाण, पालकमंत्री, रायगडपराकोटीची संवेदनशीलता जपणारे व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून निघून गेले आहे, देशाने उत्तम संसदपटू गमावला आहे.- आमदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्षकणखर आणि सहृदयी नेता भारताने गमावला आहे. त्यांच्या जाण्याने भाजपाबरोबरच देशाची प्रचंड हानी झाली आहे. लाल बहादूर शास्त्रींच्या पठडीतील अटलजींनी, ‘जय जवान, जय किसानच्या जोडीला जय विज्ञान’ची जोड देऊन देशाच्या प्रगतीला दिशा दिली.- आमदार प्रशांत ठाकूरप्रतिभावंत, प्रगल्भ, सर्वसमावेशक, मानवतावादी, राजकीय विचारसरणीचे, अजातशत्रू असे नेते आपल्यातून गेले आहेत. खंबीर कवी मनाचा माणूस असूनही प्रयोगशील राष्ट्रीय धोरणाने त्यांनी आंतरराष्ट्रीय छाप पाडली होती. भाजपाच्या कार्यकर्त्यांची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.- सतीश धारप, रायगड उपाध्यक्ष, भाजपा

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीRaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई