शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

मुरुड तालुक्यातील शेती गेली पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 02:16 IST

शेतकरी चिंतेत : एका दिवसात १८५ मिलीमीटर पावसाची नोंद

मुरुड : तालुक्यात मागील काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवार ३ सप्टेंबर रोजी फक्त एका दिवसात १८५ मिलीमीटर एवढा पाऊस पडल्याने सर्वच ठिकाणी पाणीच पाणी साचले आहे. तहसील कार्यालयामार्फत बुधवारी सकाळी आठ वाजता पाऊस मोजण्यात आला, त्यावेळी सर्वात विक्रमी पाऊस मुरुड तालुक्यात पडला असल्याचे कळवण्यात आले आहे. मुरुड तालुक्यात आतापर्यंत ३२९९ मिलीमीटर एवढा पाऊस झाला. बघता बघता पावसाने तीन हजारचा टप्पा पार केला आहे. बुधवारी पावसाचा जोर कायम असून शेतामध्ये पाणीच पाणी झाले आहे. आलेले सर्व भात पीक पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

मुरुड शहरात सर्वच ठिकाणी पाणी साचले होते. बाजारपेठ, आझाद चौक, अंजुमन हायस्कूल, गोलबंगला व अन्य ठिकाणी भरपूर प्रमाणात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.गणपती उत्सवानिमित्त ग्रामीण भागातील बहुसंख्य लोक खरेदी करण्यासाठी बाजारात आले असता मुसळधार पावसाने ते गावात जाण्यासाठी अडकून पडले होते. दीड दिवसाचे गणपती विसर्जन हे सुद्धा पावसात भिजत जाऊन करण्यात आले. त्यामुळे पडणाऱ्या या सतत धार पावसाळा स्थानिक जनता हैराण झाली आहे. पाऊस सारखाच सुरु असल्याने पावसाचे पाणी निचरा न झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. शेतामधील पाणी सुद्धा कमी न होता ते वाढतच आहे. कारण पाऊस विश्रांती घेत नसल्याने पाण्याचे प्रमाण वाढतच चालेले आहे. आंबोली धरण दुथडी भरून वाहत आहे. हे धोरण ओव्हरपलो झाले असून त्यामधून पाण्याचा विसर्ग होत आहे.यंदाच्या या पावसात मुरुड शहरात सर्वच ठिकाणी पाणी साचल्याने मानव अधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जाहिद फकजी यांनी संताप व्यक्त केला आहे. मुरुड शहरातील बाजारपेठे भागात तर गटारांची खोदाईच झाली नाही.त्यामुळे सर्व पाणी रस्त्यावर येऊन थांबल्याने रस्तेसुद्धा मोठ्या प्रमाणात खराब होत आहेत.गटार खोदाईचे दरवर्षी लाखो रुपयांचा ठेका काढला जातो परंतु गटारांची खोदाईच बरोबर केली जात नाही. गटारांची खोदाई करत असताना नगरपरिषदेचा कोणताही अधिकारी उपस्थित न राहिल्याने संबंधित ठेकेदाराने काम बरोबर न करता पैसे लाटण्याचे काम के लेअसल्याचा आरोप फकजी यांनी के ला.मुरुड तालुक्यात मागील दोन दिवसापासून जोरदार पाऊस कोसळत आहे. परंतु कोणतीही अप्रिय घटना घडलेली नाही. सर्वाना सतर्कतेचे आव्हान करण्यात आले आहे. भालगाव मार्गावर एक वृक्ष उन्मळून पडला होता, तो सुद्धा बाजूला हटवण्यात येऊन वाहतूक सुरु केली आहे.- परीक्षीत पाटील, तहसीलदारमुरुड भालगाव मार्गे रोहा या रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडल्याने येथील वाहतूक ठप्प आहे. आमच्या आगारातून खाजणी पुलापर्यंत बस सुरू आहे.- युवराज कदम,आगार प्रमुख,मुरु ड

टॅग्स :Raigadरायगडraigad-pcरायगडRainपाऊसFarmerशेतकरी