शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

Taliye Landslide: ...आणि अख्खा गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला, तळीये दुर्घटनेत बचावलेल्या आजोबांनी कथन केला भयाण अनुभव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 14:11 IST

Taliye Landslide: तळीये गावातील दुर्घटनेत बचावलेल्या एका वृद्ध आजोबांनी ही दुर्घटना घडली तेव्हाचा भयाण अनुभव कथन केला आहे.

रायगड - मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन महाड तालुक्यातील तळीये गावात झालेल्या दुर्घटनेत ४० हून अधिक ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे. याठिकाणी मदतकार्य सुरू असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, तळीये गावातील दुर्घटनेत बचावलेल्या एका वृद्ध आजोबांनी ही दुर्घटना घडली तेव्हाचा भयाण अनुभव कथन केला आहे. डोंगराला भेग जाऊन दरड कोसळतेय हे दिसताच गावकरी घरे सोडून निघून जाण्यासाठी एकत्र आले असतानाच अचानक मातीचा ढिगारा खाली आला आणि यामध्ये सगळे गाडले, गेले अशी माहिती या आजोबांनी दिली. (... and the whole village was buried under a mound of mud, The Senior Citizen who survived the Taliye tragedy narrated a frightening experience)

यासंदर्भातील वृत्त टीव्ही-९ मराठीने प्रसिद्ध केले आहे. दुर्घटनेत बालंबाल बचावलेल्या बबन सकपाळ नावाच्या आजोबांनी सांगितले की, संध्याकाळी चार साडेचारच्या सुमारास दुर्घटना घडली. वर दरड कोसळतेय म्हणून आरडाओरडा झाला तेव्हा आम्ही घरातून बाहेर पडलो. मात्र आम्ही घरातून बाहेर पडत असतानाच वरून मातीचा ढिगारा आला आणि आजूबाजूची घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. काहीच शिल्लक राहिलं नाही. आमच्या नव्या घराच्या मागे असलेलं आमचं जुनं घरही या दुर्घटनेत भुईसपाट झालं.

डोंगराला भेग जाऊन दरड कोसळणार असे वाटू लागल्याने गावातील लोक सावध झाले होते. सगळे एकत्र येऊन सुरक्षित स्थळी जाण्यासाठी धावपळ करत होते. मात्र त्याचवेळी अचानक वरून दरडीची चिखल माती आली आणि सगळे गाडले गेले. सुदैवाने आम्ही लोकं जमले होते त्या दिशेला न जाता दुसऱ्या वाटेला गेलो त्यामुळे आम्ही बचावलो. पण तिथे जमलेले सगळे गाडले गेले. कुणीच जिवंत राहिला नाही, असे या आजोबांनी सांगितले.

आमच्या घरात आम्ही तीन माणसं राहतो. आम्ही तिघेही बचावलो. मात्र घरावर दगड माती येऊन पडली आहे. घरात काहीच शिल्लक राहिलेलं नाही. घरातलं धान्य भिजून गेलं आहे. राहायला जागा नाही. आता मी कुटुंबाला घेऊन चार गुरांना घेऊन रानात राहतोय. खाण्यापिण्याची काही व्यवस्था नाही आहे, अशी व्यथा या ज्येष्ठ नागरिकांनी मांडली.  

टॅग्स :Raigadरायगडlandslidesभूस्खलनMaharashtraमहाराष्ट्र