शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आंत्रड तर्फे वरेडी येथील अंगणवाडी झाली खुली , ग्रामस्थ समाधानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 03:44 IST

अंगणवाडी सेविकेला अतिरिक्त भार दिल्याने ती अंगणवाडीत येत नव्हती, यामुळे अतिरिक्त भार पडल्याने मदतनीस आजारी पडल्याने ९० बालके एवढी पटसंख्या असलेली आंत्रड तर्फे वरेडी या अंगणवाडीला कुलूप लागले होते.

- कांता हाबळेनेरळ - अंगणवाडी सेविकेला अतिरिक्त भार दिल्याने ती अंगणवाडीत येत नव्हती, यामुळे अतिरिक्त भार पडल्याने मदतनीस आजारी पडल्याने ९० बालके एवढी पटसंख्या असलेली आंत्रड तर्फे वरेडी या अंगणवाडीला कुलूप लागले होते. तर या सगळ्याकडे एकात्मिक बालविकास प्रकल्प विभाग कर्जत बघ्याची भूमिका घेत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच याची दखल घेत एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाने ही अंगणवाडी तत्काळ खुली केली आहे.कर्जत तालुक्यातील आंत्रड तर्फे वरेडी या गावातील अंगणवाडीत सुमारे ९० बालके एवढी पटसंख्या आहे. तर १० महिलांचा डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेत समावेश आहे. जुलै २०१८ मध्ये येथील अंगणवाडी सेविका शकुंतला डायरे या सेवानिवृत्त झाल्या, म्हणून त्या रिक्त जागेवर भारती खडे यांना अतिरिक्त भार देण्यात आला. या अंगणवाडी केंद्रावर गेल्या सहा वर्षांपासून कांचन डायरे या मदतनीस म्हणून काम पाहत आहेत. नियुक्ती झाल्यापासून खडे या अंगणवाडी केंद्रात वेळेत येत नाही व भरपूर दिवस त्या केंद्रात येतच नसल्याने कांचन डायरे यांच्यावर अतिरिक्त भर पडत होता. या अतिरिक्त भारामुळे कांचन डायरे या आजारी पडल्या. परिणामी, गेल्या आठ दिवसांपासून आंत्रड तर्फे वरेडी येथील अंगणवाडीला कुलूप लागले होते.अंगणवाडी बंद असल्यामुळे येथील बालकांचे तर हाल झालेच आहेत; पण सोबत गावातील दहा महिलांचा अमृत आहारदेखील बंद झाला होता. दरम्यान, या सगळ्यात संबंधित प्रकरणाची माहिती असूनदेखील एकात्मिक बालविकास प्रकल्प कर्जतने मात्र बघ्याची भूमिका घेतल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता. या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाला खडबडून जाग आली आहे. या ठिकाणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी. एस. पुरी, एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डी. पी. वाघमारे, तालुका आरोग्य अधिकारी सी. के. मोरे, सी.ए.एन. प्रतिनिधी अशोक जंगले यांनी आंत्रड अंगणवाडीला भेट दिली. खडे या अंगणवाडी सेविकेच्या जागी शेजारील गावातील काळेवाडी येथील अंगणवाडी सेविकेला येथील चार्ज देण्यात येऊन अंगणवाडी बालकांसाठी खुली केली आहे.केवळ ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध झाली म्हणून ही अंगणवाडी पूर्वीप्रमाणे सुरू झाली आहे. बालकांना पोषण आहाराविना इतके दिवस वंचित राहावे लागले होते. आमच्या समस्येला वाचा फोडल्याबद्दल आम्ही आंत्रड गावकरी आभारी आहोत.- रवींद्र डायरे,सामाजिक कार्यकर्ते, आंत्रड

टॅग्स :RaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई