शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

कळंबोलीमधील एमटीएनएलच्या पडीक इमारतींना आले खंडराचे स्वरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 23:24 IST

परिसरातील रहिवाशांना त्रास; साप, विंचवांचा वाढला उपद्रव

अरुणकुमार मेहत्रे

कळंबोली : कळंबोली वसाहतीत सेक्टर - १० येथील महानगर टेलिफोन निगमच्या इमारती मागील १२ वर्षांपासून ओस पडल्या आहेत. वापर नसल्याने या इमारती खंडर बनल्या आहेत. झाडे व झुडपे वाढली आहेत, त्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला आहे. विशेष म्हणजे, मागील अनेक वर्षांपासून या इमारती दुर्लक्षित राहिल्याने त्याचा ताबा गर्दुल्ले आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी घेतला आहे. यासंदर्भात स्थानिक रहिवाशांच्या अनेक तक्रारी असूनही संबंधित विभागाकडून कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही.

सिडकोने सुरुवातीला कळंबोली वसाहत विकसित केली. त्यामध्ये विविध नियोजनाच्या माध्यमातून नागरिकांना स्वस्तात घरे देण्यात आली. त्याचबरोबर गृहनिर्माण संस्थांनाही आरक्षित भूखंड देण्यात आले. त्यावर रो-हाउसेस व छोटेखणी बंगले उभारले. हे करीत असताना आवश्यक पायाभूत सुविधांची पूर्तता मात्र त्या प्रमाणात झाली नाही. चाकरमान्यांसह विविध खासगी व शासकीय प्राधिकरणातील नोकरदारांनी मोर्चा कळंबोलीकडे वळविला. सेक्टर -१० मध्ये एमटीएनएलच्या एकूण सहा इमारती आहेत.

या सहा इमारतीत एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांसाठी ९६ सदनिका आहेत. या सदनिका मागील अनेक वर्र्षांपासून वापराविना पडून आहेत. पायाभूत सुविधांची कमतरता असल्याने येथील अनेक कर्मचारी स्वत:च्या घरात स्थलांतरित झाले आहेत. या इमारतींची पडझड सुरू झाली आहे. २००५ मध्ये आलेल्या महापुराचा मोठा फटका या इमारतींना बसला. सध्या या इमारती धोकादायक बनल्या आहेत. इमारतीच्या आवारात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे.

साप व इतर सरपटणाºया प्राण्यांचा वावर वाढल्याने परिसरातील इमारतीत राहणाºया रहिवाशांना याचा ताप झाला आहे. या निर्मनुष्य इमारतींचा ताबा गर्दुल्ले आणि असामाजिक घटकांनी घेतल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर रासपचे जिल्हाध्यक्ष विकास वाक्षे यांनी यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली असून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

गर्दुल्ल्यांचा वावर वाढलाइमारतीत कोणीही राहत नसल्यामुळे येथे गर्दुल्ल्यांचा वावर वाढला आहे, तसेच रात्रीच्या वेळी रहिवाशांना यांचा त्रास होत आहे. मोडकळीस आलेल्या सोसायटीस संरक्षण भिंत आहे. गेटही कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे; परंतु इमारतीच्या बाजूला असलेली संरक्षण भिंत तोडण्यात आली आहे. तेथूनच या इमारतीत प्रवेश केला जातो. याचबरोबर इमारतीभोवती मोठ्या प्रमाणात झाडे असल्यामुळे रात्रीच्या वेळी काळोख असतो. तसेच काही प्रमाणात या परिसरातील रोडवरील पथदिवे बंद असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.