शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

जिल्ह्यात पाणीटंचाईवर पर्यायी व्यवस्था; संस्था, लोकप्रतिनिधी मदतीसाठी सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 23:28 IST

विविध उपक्रम : वावंढळ येथे ग्रामस्थांनी के लीबोअरिंगची दुरुस्ती

मोहोपाडा : पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने व बेकायदा पाणीपुरवठा केल्यामुळे वावंढळ या कोयना प्रकल्पग्रस्त वसाहतीबरोबर इतरही वाड्यांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील महिला आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. काही ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन जुन्या बोअरिंग दुरुस्तीस प्राधान्य दिले आहे.

वावंढळ या महसुली गावात कोयना प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतीचे स्वखर्चाने पुनर्वसन झाले आहे. या प्रकल्पग्रस्त वसाहतीत एकूण पाच योजना मंजूर झाल्या, या पाचही योजना नियोजनशून्य व हुकूमशाही पद्धतीने राबविल्या आहेत, असे ग्रामस्थांचे मत आहे. परिपूर्ण पाणी उपलब्ध नसताना या योजना ग्रामपंचायतींच्या माथी मारल्या आहेत. चौथ्या योजनेसाठी माजी आ. देवेंद्र साटम यांनी भिलवले धरणाचे पाणी उचलण्यासाठी विधिमंडळात प्रश्न उपस्थित करून तत्कालीन पाटबंधारे मंत्री पद्मसिंह पाटील यांच्याकडून मंजुरी घेतली होती. मात्र, हेही पाणी पावसाळा सुरू होण्यापूर्वी मृतसाठा होते, शिवाय गावापासून चार कि.मी. अंतरावर असल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या पंप व विद्युत पुरवठा यांची शक्ती कमी होते.

ही येणारी पाइपलाइन नदीतून असल्याने दर पावसाळ्यात पुरात वाहून जाते. विद्युत केबल व पंप यांची चोरी नियमित होत असल्याने ही योजना बंद झाली. गावतळ्यात अस्तित्वात असलेल्या योजनेसाठी शिवकालीन तलावाची दुरुस्ती करून त्याची खोली वाढविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी सूचित केले होते, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने जांब्रूक व बौद्धवाडाबरोबर वावंढळवाडी, वावंढळगाव येथे तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

अनुसूचित जाती-जमाती आणि बौद्ध आयुर्विमा कर्मचारी कल्याणकारी संघटना ठाणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमानेकर्जत तालुक्यातील टंचाईग्रस्त आदिवासी भागात दहा टँकर पाणी विहिरीमध्ये सोडण्यास सुरुवात केली आहे. कर्जत तालुक्यातील बांगरवाडीमध्ये गेली पाच वर्षे सातत्याने एलआयसी कामगार संघटना पिण्याचे पाणी देण्याचे काम करीत आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळ प्रत्येक वेळी सामाजिक बांधिलकीची जोपसना करताना आपण पाहतो. अनेक वेळा कर्जत तालुक्यातील आदिवासी भागात पाणीटंचाई काळात आदिवासी बांधवांची तहान भागविण्याचे काम एलआयसीने केले आहे. कर्जत तालुक्यातील काठेवाडी गावात एलआयसीने पाच हजार लीटरची पाण्याची टाकी बसवली आहे.

तर बांगरवाडी आणि ताडवाडी येथील विहिरीमध्ये टँकरचे पाणी सोडून भारतीय आयुर्विमा महामंडळाने आदिवासी बांधवांची जल पॉलिसी काढून त्यांना विमा संरक्षण दिले आहे. ग्रामस्थांनी भारतीय आयुर्विमा महामंडळाचे आणि एससी-एसटी संघटनेचे आभार मानले आणि पाऊस पडेपर्यंत या वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी विनंती केली.

बांगरवाडीमध्ये पाण्याचा टँकर ओतताना एलआयसीच्या या सामाजिक उपक्रमात खोपोली शाखेचे मॅनेजर सुनील भोसले, प्रशासनिक अधिकारी आशिष झुंजारराव, विकास अधिकारी लता भगत, संघटनेचे सचिव राजेश गायकवाड यांच्यासह एलआयसीला मदत करणारे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सीताराम बांगर, मंजुळा गावंडा आदीसह ताडवाडी, बांगरवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Waterपाणी