शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

अलिबागला रेल्वे आणणे हादेखील एक जुमलाच- सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 23:56 IST

लोकसभेच्या निवडणुकीत २०१४ मध्ये सत्तेवर येण्यापूर्वी भाजपाने घोषणांचा पाऊस पाडला आणि सत्तेवर आल्यावर ‘ ती तर जुमलेबाजी..’

अलिबाग : लोकसभेच्या निवडणुकीत २०१४ मध्ये सत्तेवर येण्यापूर्वी भाजपाने घोषणांचा पाऊस पाडला आणि सत्तेवर आल्यावर ‘ ती तर जुमलेबाजी..’ होती असे भाजपामधील मंत्रीच सांगत आहेत. त्याचप्रमाणे अलिबागला रेल्वे आणणे, हादेखील एक जुमलाच असल्याने हीच जुमलेबाजी बुमरँग होऊन भाजपा सरकारवर कोसळणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी येथे केले. अलिबाग येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.भाजपाने जुमलेबाजी करून मतदारांची दिशाभूल केली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना किंमत चुकती करावी लागणार आहे. रायगड लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार तथा केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी गेल्या साडेचार वर्षांत ठोस विकासात्मक एकही काम केलेले नसल्याने त्यांचे कर्तृत्व शून्य आहे, त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत त्यांना नमो मोदीचा जप करावाच लागेल, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. अलिबाग लोकल आणण्याचे गीते यांनी सांगितले ते अद्याप पूर्ण झालेले नसताना, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आता अलिबागला पॅसेंजर आणण्याचे जाहीर करणे हास्यास्पद आहे. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आश्वासने देण्यात येत असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.आघाडी सरकाच्या १५ वर्षांच्या कालावधीत असंख्य विकासकामे झाली आहेत. जुन्या योजनांना नवीन नावे देऊन त्या योजना अमलात आणण्याचेच काम आताच्या युती सरकारने केले आहे. भारतीय संविधानानेच प्रत्येक आमदारांना विकासकामे करण्यासाठी विशिष्ट निधी देऊ केला आहे. सरकारमध्ये असणारेच त्याचे वाटप करतात; परंतु सत्ताधारी आणि विरोधी आमदार यांच्यामध्ये सर्वाधिक निधी कोणी आणला याला महत्त्व आहे. राजशिष्टाचाराने केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री हे पद तुलनात्मक एकाच दर्जाचे आहे. त्यामुळे खासदार गीते यांनी विकासकामांसाठी किती निधी आणला हे सांगणे गरजेचे आहे.निवडणुकीच्या तोंडावरच कंपन्यांकडून सीएसआर फंड घेऊन विकासकामे का केली जात आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित करून गेल्या साडेचार वर्षांत रुग्णवाहिका जनतेला अर्पण करण्यासाठी का प्रयत्न केले नाहीत, याचेही उत्तर गीते यांना द्यावे लागणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. एकमेकांवर केवळ टीका आणि टिप्पणी करण्यातच शिवसेना आणि भाजपाची साडेचार वर्षे फुकट गेल्याचेही त्यांनी सांगितले.>लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खोटा प्रचाररत्नागिरी जिल्ह्यातील नाणार प्रकल्प रद्द करून तो रायगडकरांच्या माथी मारला जात आहे आणि त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे, असे चित्र सध्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जाणून बुजून निर्माण केले जात आहे. माझी उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नसताना विरोधकांनी मला किती गंभीरपणे घेतले आहे. हेच यावरून स्पष्ट होते, असेही तटकरे यांनी सांगितले.सिडकोने अद्यापही रायगड जिल्ह्यातील ४० गावांतील जमिनीचे संपादन केलेले नाही. येथील औद्योगिक वसाहतीमध्ये नेमका कोणता प्रकल्प येणार आहे, याबाबत सरकारने काहीच जाहीर केलेले नाही. त्यामुळे नेमका कोणत्या प्रकल्पाला विरोध करायचा हे सांगता येत नाही. मात्र, रायगड जिल्ह्यामध्ये एकही रासायनिक प्रकल्प नको, हे या आधीही ठणकावून सांगितले असल्याची आठवण त्यांनी करून दिली.>टोलमुक्त महाराष्ट्र करण्याची भाषा कोणाचीमुंबई-गोवा महामार्गाला टोल बसवण्यात येणार असल्याचे मध्यंतरी खासदार गीते यांनीच स्पष्ट केले होते; परंतु टोलमुक्त महाराष्ट्र करण्याची भाषा शिवसेनेनेच केली होती, त्यामुळे गीते यांचे विधान संभ्रम निर्माण करणारे आहे. टोलमुक्त करण्यासाठी मलाच केंद्रात जावे लागणार आहे आणि त्याच वेळी मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.>अलिबागमधील नाराज गट लवकरच आघाडीच्या ट्रॅकवरआघाडीमध्ये शेकापने सोबत केल्याने निश्चितपणे पारडे जड झाले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर गेलेल्या सहकाऱ्यांना जवळ घेतले जाईल. त्यासाठी योग्य वेळी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट करून अलिबागमधील नाराज झालेले काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर हे लवकरच आघाडीच्या ट्रॅकवर लवकरच येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पेण तालुक्यातील माजी मंत्री रवींद्र पाटील हे भाजपाच्या ट्रॅकवर गेले असल्याने तेथील उर्वरित काँग्रेसलाही आघाडीच्या ट्रॅकवर आणण्यात यशस्वी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.