शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

सात वर्षांनंतर कालव्याला आले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 03:41 IST

वाशी ते निवी विभाग झाला थंडगार : संघर्ष, आंदोलन आणि अथक प्रयत्नांना आले यश

रोहा : मागील सहा-सात वर्षे कालव्याला पाणी नव्हते. निवी, तळाघर, लांढर, वाशी पूर्ण विभागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला. तसेच गुरेढोरे, पशूपक्षी, झाडंझुडपं, पोल्ट्री, विविध शेतीला पाणी मिळाले नाही. अवघ्या परिसराला अक्षरश: वाळवंटाचे स्वरूप आले. बोअरवेल, विहिरी आटल्या. कालव्याला सुरळीत पाणी सोडावे अशी मागणी सातत्याने झाली. पण कालव्याच्या पाण्याकडे कोणी लोकप्रतिनिधींनी लक्षच दिले नाही. विभागात पाण्यासाठी संघर्ष आंदोलन उभे राहिले. पाण्यासाठी संघर्षाची धार अधिक प्रभावी बनली. तरीही सलग दोन वर्षे यश आले नाही. सर्वस्तरातून सुरु असलेले प्रयत्न, ग्रामस्थांच्या अथक संघर्षातून अखेर यशस्वी होवून कालव्याला अखेर पाणी आले आहे.कोलाड पाटबंधारेच्या आंबेवाडी ते निवी भुवनेश्वर कालव्याला पाणी सोडावे. संपूर्ण विभाग पुन्हा सुजलाम सुफलाम व्हावा अशी मागणी सातत्याने झाली. त्याआधी कालव्याचे काम पूर्ण होऊ द्यात, मग तुम्हाला अखंड पाणी मिळेल हे पाटबंधारे विभागाचे आश्वासन होते. याउलट कालवा दुरुस्तीच्या नावाखाली नको तिथे मोऱ्या, कालव्याला काँक्र ीटीकरण करण्यात आले. त्यानंतरही पाणी सोडले गेले नव्हते.या कालव्याच्या दुरूस्ती कामांत लाखोंचा गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले. लांढर, उडदवणे हद्दीतील काँक्र ीट पावसात अक्षरश: वाहून गेले. यातूनच ग्रामस्थांतून संताप व्यक्त झाला. सहा-सात वर्षे कालव्याला पाणी नाही. त्यामुळे वाशी, लांढर, बोरघर, तळाघर, निवी सर्वच गावांत पाण्यासाठी कायम संघर्ष राहिला. कालव्याला पाणी सोडा ही मागणी जोर धरू लागली. शेतकरी संघटना, वाशी, तळाघर, वरसे ग्रामपंचायत प्रशासन, लोकप्रतिनिधींनी पाण्यासाठी पाठपुरावा केला. अशात कालव्याला पाणी येणार नाही हे लक्षात येताच ग्रामस्थांनी सर्वांनाच धारेवर धरले आणि सर्वांच्याच प्रयत्नातून अखेर मंगळवारी निवी भुवनेश्वरपर्र्यंतच्या कालव्याला पाणी आले आहे. कालव्याला पाणी सोडण्यासाठी पाटबंधारेचे कार्य. अभियंता धनंजय गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता श्वेता पाटील व सर्व अभियंता, कर्मचारी यांनी अथक प्रयत्न सुरू ठेवले.तब्बल महिनाभर कालव्यातील गाळ काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू होते. त्यासाठी अद्ययावत यंत्रणा सज्ज झाली. त्यात कालव्याचे पाणी पुढे सरकताच संभे, किल्ला व अनेक ठिकाणी गळती झाली. त्यावरही अधिकाºयांनी मात केली. वाशी, लांढर, तळाघर, निवी ग्रामस्थांनी संभे ग्रामस्थांशी पाण्याबाबत चर्चा केली. त्यांनीही पाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला. अखेर मंगळवारी सकाळी कालव्याचे पाणी शेवटच्या टोकातील निवी भुवनेश्वरपर्यंत आले.कालव्याला पाणी आल्याचे दिसताच सबंध विभागात आनंदोत्सव साजरा झाला. गुरेढोरे, पशूपक्षी तृप्त झाले. बालगोपाळांनी पाण्यात भिजण्याचा आनंद लुटला. पाणी आल्याने ग्रामस्थांनी आमदार, सरपंच, अधिकाºयांचे आभार मानले. शेतकरी, पोल्ट्री व्यावसायिक समाधानी झाले. आता पूर्वीसारखे कालव्याला पाणी सुरळीत सोडले जाईल असे आश्वासन मुख्य कार्य. अधिकारी धनंजय गोडसे यांनी दिले. अभियंता श्वेता पाटील व टीमच्या प्रयत्नाचे विभागात कौतुक झाले आहे.

टॅग्स :Waterपाणी