शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

जमिनी खरेदी करूनही प्रकल्पाच्या नावाने शिमगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 23:40 IST

शेतकरी संतप्त : मूळ मालकास जमीन परत करण्याची मागणी; २४० शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज

जयंत धुळपअलिबाग : अलिबाग तालुक्यातील मेढेखार, काचली, पिठकिरी, खातविरे, देहेन आणि कालवड या सहा गावांतील शेतकºयांच्या शेतजमिनी औद्योगिक वापरासाठी २००७ मध्ये खरेदी केल्या. गेल्या १२ वर्षांत या जमिनींवर ना कोणते कारखाने उभे राहिले, ना स्थानिकांना कोणता रोजगार मिळाला आणि जमिनीदेखील नापीक झाल्या. आता प्रकल्प उभे न राहिल्याने या जमिनी मूळ मालकास परत करण्याची मागणी या सहा गावच्या एकूण ५४० शेतकºयांपैकी २४० शेतकºयांनी रायगडच्या जिल्हाधिकाºयांकडे मंगळवारी लेखी अर्ज करून केली आहे.

मेढेखार, काचली, पिठकिरी, खातविरे, देहेन, कालवड या गावांतील जमिनी १९८२ सालापासून खारभूमी विभागाने समुद्र संरक्षक बंधारे न बांधल्यामुळे गेली ३७ वर्षे नापीक झाल्या आहेत. शेतक ºयंना उपजीविकेसाठी तेथे कोणतीही रोजगाराची संधी उपलब्ध नव्हती. त्याच दरम्यान २००७ साली या सहा गावांच्या जमिनी कृषी व औद्योगिकीकरणासाठी घेऊन रोजगाराच्या संधी देण्यात येतील, असे आश्वासन खासगी भांडवलदारांनी दिले होते. नोकरी मिळेल या आशेने या हिंगलाज लॅण्ड इ. प्रा. लि., देवर्षी लॅण्ड रियालिटी प्रा. लि., गजेंद्र लॅण्ड रियालिटी प्रा. लि., गोकुळ लॅण्ड प्रा. लि., स्टेप डेव्हलपर्स, गणेश लॅण्ड प्रा. लि., जय अंबे रियालिटी प्रा. लि., गिरीराज लॅण्ड रियालिटी प्रा. लि., गायत्री लॅण्ड रियालिटी प्रा. लि. या कंपन्यांना शेतकºयांनी आपल्या जमिनी दिल्याचे या अर्जात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या कंपन्यांनी जमिनी खरेदी करताना उद्योग विभागाचे विकास आयुक्त तसेच जिल्हाधिकारी रायगड यांची परवानगी घेतली नाही. त्याचप्रमाणे औद्योगिक वापर सुरू करण्यासाठी नगर रचना विभागाकडून क्षेत्र (झोन) बदलाची कोणतीही प्रक्रिया केली नव्हती. नोकरी मिळेल या आशेने २००७ साली शेतकºयांनी जमिनी दिल्या. शेतीही नाही व नोकरीही नाही, अशा परिस्थितीत शेतकरी गेली दहा वर्षे जीवन जगत आहेत, असेही अर्जात नमूद आहे.

खासगी भांडवलदारांनी घेतलेल्या जमिनी दहा वर्षे कालावधी होऊनही काहीही न केल्यामुळे या जमिनींच्या बाबत अहवाल सादर करण्याचे अलिबागच्या तहसीलदारांना कोकण विभागीय आयुक्तांनी ३ मे २०१७ रोजी श्रमिक मुक्ती दल या शेतकºयांच्या संघटनेबरोबर झालेल्या बैठकीत सांगितले होते. त्या आदेशान्वये केवळ पटनी एनर्जी या कंपनीचे, वापर न केलेल्या जमिनीचे रीतसर पंचनामे करून अलिबागच्या तहसीलदारांनी कूळवहिवाट शाखेला ८ नोव्हेंबर २०१७ रोजी अहवाल सादर केला. मात्र, हिंगलाज लॅण्ड इ. प्रा. लि., देवर्षी लॅण्ड इ. प्रा. लि., गजेंद्र लॅण्ड इ. प्रा. लि., गोकुळ लॅण्ड इ. प्रा. लि., स्टेप डेव्हलपर्स, गणेश लॅण्ड इ. प्रा. लि., जय अंबे रियालिटी प्रा. लि., गिरीराज लॅण्ड इ. प्रा. लि., गायत्री लॅण्ड इ. प्रा. लि. या कंपनीच्या बाबत प्रत्यक्ष वस्तुस्थिती पंचनामे जिल्हाधिकाºयांना गेली तीन वर्षे सादर केलेले नाहीत. त्यामुळे मूळ मालकास कायद्यानुसार जमीन परत देण्याची प्रकिया थांबलेली असल्याचे अर्जात नमूद आहे.

कायद्यानुसार खरेदी केलेले क्षेत्र खरेदी दिनांकापासून दहा वर्षाच्या आत जर नियोजित कारणाकरिता वापरास प्रारंभ केला नाही, तर त्या जमिनी मूळमालकास परत दिल्या पाहिजेत, असे कायदेशीर बंधन कंपन्यांवर आहे. त्यानुसार आम्ही शेतकरी सदर जमिनी मूळ मालकास परत मिळण्यासाठी आपणाकडे कायदेशीर आग्रही मागणी करीत असल्याचे अर्जात म्हटले आहे.

सद्यस्थितीत याबाबत सुनावणी सुरू आहेत. कंपन्यांनी जमिनी खरेदी करताना रीतसर परवानगी घेतली आहे किंवा नाही, ज्या हेतूसाठी जमिनी खरेदी केल्या तो हेतू अमलात आणला आहे किंवा नाही, आदी विविध मुद्द्यांची तपासणी करण्याकरिता या सुनावणी होत आहेत. सुनावणीच्या पूर्ततेअंती या बाबतचा निष्कर्ष व निर्णय सांगता येईल. - भरत शितोळे, अप्पर जिल्हाधिकारी, रायगड

४५० एकर जमीन खरेदीसहा गावांतील एकूण ५४० शेतकºयांची ४५० एकर जमीन कंपन्यांनी खरेदी केलेली आहे. पटनी कंपनीने २३६ एकर जमिनीची खरेदीखते नोंदणीकृत केली आहेत, तर १०४ एकर जमिनीचे साठेकरार शेतकºयांबरोबर केले आहेत.स्टेप डेव्हलपर्स या कंपनीने ३० एकर, तर उवर्रित हिंगलाज लॅण्ड इ. प्रा. लि., देवर्षी लॅण्ड इ. प्रा. लि., गजेंद्र लॅण्ड इ. प्रा. लि., गोकुळ लॅण्ड इ. प्रा. लि., गणेश लॅण्ड इ. प्रा. लि., जय अंबे रियालिटी प्रा. लि., गिरीराज लॅण्ड इ. प्रा. लि. आणि गायत्री लॅण्ड इ. प्रा. लि. या कंपन्यांनी एकूण ९० एकर जमीन खरेदी केलेली असल्याचे मेढेखार येथील शेतकरी मनोज पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.