शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

कृषी विभागाने गेल्या वर्षभरात बांधले 756 वनराई बंधारे

By निखिल म्हात्रे | Updated: May 31, 2024 14:16 IST

या पाण्याचा जिल्ह्यातील 1426 हेक्टरवरील शेती व आजूबाजूच्या परिसराला लाभ झाला आहे.

निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क,  अलिबाग - रायगड जिल्हयाच्या कृषी विभागाने गेल्या वर्षात एकूण 756 वनराई बंधारे बांधले आहेत. या बंधाऱ्यांमुळे 1788 टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. या पाण्याचा जिल्ह्यातील 1426 हेक्टरवरील शेती व आजूबाजूच्या परिसराला लाभ झाला आहे.

जिल्ह्यात पावसाला संपता संपताच पाण्याची टंचाई जाणवू लागते. पाण्याचे दुर्भिक्ष्य हे माणसासह प्राणी-पशुपक्षी आणि संपूर्ण परिसरावर परिणाम करते. यावर वनराई बंधारे ही संकल्पना प्रभावी ठरते. या वनराई बंधाऱ्यामुळे भूजल पातळीत वाढ होण्यास लाभ होतो. नाला किंवा ओढा यातील पाणी स्थानिक पातळीवर उपलब्ध होते. उन्हाळ्यात पाण्याचे स्त्रोत तळ गाठतात. त्यामुळे वनराई बंधारे शेतकर्‍यांसह पशु-पक्ष्यांसाठी वरदान ठरत ठरतात.

वाहत्या पाण्याच्या ठिकाणी सिमेंटच्या गोणींमध्ये माती भरुन बंधार्‍यांची निर्मिती केली तर पाण्याच्या पातळीत वाढ होऊन यातून पुढील अनेक दिवस गुराढोरांची तहान भागविली जाऊ शकते. त्याचप्रमाणे शेतकर्‍यांना शेती करणेदेखील सोयीचे होऊन त्यातून चांगली पिके घेता येतात.

गेल्या काही वर्षात गाव पातळीवर बंधारा बांधून पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना राबविली जात आहे. यामुळे वनराई बंधारे शेतकरी आणि पशु-पक्षांसाठी वरदान ठरत आहेत. पावसाळा संपताच पाण्याचे विविध स्त्रोत्र तळ गाठत असतात. मात्र, काही ठिकाणी हेच पाणी आपल्यासाठी मोठे वरदान ठरत आहे.

बंधारा वनराई संवर्धनाचे काम करतो, म्हणून यास वनराई बंधारा महटले जाते. बांधकाम सिमेंटची रिकामी पोती, माती, वाळू, दगड यांच्या साहाय्याने बांध घालून पाणी अडविता येते. यासाठी फारसा खर्च येत नाही. या बंधायामुळे जनावरे, पक्षी, जंगली प्राणी यांची तहान भागविण्यासाठी मोलाची मदत करणार आहे. यामुळे महत्त्व जाणून घेऊन बंधारा बांधून पाणी अडविले पाहिजे. यासाठी ग्रामपंचायतीने लक्ष घालून ही संकल्पना राबविणे महत्त्वाचे आहे.रायगड जिल्हयाच्या कृषी विभागातर्फे अलिबाग तालुक्यात 73 बंधारे बांधले असून त्यातून 80 टीसीएम, पेण तालुक्यात 58 बंधारे बांधले असून त्यातून 145 टीसीएम, खालापूर तालुक्यात 39 बंधारे बांधले असून त्यातून 97 टीसीएम, पनवेल तालुक्यात 48 बंधारे बांधले असून त्यातून 120 टीसीएम, कर्जत तालुक्यात 213 बंधारे बांधले असून त्यातून 532 टीसीएम, उरण तालुक्यात 27 बंधारे बांधले असून त्यातून 67.50 टीसीएम,  माणगाव तालुक्यात 102 बंधारे बांधले असून त्यातून 255 टीसीएम, रोहा तालुक्यात 32 बंधारे बांधले असून त्यातून 80 टीसीएम, तळा तालुक्यात 21 बंधारे बांधले असून त्यातून 52 टीसीएम, सुधागड तालुक्यात 37 बंधारे बांधले असून त्यातून 92 टीसीएम,  महाड तालुक्यात 24 बंधारे बांधले असून त्यातून 60 टीसीएम, पोलादपूर तालुक्यात 16 बंधारे बांधले असून त्यातून 35 टीसीएम, म्हसळा तालुक्यात 14 बंधारे बांधले असून त्यातून 35 टीसीएम,  श्रीवर्धन तालुक्यात 16 बंधारे बांधले असून त्यातून 40 टीसीएम असा एकूण सुमारे 1788 टीसीएम पाणी साठा उपलब्ध झाला आहे.कर्जत तालुक्यातील वनराई बंधाऱ्यांसाठी येथील सामाजिक संस्थांचे चांगले सहकार्य मिळत आहे. तसेच वनराई बंधाऱ्यांच्या पाण्यामुळे येथे भाजीपाल्याचे पिक घेतले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही वनराई बंधाऱ्यांचे महत्व कळले असून शेतकऱ्यांचेही त्यास चांगले सहकार्य मिळते. येथील कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एनजीअो आणि शेतकऱ्यांच्या मदतीने बनराई बंधारे बांधण्यात येत आहेत. - अशोक गायकवाड, कृषी अधिकारी, कर्जत.

टॅग्स :alibaugअलिबागforestजंगल