शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

अती मुसळधार पावसाचे आगमन, दोन दिवस जिल्ह्याला यलो अलर्ट

By राजेश भोस्तेकर | Updated: September 29, 2023 16:17 IST

२८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीला पावसाचे आगमन विसर्जन मिरवणुकीला झाले. रात्रीच्या सुमारास मात्र पावसाने विश्रांती घेतली होती.

अलिबाग : रायगड जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी उन्हाळी वातावरण असताना दुपारनंतर पावसाचे विजांच्या कडकडाटासह जोरदार आगमन झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण पुन्हा पावसाळी झाले आहे. हवामान विभागाने २९ व ३० सप्टेंबर रोजी जिल्ह्याला यलो अलर्ट जाहीर केला आहे. गेल्या दोन दिवसापासून दुपारनंतर जिल्ह्यात पावसाचे आगमन होऊन जनजीवन विस्कळीत होत आहे. पाऊस सुरू झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. 

गुरुवारी २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीला पावसाचे आगमन विसर्जन मिरवणुकीला झाले. रात्रीच्या सुमारास मात्र पावसाने विश्रांती घेतली होती. शुक्रवारी दुपार पर्यंत उन्हाळी वातावरण निर्माण होऊन गर्मी होत होती. मात्र दुपारी साडे तीन नंतर अचानक वातावरण बदलून काळे ढग जमा होऊन अंधार पसरला. आणि काही वेळातच मुसळधार पावसाचे आगमन झाले. पावसासोबत विजांचा कडकडाटही सुरू झाला. अचानक सुरू झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. 

हवामान विभागाने २९ आणि ३० सप्टेंबर असे दोन दिवस यलो अलर्ट दिला आहे. ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहणार असून काही भागात अती मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार अलिबाग सह जिल्ह्यातील काही भागात अती मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण पावसाळी झाले असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊस