शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

नेरळ धरणाजवळील पुलाच्या कामाला वर्षभरानंतर मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 23:22 IST

४० लाखांचा निधी मंजूर, नेरळ विकास प्राधिकरण उभारणार ४० मीटरचा पूल

नेरळ : नेरळ धरणाजवळ असलेला लहान गतवर्षी पूल मार्च २०१८ मध्ये कोसळला होता. त्यामुळे परिसरातील मोहाचीवाडीसह अनेक वाड्यातील लोकांचा रस्ता बंद झाला होता. या पुलाच्या उभारणीसाठी ग्रामस्थांनी अनेकदा मागणी केली होती. अखेर वर्षभरानंतर पुलाच्या कामासाठी मुहूर्त सापडला असून नेरळ विकास प्राधिकरणने ४० लाखांचा निधी मंजूर केला आहे. दरम्यान, ४० मीटर लांबीच्या पुलाच्या कामाचा शुभारंभ शनिवारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

नेरळ येथील गणेश घाट परिसरात असलेल्या पादचारी पुलाचे स्लॅब कोसळल्याने पुलावरून होणारी वाहतूक बंद केली होती. पावसाळ्यात पुलाच्या पलीकडे राहणाऱ्या रहिवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून नेरळ ग्रामपंचायतने लोखंडी पुलाची उभारणी करून आदिवासी भागातील आणि मोहाचीवाडीमधील रहिवासी यांच्या जाण्याची व्यवस्था केली. मात्र, रहिवासी यांनी रायगड जिल्हा परिषद आणि नेरळ ग्रामपंचायतकडे पुलाची निर्मिती करण्याची मागणी केली होती.

पुलाची उभारणीसाठी जिल्हा परिषदेने नेरळ विकास प्राधिकरणमधून निधी मिळावा यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. पुलाच्या कामाचा शुभारंभ झाला असला ४० लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या पुलाचे काम चांगल्या दर्जाचे करावे, अशी मागणी परिसरातील नागरिक व आदिवासी बांधवांनी केली आहे.

सर्वसाधारण सभेत प्रस्तावास मंजुरी२८ मे रोजी रायगड परिषद सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी आठवड्याभरात पुलाच्या कामाला सुरुवात केली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार शनिवारी पुलाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी नेरळच्या सरपंच जान्हवी साळुंखे, उपसरपंच अंकुश शेळके, मानिवली ग्रामपंचायतचे सरपंच प्रवीण पाटील, तसेच श्रीराम राणे, वर्षा बोराडे, नेरळ ग्रामपंचायतचे सदस्य मंगेश म्हसकर, नीतेश शाह, सदानंद शिंगवा, माजी सदस्य जयवंत साळुंखे यांच्यासह प्रकाश पेमारे, दत्ता ठमके, प्रकाश डायरे आदी उपस्थित होते. सुरुवातीला नेरळ विकास प्राधिकरणचे उपअभियंता प्रवीण आचरेकर यांनी पुलाच्या कामाची माहिती दिली.