शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

चिरनेरच्या पुरासाठी कारणीभूत ठरणारी धनदांडग्यांची अतिक्रमणे हटविण्यासाठी वेळप्रसंगी नागरिक, महिलांनी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 19:58 IST

मागील चार-पाच वर्षांपासून चिरनेर गावात दरवर्षी पावसाळ्यात पुरस्थिती निर्माण होत आहे.

 मधुकर ठाकूर

उरण : चिरनेर गावात पुरासाठी कारणीभूत ठरणारी विविध नाल्यांवर धनदांडग्यांची बेकायदेशीर अतिक्रमणे हटविण्याची मोहीम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.कारवाई दरम्यान ही अतिक्रमणे हटविण्यासाठी वेळ पडल्यास नागरिक ,महिलांनाही रस्त्यावर उतरावे लागेल असे आवाहन चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच भास्कर मोकल यांनी नागरिक आणि महिलांना केले आहे.

 मागील चार-पाच वर्षांपासून चिरनेर गावात दरवर्षी पावसाळ्यात पुरस्थिती निर्माण होत आहे.चिरनेर गावात धनदांडग्यांची बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेली विविध अतिक्रमणेच पुरासाठी कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे.दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे गावकऱ्यांचे होणाऱ्या आर्थिक नुकसानावर याआधीच कायम स्वरुपी उपाययोजना करण्यासाठी मातृछाया फाउंडेशनच्या जिल्हाध्यक्षा जयवंती गोंधळी यांनी चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांची शेकडो महिलांसह भेट घेऊन संवाद साधला.दरवर्षी गावातील रहिवाशांना सावधानतेचा इशारा देण्यापलीकडे कोणतेही नियोजन केले जात नाही.ग्रामपंचायत असो किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग दोघेही मोकळे होतात.मात्र असे न करता तर पुराचा प्रश्न संकट उभे ठाकण्याआधीच मार्गी लावा असे आवाहन या महिलांनी भेटी दरम्यान ग्रामपंचायतीला केले. 

 यावेळी सरपंच भास्कर मोकल यांनी उपस्थित गावकरी महिलांशी संवाद साधताना सांगितले की, महापुराचा अनुभव गाठीशी असलेल्या चिरनेरकरांचा पूर परिस्थितीचा प्रश्न सोडविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.लवकरच चिरनेरच्या मुख्य हायवेवर पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक त्या मोर्‍या बांधण्यात येणार आहेत. या मोऱ्या बांधण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूरही झाले आहे. त्याचे काम काही दिवसातच सुरूही होईल.मात्र त्याचबरोबर विविध ठिकाणच्या मोऱ्या , नाल्यांवर जी काही पाण्याचा निचरा होण्यासाठी धनदांडग्यांची अडथळा ठरणारी अतिक्रमणे आहेत. ही अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. अतिक्रमणे हटविण्यासाठी वेळ पडल्यास नागरिकांसह महिलांनाही रस्त्यावर उतरावे लागेल असे आवाहन सरपंच भास्कर मोकल यांनी केले.

धनदांडग्यांची नाल्यावरची अतिक्रमणे हटविण्यास कोण विरोध करेल त्यांच्या विरोधात चिरनेर गावातील महिला रस्त्यावर उतरतील अशी ग्वाही मातृछाया फाउंडेशनच्या अध्यक्षा जयवंती गोंधळी यांनी ग्रामपंचायतीला दिली.यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच , सदस्यांसह नागरिक, महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

टॅग्स :floodपूर