शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
3
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
4
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
5
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
6
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
7
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
8
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
9
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
10
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
11
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
12
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
13
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
14
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
15
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
16
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
17
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
18
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
19
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
20
नांदेड हादरलं! लग्नानंतरही 'प्रेयसी'ला भेटायला गेला बॉयफ्रेंड, सासरच्यांनी पकडलं; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत ढकललं

समुद्र खवळल्याने रायगड किनारपट्टीवर सतर्कता; मॅन डौंस चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 08:36 IST

चक्रीवादळ तयार झाल्याने समुद्र खवळला असून त्याचा परिणाम हा रायगड किनारपट्टीलाही होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : ऐन थंडीत रायगडकरांना पुढील चार दिवसांत मेघगर्जनेसह मध्यम ते हलका अवकाळी पाऊस अनुभवास मिळण्याची शक्यता आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरावर मॅन डौंस हे चक्रीवादळ तयार झाल्याने समुद्र खवळला असून त्याचा परिणाम हा रायगड किनारपट्टीलाही होणार आहे. हवामान विभागाने याबाबत माहिती दिली असून जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. 

नैऋत्य बंगालच्या उपसागरावर मॅन डौंस हे चक्रीवादळ शनिवारी संध्याकाळी १० किमी प्रतितास वेगाने वायव्य दिशेला केंद्रस्थानी होते. ९ डिसेंबरपासून दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावरील पुड्डुचेरीच्या किनाऱ्यापासून वायव्येकडे सरकून ७५ ते ८५ किमी प्रतितास वेगाने उत्तर तामिळनाडू ओलांडण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस आकाश ढगाळ राहणार असल्याने रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

जिल्हाधिकारी नियंत्रण कक्षजिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांनी व नागरिकांनी सतर्क रहावे. कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी जवळच्या तहसील कार्यालय, पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाच्या ०२१४१-२२२०९७/८२७५१५२३६३  अथवा टोल फ्री क्रमांक ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रशासनाने सूचित केले आहे.

खोल समुद्रात जाऊ नकासमुद्र खवळलेल्या स्थितीत असल्याने मच्छीमारांनी मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनी पिके मळणी, कापणीसाठी तयार असतील तर पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. फळे भाजीपाला, शेत पिकांची सुरक्षित ठेवण करावी. जनावरे देखील सुरक्षित ठिकाणी बांधावीत. अतिवृष्टीमुळे सखल भागात काही प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता राहील. मेघगर्जनेसह वादळीवारे व मध्यम ते हलका पाऊस असल्याने विजा चमकण्याची व पडण्याची शक्यता आहे. गडगडाटी वाऱ्यासह पाऊस पडत असताना नागरिकांनी खुल्या व मोकळ्या भागात थांबू नये. विजेचे खांब, झाडे इ. ठिकाणी उभे राहू नये. विद्युत उपकरणांपासून दूर रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केले आहे. 

वर्तविली पावसाची शक्यताहवामानाच्या बदललेल्या परिस्थितीमुळे १० डिसेंबरपासून पुढील ४ ते ५ दिवसांमध्ये महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्याअनुषंगाने रायगड जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

टॅग्स :Raigadरायगड