शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

नियंत्रण सुटलेल्या NMMT बसची टेम्पोसह तीन दुचाकींना धडक, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 16:42 IST

संतप्त ग्रामस्थांचा रास्तारोको, वाहतूक खोळंबली; हजारो वाहनांच्या आठ किलोमीटरपर्यंत रांगा

मधुकर ठाकूर, उरण: नियंत्रण सुटलेल्या एनएमएमटी बसने उरणच्या खोपटा रस्त्यावरील मालवाहु टेम्पोसह तीन दुचाकींना धडक दिली.या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.तर दोघेजण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.गुरुवारी सकाळीच घडलेल्या अपघातामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको केले.यामुळे मात्र खोपटा पुल ते मोठीजुई आणि धुतुम दरम्यान आठ किलोमीटर अंतरापर्यंत हजारो वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.यामुळे मात्र मोठ्या प्रमाणावर झालेल्या वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहतूकीचा सहा तास खोळंबा झाला.

नवी मुंबई परिवहन सेवेची एक वातानुकूलित प्रवासी बस प्रवाशांना घेऊन वाशीहून कोप्रोलीकडे निघाली होती.सकाळी १० वाजता सुमारास खोपटा गावाजवळ रस्त्यावरुन जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसने एका मालवाहु टेम्पोसह तीन दुचाकींना जोरदार धडक दिली.या अपघातात रस्त्याच्या पलीकडे असलेल्या अमेयला कंपनीत सर्व्हेअर म्हणून काम करीत असलेले खोपटा येथील रहिवासी मोटार सायकलस्वार निलेश शशिकांत म्हात्रे (३३) यांचा मृत्यू झाला.तर त्याचा अन्य सहकारी केशव ठाकूर (५४) आणि अन्य एक इसम गंभीररीत्या जखमी झाले आहेत.त्यांना उपचारासाठी नवीमुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. 

अपघातात रहिवाशांचाच मृत्यू आणि जखमी झालेले असल्याची माहिती मिळताच संतप्त झालेल्या खोपटा ग्रामस्थांनी रस्त्यावर धावणारी वाहतुकच बंद करून रास्ता रोको केले.एनएमएमटी व्यवस्थापन मृत आणि जखमी झालेल्या इसमांच्या कुटुंबातील आर्थिक नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेत नाही आणि त्यांना न्याय हक्क मिळत नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन मागे घेतले जाणार नाही.उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम,उरण वाहतूक नियंत्रण शाखेचे उपनिरीक्षक संजय पवार यांनी रास्तारोकोमुळे वाहतुकीवर होणाऱ्या परिणामांची माहिती देऊन ग्रामस्थांना देऊन परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.मात्र जमावाने त्यांना दाद दिली नाही.त्यामुळे खोपटा पुल ते मोठीजुई आणि धुतुम दरम्यान रस्त्यांवर आठ किलोमीटर अंतरापर्यंत हजारो वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.यामुळे मात्र मोठ्या प्रमाणावर झालेल्या वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहतूकीचा सहा तास खोळंबा झाला.यामुळे मात्र वाहतूकदार, कामगार, विद्यार्थी, प्रवासी यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली.

ग्रामस्थांनी घेतलेल्या या ठाम भूमिकेमुळे गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासूनच सुमारे सहा तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.या रास्तारोकोमुळे खोपटा पुल - मोठीजुई आणि खोपटा -धुतुम दरम्यान आठ किलोमीटर अंतरापर्यंत हजारो वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.यामुळे मात्र मोठ्या प्रमाणावर झालेल्या वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहतूकीचा सहा तास खोळंबा झाला आहे.दरम्यान लोकप्रतिनिधी,एनएमएमटी व्यवस्थापनाचे अधिकारी, पोलिस, ग्रामस्थ यांच्यात मृत व जखमींना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी बैठकीत चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईBus DriverबसचालकAccidentअपघात