शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

अलिबाग-मुरुड एसटी ब्रेकडाउन; विद्यार्थ्यांची चार किलो मीटर पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 5:04 AM

शाळेत, महाविद्यालयात व आरटीआयसाठी मुरुडला पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना चार किलोमीटरची पायपीट करावी लागली.

बोर्ली-मांडला : अलिबागहून मुरुडकडे सकाळी ६:१५ वाजता सुटणारी एसटी मंगळवारी ब्रेकडाउन झाली. याचा फटका वृत्तपत्र विक्रेत्यांना, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, कोर्लई येथून येणाऱ्या भाजीविक्रेत्यांना बसला. शाळेत, महाविद्यालयात व आरटीआयसाठी मुरुडला पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना चार किलोमीटरची पायपीट करावी लागली.मुरुड एसटी डेपोची पार दुरवस्था झाली आहे. सर्व जुन्या बस भंगारात काढण्याच्या लायक आहेत आणि सर्व बस नवीन आणणे गरजेचे आहे. या जुन्या झालेल्या बसमुळे वारंवार या बस नादुरुस्त होत असतात. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरित परिणाम होतो, कारण वेळेत न पोहोचल्यामुळे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होते. अशीच घटना २८ जानेवारी रोजी घडली. मंगळवारी सकाळी ६:१५ वाजता अलिबाग येथून सुटणारी मुरुड एसटी बस नेहमीप्रमाणे सुटली. या गाडीला नेहमी वर्दळ असते, याच गाडीत मुरुडसाठी येणाºया वर्तमानपत्रांचे गठ्ठेसुद्धा असतात. कोर्लई येथून अनेक भाजीविक्रे त्या महिलांची गर्दी, तसेच नांदगाव, मुरुड या ठिकाणी शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी यांची गर्दी रोजच होत असते. ही गाडी सर्वे गावचा अवघड घाट चढल्यानंतर उतरत असताना अचानक ब्रेकडाउन झाली. यामुळे या बसने प्रवास करणाऱ्यांचा खोळंबा झाला. या वेळी वाहक, चालक यांनी मुरुड आगाराशी संपर्क करून ब्रेकडाउन झालेल्या गाडीबद्दल सांगितले. त्या वेळी लवकरच नेहमीप्रमाणेगाडीची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र, दुसºया गाडीची वाट पाहूनही बस येत नसल्याने अखेर सर्व विद्यार्थ्यांनी चार ते पाच किलोमीटर पायपीट करीत कसेबसे नांदगाव गाठले. तेथून खासगी वाहनाने मुरुडला जाऊन शाळा, महाविद्यालय, आयटीआयला पोहोचले. उशिरा पोहोचल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान झाले. याच गाडीत असणारे वृत्तपत्र उशिरा पोहोचल्याने विक्रेत्यांना नाहक भुर्दंड सोसावा लागला.हीच बस बंद पडत नाही, तर या आगारातील अनेक फेºया मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे अशा अनेक बसेस वारंवार बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. २३ नोव्हेंबर रोजी प्रवासी संघटनांनी मिळून आगार व्यवस्थापकांना भेटून या संदर्भात जाब विचारला असता, एका महिन्यात आगार सुस्थितीत करतो, असे वचन दिले होते; परंतु दोन महिने उलटले तरी, ‘येरे माझ्या मागल्या’ अशी परिस्थिती आजही आहे.काही दिवसांपूर्वी मुरुड आगाराला राज्यात सर्वाधिक इंधन बचत म्हणून ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळाले; पण या आगाराच्या गाड्या सतत बंद पडल्याने इंधनाची सर्वाधिक बचत झाली असल्याचे बोलले जाते आहे.

टॅग्स :Raigadरायगड