शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

समुद्र खवळल्याने रायगड किनारपट्टीवर सतर्कता; मॅन डौंस चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 08:36 IST

चक्रीवादळ तयार झाल्याने समुद्र खवळला असून त्याचा परिणाम हा रायगड किनारपट्टीलाही होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : ऐन थंडीत रायगडकरांना पुढील चार दिवसांत मेघगर्जनेसह मध्यम ते हलका अवकाळी पाऊस अनुभवास मिळण्याची शक्यता आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरावर मॅन डौंस हे चक्रीवादळ तयार झाल्याने समुद्र खवळला असून त्याचा परिणाम हा रायगड किनारपट्टीलाही होणार आहे. हवामान विभागाने याबाबत माहिती दिली असून जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. 

नैऋत्य बंगालच्या उपसागरावर मॅन डौंस हे चक्रीवादळ शनिवारी संध्याकाळी १० किमी प्रतितास वेगाने वायव्य दिशेला केंद्रस्थानी होते. ९ डिसेंबरपासून दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावरील पुड्डुचेरीच्या किनाऱ्यापासून वायव्येकडे सरकून ७५ ते ८५ किमी प्रतितास वेगाने उत्तर तामिळनाडू ओलांडण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस आकाश ढगाळ राहणार असल्याने रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

जिल्हाधिकारी नियंत्रण कक्षजिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांनी व नागरिकांनी सतर्क रहावे. कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी जवळच्या तहसील कार्यालय, पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाच्या ०२१४१-२२२०९७/८२७५१५२३६३  अथवा टोल फ्री क्रमांक ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रशासनाने सूचित केले आहे.

खोल समुद्रात जाऊ नकासमुद्र खवळलेल्या स्थितीत असल्याने मच्छीमारांनी मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनी पिके मळणी, कापणीसाठी तयार असतील तर पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. फळे भाजीपाला, शेत पिकांची सुरक्षित ठेवण करावी. जनावरे देखील सुरक्षित ठिकाणी बांधावीत. अतिवृष्टीमुळे सखल भागात काही प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता राहील. मेघगर्जनेसह वादळीवारे व मध्यम ते हलका पाऊस असल्याने विजा चमकण्याची व पडण्याची शक्यता आहे. गडगडाटी वाऱ्यासह पाऊस पडत असताना नागरिकांनी खुल्या व मोकळ्या भागात थांबू नये. विजेचे खांब, झाडे इ. ठिकाणी उभे राहू नये. विद्युत उपकरणांपासून दूर रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केले आहे. 

वर्तविली पावसाची शक्यताहवामानाच्या बदललेल्या परिस्थितीमुळे १० डिसेंबरपासून पुढील ४ ते ५ दिवसांमध्ये महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्याअनुषंगाने रायगड जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

टॅग्स :Raigadरायगड