शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
7
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
8
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
9
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
10
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
11
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
12
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
13
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
14
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
15
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
16
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
17
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
18
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
19
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
20
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

समुद्र खवळल्याने रायगड किनारपट्टीवर सतर्कता; मॅन डौंस चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 08:36 IST

चक्रीवादळ तयार झाल्याने समुद्र खवळला असून त्याचा परिणाम हा रायगड किनारपट्टीलाही होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : ऐन थंडीत रायगडकरांना पुढील चार दिवसांत मेघगर्जनेसह मध्यम ते हलका अवकाळी पाऊस अनुभवास मिळण्याची शक्यता आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरावर मॅन डौंस हे चक्रीवादळ तयार झाल्याने समुद्र खवळला असून त्याचा परिणाम हा रायगड किनारपट्टीलाही होणार आहे. हवामान विभागाने याबाबत माहिती दिली असून जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. 

नैऋत्य बंगालच्या उपसागरावर मॅन डौंस हे चक्रीवादळ शनिवारी संध्याकाळी १० किमी प्रतितास वेगाने वायव्य दिशेला केंद्रस्थानी होते. ९ डिसेंबरपासून दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावरील पुड्डुचेरीच्या किनाऱ्यापासून वायव्येकडे सरकून ७५ ते ८५ किमी प्रतितास वेगाने उत्तर तामिळनाडू ओलांडण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस आकाश ढगाळ राहणार असल्याने रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

जिल्हाधिकारी नियंत्रण कक्षजिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांनी व नागरिकांनी सतर्क रहावे. कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी जवळच्या तहसील कार्यालय, पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाच्या ०२१४१-२२२०९७/८२७५१५२३६३  अथवा टोल फ्री क्रमांक ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रशासनाने सूचित केले आहे.

खोल समुद्रात जाऊ नकासमुद्र खवळलेल्या स्थितीत असल्याने मच्छीमारांनी मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनी पिके मळणी, कापणीसाठी तयार असतील तर पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. फळे भाजीपाला, शेत पिकांची सुरक्षित ठेवण करावी. जनावरे देखील सुरक्षित ठिकाणी बांधावीत. अतिवृष्टीमुळे सखल भागात काही प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता राहील. मेघगर्जनेसह वादळीवारे व मध्यम ते हलका पाऊस असल्याने विजा चमकण्याची व पडण्याची शक्यता आहे. गडगडाटी वाऱ्यासह पाऊस पडत असताना नागरिकांनी खुल्या व मोकळ्या भागात थांबू नये. विजेचे खांब, झाडे इ. ठिकाणी उभे राहू नये. विद्युत उपकरणांपासून दूर रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केले आहे. 

वर्तविली पावसाची शक्यताहवामानाच्या बदललेल्या परिस्थितीमुळे १० डिसेंबरपासून पुढील ४ ते ५ दिवसांमध्ये महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्याअनुषंगाने रायगड जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

टॅग्स :Raigadरायगड