शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

अलिबागमध्ये एकाच रात्रीत चार घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 02:08 IST

तालुक्यातील हाशिवरे-रेवस पट्ट्यातील गावांमध्ये रविवारची रात्र हादरवणारी ठरली. चोरट्यांनी सलग चार घरे फोडून लाखो रुपयांची रोकड आणि लाखो रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. पोयनाड हद्दीतील ज्वेलरीचे दुकान फोडून तेथील चांदीच्या दागिन्यांची चोरी केली. या घटनेने गावांतील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

अलिबाग : तालुक्यातील हाशिवरे-रेवस पट्ट्यातील गावांमध्ये रविवारची रात्र हादरवणारी ठरली. चोरट्यांनी सलग चार घरे फोडून लाखो रुपयांची रोकड आणि लाखो रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. पोयनाड हद्दीतील ज्वेलरीचे दुकान फोडून तेथील चांदीच्या दागिन्यांची चोरी केली. या घटनेने गावांतील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांनी शहराकडील मोर्चा वळवून आता थेट ग्रामीण भागांना लक्ष्य केल्याने शहरांबरोबरच ग्रामीण भागही सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. मांडवा पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.शहरी भागांमध्ये चोरट्यांचा असणारा धुमाकूळ आता ग्रामीण भागाकडे वळला असल्याने पोलिसांसमोर पुन्हा एकदा आव्हान उभे राहिले आहे. सध्या हिवाळा सुरु असल्याने कडाक्याची थंडी पडली आहे. चोरट्यांनी याचाच फायदा घेत घरफोडीचा प्लॅन सहज पूर्ण केला आहे. रविवारी रात्री जगन्नाथ पाटील यांच्या घरात शिरुन चोरट्यांनी कपाटातील १० हजार रुपये आणि तब्बल ११ तोळे सोने चोरले. अलिबाग तालुका पंचायत समितीचे माजी सभापती अनिल गोमा पाटील यांच्या घरातही चोरट्यांनी हात साफ केला आहे. पाटील यांच्या घरातील सर्वजण कार्यक्रमानिमित्त बाहेर गेले होते. तसेच पाटील यांच्या अन्य दोन भावांच्या घरातही चोरी केली. चोरट्यांनी घराचे कडीकोयंडा उचकटून त्यांच्या घरात प्रवेश केला. पाटील यांच्यासह त्यांच्या भावाच्या घरातील ५० हजार रोख, १३ सोन्याच्या अंगठ्या किंमत ९० हजार रुपये, कानातील सोन्याचे तीन जोड २० हजार रुपये किमतीचे, एक तोळे सोने, १० हजार रुपये किमतीची दोन घड्याळे, सुरेंद्र पाटील यांच्या घरातील दोन हजार रुपये आणि अनिल यांचे मोठे बंधू जगन्नाथ पाटील यांच्या घरातील दोन लाख १० हजार किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेले. त्याचप्रमाणे फुफादेवीचा पाडा येथील बंद घरातील लाखो रुपयांचे दागिने चोरट्यांनी लांबविले आहेत.पोयनाड पोलीस ठाणे हद्दीतील सौभाग्य ज्वेलर्सही चोरट्यांनी फोडले आहे. त्या दुकानातील चांदी मोठ्या प्रमाणात चोरली आहे. सोने ज्या तिजोरीत ठेवण्यात आले होते त्याचे लॉक भक्कम असल्याने चोरट्यांना ते तोडता आले नाही.पोलिसांचा वचक राहिला नाहीजिल्ह्यात गेल्यावर्षी तब्बल २३२ घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. त्यातील ७० गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. यावर्षीही घरफोडीचा आलेख वाढत असल्याने पोलिसांचा वचक कमी तर झाला नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.ग्रामीण भागाकडे चोरट्यांचा मोर्चा -जिल्ह्यामध्ये चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. जिल्ह्याच्या शहरी भागांमध्ये सातत्याने चोरीच्या घटना घडतात. मात्र ग्रामीण भागामध्ये त्याचे प्रमाण कमी होते. चोरट्यांनी आता आपला मोर्चा ग्रामीण भागांकडे वळवला आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. चोरट्यांना पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे. लवकरच त्यांना गजाआड केले जाईल, असे सहायक पोलीस निरीक्षक एम.आर.बुरांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.अनिल गोमा पाटील यांच्या घरापासून काही अंतरावर दारुच्या बाटल्या आणि काही पदार्थ पडल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे चोरट्यांनी चांगलीच जंगी पार्टी केली असावी अथवा त्यांचे काही साथीदार तेथे थांबले असावेत, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. चोरीमागे मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा