शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

चिरनेरच्या पुरासाठी कारणीभूत ठरणारी धनदांडग्यांची अतिक्रमणे हटविण्यासाठी वेळप्रसंगी नागरिक, महिलांनी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 19:58 IST

मागील चार-पाच वर्षांपासून चिरनेर गावात दरवर्षी पावसाळ्यात पुरस्थिती निर्माण होत आहे.

 मधुकर ठाकूर

उरण : चिरनेर गावात पुरासाठी कारणीभूत ठरणारी विविध नाल्यांवर धनदांडग्यांची बेकायदेशीर अतिक्रमणे हटविण्याची मोहीम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.कारवाई दरम्यान ही अतिक्रमणे हटविण्यासाठी वेळ पडल्यास नागरिक ,महिलांनाही रस्त्यावर उतरावे लागेल असे आवाहन चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच भास्कर मोकल यांनी नागरिक आणि महिलांना केले आहे.

 मागील चार-पाच वर्षांपासून चिरनेर गावात दरवर्षी पावसाळ्यात पुरस्थिती निर्माण होत आहे.चिरनेर गावात धनदांडग्यांची बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेली विविध अतिक्रमणेच पुरासाठी कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे.दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे गावकऱ्यांचे होणाऱ्या आर्थिक नुकसानावर याआधीच कायम स्वरुपी उपाययोजना करण्यासाठी मातृछाया फाउंडेशनच्या जिल्हाध्यक्षा जयवंती गोंधळी यांनी चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांची शेकडो महिलांसह भेट घेऊन संवाद साधला.दरवर्षी गावातील रहिवाशांना सावधानतेचा इशारा देण्यापलीकडे कोणतेही नियोजन केले जात नाही.ग्रामपंचायत असो किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग दोघेही मोकळे होतात.मात्र असे न करता तर पुराचा प्रश्न संकट उभे ठाकण्याआधीच मार्गी लावा असे आवाहन या महिलांनी भेटी दरम्यान ग्रामपंचायतीला केले. 

 यावेळी सरपंच भास्कर मोकल यांनी उपस्थित गावकरी महिलांशी संवाद साधताना सांगितले की, महापुराचा अनुभव गाठीशी असलेल्या चिरनेरकरांचा पूर परिस्थितीचा प्रश्न सोडविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.लवकरच चिरनेरच्या मुख्य हायवेवर पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक त्या मोर्‍या बांधण्यात येणार आहेत. या मोऱ्या बांधण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूरही झाले आहे. त्याचे काम काही दिवसातच सुरूही होईल.मात्र त्याचबरोबर विविध ठिकाणच्या मोऱ्या , नाल्यांवर जी काही पाण्याचा निचरा होण्यासाठी धनदांडग्यांची अडथळा ठरणारी अतिक्रमणे आहेत. ही अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. अतिक्रमणे हटविण्यासाठी वेळ पडल्यास नागरिकांसह महिलांनाही रस्त्यावर उतरावे लागेल असे आवाहन सरपंच भास्कर मोकल यांनी केले.

धनदांडग्यांची नाल्यावरची अतिक्रमणे हटविण्यास कोण विरोध करेल त्यांच्या विरोधात चिरनेर गावातील महिला रस्त्यावर उतरतील अशी ग्वाही मातृछाया फाउंडेशनच्या अध्यक्षा जयवंती गोंधळी यांनी ग्रामपंचायतीला दिली.यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच , सदस्यांसह नागरिक, महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

टॅग्स :floodपूर