शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

जिल्ह्यात मदतीची घोषणा वाऱ्यावरच; रिक्षाचालकांना दीड हजार कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 10:38 IST

प्रवासी नसल्याने दिवसभराचा प्रवास खर्चही निघत नाही. त्यामुळे घरखर्च भागविणेही अवघड होऊन बसले आहे. सरकारने रिक्षाचालकांसाठी दीड हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. वास्तविक पाहता ही मदत तुटपुंजी आहे.

निखिल म्हात्रे -अलिबाग :  मागील १४ महिन्यांपासून कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव असल्याने रिक्षाचालकांचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे कर्जाचे हप्ते थकले असून, त्यांना कुटुंब चालविणे अवघड झाले आहे. सरकारने रिक्षाचालकांना दीड हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली. परंतु, अद्याप एकाही चालकास शासनाकडून मदत उपलब्ध झालेली नाही. तसेच लिंकही सुरू होत नाही. रायगड जिल्ह्यात तीन आसनी रिक्षा सुमारे ११ हजार आहेत, तर विक्रम मिनिडोर रिक्षा सुमारे १८ हजार आहेत. या रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून तब्बल ३५ हजार कुटुंबांमधील एक लाख ४० हजार जणांचा उदरनिर्वाह चालतो. गतवर्षी कोरोनाच्या टाळेबंदीमध्ये या सर्व रिक्षा तब्बल सहा महिने बंदच होत्या. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न रिक्षाचालक आणि मालकांपुढे उभा राहिला आहे. सध्या रिक्षा व्यवसायास परवानगी असली तरी इतर बाजारपेठा बंद असल्यामुळे रिक्षाने प्रवास करणाऱ्यांची संख्या घटली आहे. रिक्षाचालकांना तासनतास स्टँडवर प्रवाशांची वाट पाहावी लागत आहे.प्रवासी नसल्याने दिवसभराचा प्रवास खर्चही निघत नाही. त्यामुळे घरखर्च भागविणेही अवघड होऊन बसले आहे. सरकारने रिक्षाचालकांसाठी दीड हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. वास्तविक पाहता ही मदत तुटपुंजी आहे. परंतु, महिना झाला तरी तीही मिळत नाही.

जिल्ह्यातील परवानाधारक रिक्षाचालकांची संख्या - ११०००.लिंक सुरूच होत नाही -आज चार आठवडे उलटून गेले तरी रिक्षाचालकास सरकारने जाहीर केलेली मदत अद्याप मिळालेली नाही. सरकारने नोंदणीसाठी लिंक दिली आहे. मात्र, अद्याप ती लिंक सुरूच नसल्यामुळे नोंदणी होत नाही.- विजय पाटील, विक्रम मिनिडोर रिक्षा चालक मालक संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष.

कोरोनामुळे रिक्षाचालकाला विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरकारने चालकांसाठी मदतीची फक्त घोषणा केली आहे. परंतु, अद्याप एकाही रिक्षाचालकास प्रत्यक्षात मदत मिळाली नाही. - अशोक पाटील, रिक्षाचालक.

गेल्या काही दिवसांपासून प्रवासी नसल्याने घरी परतताना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. त्यामुळे घरभाडे, घरखर्च कसा भागवायचा याचा मेळ लागत नाही. त्यामुळे सरकारने जाहीर केलेली मदत लवकरच मिळावी, अशी अपेक्षा आहे.- प्रज्ञील मगर. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस