शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

मुरुड तालुक्यातील शेती गेली पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 02:16 IST

शेतकरी चिंतेत : एका दिवसात १८५ मिलीमीटर पावसाची नोंद

मुरुड : तालुक्यात मागील काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवार ३ सप्टेंबर रोजी फक्त एका दिवसात १८५ मिलीमीटर एवढा पाऊस पडल्याने सर्वच ठिकाणी पाणीच पाणी साचले आहे. तहसील कार्यालयामार्फत बुधवारी सकाळी आठ वाजता पाऊस मोजण्यात आला, त्यावेळी सर्वात विक्रमी पाऊस मुरुड तालुक्यात पडला असल्याचे कळवण्यात आले आहे. मुरुड तालुक्यात आतापर्यंत ३२९९ मिलीमीटर एवढा पाऊस झाला. बघता बघता पावसाने तीन हजारचा टप्पा पार केला आहे. बुधवारी पावसाचा जोर कायम असून शेतामध्ये पाणीच पाणी झाले आहे. आलेले सर्व भात पीक पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

मुरुड शहरात सर्वच ठिकाणी पाणी साचले होते. बाजारपेठ, आझाद चौक, अंजुमन हायस्कूल, गोलबंगला व अन्य ठिकाणी भरपूर प्रमाणात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.गणपती उत्सवानिमित्त ग्रामीण भागातील बहुसंख्य लोक खरेदी करण्यासाठी बाजारात आले असता मुसळधार पावसाने ते गावात जाण्यासाठी अडकून पडले होते. दीड दिवसाचे गणपती विसर्जन हे सुद्धा पावसात भिजत जाऊन करण्यात आले. त्यामुळे पडणाऱ्या या सतत धार पावसाळा स्थानिक जनता हैराण झाली आहे. पाऊस सारखाच सुरु असल्याने पावसाचे पाणी निचरा न झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. शेतामधील पाणी सुद्धा कमी न होता ते वाढतच आहे. कारण पाऊस विश्रांती घेत नसल्याने पाण्याचे प्रमाण वाढतच चालेले आहे. आंबोली धरण दुथडी भरून वाहत आहे. हे धोरण ओव्हरपलो झाले असून त्यामधून पाण्याचा विसर्ग होत आहे.यंदाच्या या पावसात मुरुड शहरात सर्वच ठिकाणी पाणी साचल्याने मानव अधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जाहिद फकजी यांनी संताप व्यक्त केला आहे. मुरुड शहरातील बाजारपेठे भागात तर गटारांची खोदाईच झाली नाही.त्यामुळे सर्व पाणी रस्त्यावर येऊन थांबल्याने रस्तेसुद्धा मोठ्या प्रमाणात खराब होत आहेत.गटार खोदाईचे दरवर्षी लाखो रुपयांचा ठेका काढला जातो परंतु गटारांची खोदाईच बरोबर केली जात नाही. गटारांची खोदाई करत असताना नगरपरिषदेचा कोणताही अधिकारी उपस्थित न राहिल्याने संबंधित ठेकेदाराने काम बरोबर न करता पैसे लाटण्याचे काम के लेअसल्याचा आरोप फकजी यांनी के ला.मुरुड तालुक्यात मागील दोन दिवसापासून जोरदार पाऊस कोसळत आहे. परंतु कोणतीही अप्रिय घटना घडलेली नाही. सर्वाना सतर्कतेचे आव्हान करण्यात आले आहे. भालगाव मार्गावर एक वृक्ष उन्मळून पडला होता, तो सुद्धा बाजूला हटवण्यात येऊन वाहतूक सुरु केली आहे.- परीक्षीत पाटील, तहसीलदारमुरुड भालगाव मार्गे रोहा या रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडल्याने येथील वाहतूक ठप्प आहे. आमच्या आगारातून खाजणी पुलापर्यंत बस सुरू आहे.- युवराज कदम,आगार प्रमुख,मुरु ड

टॅग्स :Raigadरायगडraigad-pcरायगडRainपाऊसFarmerशेतकरी