शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

चिरनेरच्या पुरासाठी कारणीभूत ठरणारी धनदांडग्यांची अतिक्रमणे हटविण्यासाठी वेळप्रसंगी नागरिक, महिलांनी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 19:58 IST

मागील चार-पाच वर्षांपासून चिरनेर गावात दरवर्षी पावसाळ्यात पुरस्थिती निर्माण होत आहे.

 मधुकर ठाकूर

उरण : चिरनेर गावात पुरासाठी कारणीभूत ठरणारी विविध नाल्यांवर धनदांडग्यांची बेकायदेशीर अतिक्रमणे हटविण्याची मोहीम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.कारवाई दरम्यान ही अतिक्रमणे हटविण्यासाठी वेळ पडल्यास नागरिक ,महिलांनाही रस्त्यावर उतरावे लागेल असे आवाहन चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच भास्कर मोकल यांनी नागरिक आणि महिलांना केले आहे.

 मागील चार-पाच वर्षांपासून चिरनेर गावात दरवर्षी पावसाळ्यात पुरस्थिती निर्माण होत आहे.चिरनेर गावात धनदांडग्यांची बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेली विविध अतिक्रमणेच पुरासाठी कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे.दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे गावकऱ्यांचे होणाऱ्या आर्थिक नुकसानावर याआधीच कायम स्वरुपी उपाययोजना करण्यासाठी मातृछाया फाउंडेशनच्या जिल्हाध्यक्षा जयवंती गोंधळी यांनी चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांची शेकडो महिलांसह भेट घेऊन संवाद साधला.दरवर्षी गावातील रहिवाशांना सावधानतेचा इशारा देण्यापलीकडे कोणतेही नियोजन केले जात नाही.ग्रामपंचायत असो किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग दोघेही मोकळे होतात.मात्र असे न करता तर पुराचा प्रश्न संकट उभे ठाकण्याआधीच मार्गी लावा असे आवाहन या महिलांनी भेटी दरम्यान ग्रामपंचायतीला केले. 

 यावेळी सरपंच भास्कर मोकल यांनी उपस्थित गावकरी महिलांशी संवाद साधताना सांगितले की, महापुराचा अनुभव गाठीशी असलेल्या चिरनेरकरांचा पूर परिस्थितीचा प्रश्न सोडविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.लवकरच चिरनेरच्या मुख्य हायवेवर पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक त्या मोर्‍या बांधण्यात येणार आहेत. या मोऱ्या बांधण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूरही झाले आहे. त्याचे काम काही दिवसातच सुरूही होईल.मात्र त्याचबरोबर विविध ठिकाणच्या मोऱ्या , नाल्यांवर जी काही पाण्याचा निचरा होण्यासाठी धनदांडग्यांची अडथळा ठरणारी अतिक्रमणे आहेत. ही अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. अतिक्रमणे हटविण्यासाठी वेळ पडल्यास नागरिकांसह महिलांनाही रस्त्यावर उतरावे लागेल असे आवाहन सरपंच भास्कर मोकल यांनी केले.

धनदांडग्यांची नाल्यावरची अतिक्रमणे हटविण्यास कोण विरोध करेल त्यांच्या विरोधात चिरनेर गावातील महिला रस्त्यावर उतरतील अशी ग्वाही मातृछाया फाउंडेशनच्या अध्यक्षा जयवंती गोंधळी यांनी ग्रामपंचायतीला दिली.यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच , सदस्यांसह नागरिक, महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

टॅग्स :floodपूर