शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

नियंत्रण सुटलेल्या NMMT बसची टेम्पोसह तीन दुचाकींना धडक, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 16:42 IST

संतप्त ग्रामस्थांचा रास्तारोको, वाहतूक खोळंबली; हजारो वाहनांच्या आठ किलोमीटरपर्यंत रांगा

मधुकर ठाकूर, उरण: नियंत्रण सुटलेल्या एनएमएमटी बसने उरणच्या खोपटा रस्त्यावरील मालवाहु टेम्पोसह तीन दुचाकींना धडक दिली.या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.तर दोघेजण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.गुरुवारी सकाळीच घडलेल्या अपघातामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको केले.यामुळे मात्र खोपटा पुल ते मोठीजुई आणि धुतुम दरम्यान आठ किलोमीटर अंतरापर्यंत हजारो वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.यामुळे मात्र मोठ्या प्रमाणावर झालेल्या वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहतूकीचा सहा तास खोळंबा झाला.

नवी मुंबई परिवहन सेवेची एक वातानुकूलित प्रवासी बस प्रवाशांना घेऊन वाशीहून कोप्रोलीकडे निघाली होती.सकाळी १० वाजता सुमारास खोपटा गावाजवळ रस्त्यावरुन जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसने एका मालवाहु टेम्पोसह तीन दुचाकींना जोरदार धडक दिली.या अपघातात रस्त्याच्या पलीकडे असलेल्या अमेयला कंपनीत सर्व्हेअर म्हणून काम करीत असलेले खोपटा येथील रहिवासी मोटार सायकलस्वार निलेश शशिकांत म्हात्रे (३३) यांचा मृत्यू झाला.तर त्याचा अन्य सहकारी केशव ठाकूर (५४) आणि अन्य एक इसम गंभीररीत्या जखमी झाले आहेत.त्यांना उपचारासाठी नवीमुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. 

अपघातात रहिवाशांचाच मृत्यू आणि जखमी झालेले असल्याची माहिती मिळताच संतप्त झालेल्या खोपटा ग्रामस्थांनी रस्त्यावर धावणारी वाहतुकच बंद करून रास्ता रोको केले.एनएमएमटी व्यवस्थापन मृत आणि जखमी झालेल्या इसमांच्या कुटुंबातील आर्थिक नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेत नाही आणि त्यांना न्याय हक्क मिळत नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन मागे घेतले जाणार नाही.उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम,उरण वाहतूक नियंत्रण शाखेचे उपनिरीक्षक संजय पवार यांनी रास्तारोकोमुळे वाहतुकीवर होणाऱ्या परिणामांची माहिती देऊन ग्रामस्थांना देऊन परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.मात्र जमावाने त्यांना दाद दिली नाही.त्यामुळे खोपटा पुल ते मोठीजुई आणि धुतुम दरम्यान रस्त्यांवर आठ किलोमीटर अंतरापर्यंत हजारो वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.यामुळे मात्र मोठ्या प्रमाणावर झालेल्या वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहतूकीचा सहा तास खोळंबा झाला.यामुळे मात्र वाहतूकदार, कामगार, विद्यार्थी, प्रवासी यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली.

ग्रामस्थांनी घेतलेल्या या ठाम भूमिकेमुळे गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासूनच सुमारे सहा तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.या रास्तारोकोमुळे खोपटा पुल - मोठीजुई आणि खोपटा -धुतुम दरम्यान आठ किलोमीटर अंतरापर्यंत हजारो वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.यामुळे मात्र मोठ्या प्रमाणावर झालेल्या वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहतूकीचा सहा तास खोळंबा झाला आहे.दरम्यान लोकप्रतिनिधी,एनएमएमटी व्यवस्थापनाचे अधिकारी, पोलिस, ग्रामस्थ यांच्यात मृत व जखमींना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी बैठकीत चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईBus DriverबसचालकAccidentअपघात