शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

जमिनी खरेदी करूनही प्रकल्पाच्या नावाने शिमगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 23:40 IST

शेतकरी संतप्त : मूळ मालकास जमीन परत करण्याची मागणी; २४० शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज

जयंत धुळपअलिबाग : अलिबाग तालुक्यातील मेढेखार, काचली, पिठकिरी, खातविरे, देहेन आणि कालवड या सहा गावांतील शेतकºयांच्या शेतजमिनी औद्योगिक वापरासाठी २००७ मध्ये खरेदी केल्या. गेल्या १२ वर्षांत या जमिनींवर ना कोणते कारखाने उभे राहिले, ना स्थानिकांना कोणता रोजगार मिळाला आणि जमिनीदेखील नापीक झाल्या. आता प्रकल्प उभे न राहिल्याने या जमिनी मूळ मालकास परत करण्याची मागणी या सहा गावच्या एकूण ५४० शेतकºयांपैकी २४० शेतकºयांनी रायगडच्या जिल्हाधिकाºयांकडे मंगळवारी लेखी अर्ज करून केली आहे.

मेढेखार, काचली, पिठकिरी, खातविरे, देहेन, कालवड या गावांतील जमिनी १९८२ सालापासून खारभूमी विभागाने समुद्र संरक्षक बंधारे न बांधल्यामुळे गेली ३७ वर्षे नापीक झाल्या आहेत. शेतक ºयंना उपजीविकेसाठी तेथे कोणतीही रोजगाराची संधी उपलब्ध नव्हती. त्याच दरम्यान २००७ साली या सहा गावांच्या जमिनी कृषी व औद्योगिकीकरणासाठी घेऊन रोजगाराच्या संधी देण्यात येतील, असे आश्वासन खासगी भांडवलदारांनी दिले होते. नोकरी मिळेल या आशेने या हिंगलाज लॅण्ड इ. प्रा. लि., देवर्षी लॅण्ड रियालिटी प्रा. लि., गजेंद्र लॅण्ड रियालिटी प्रा. लि., गोकुळ लॅण्ड प्रा. लि., स्टेप डेव्हलपर्स, गणेश लॅण्ड प्रा. लि., जय अंबे रियालिटी प्रा. लि., गिरीराज लॅण्ड रियालिटी प्रा. लि., गायत्री लॅण्ड रियालिटी प्रा. लि. या कंपन्यांना शेतकºयांनी आपल्या जमिनी दिल्याचे या अर्जात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या कंपन्यांनी जमिनी खरेदी करताना उद्योग विभागाचे विकास आयुक्त तसेच जिल्हाधिकारी रायगड यांची परवानगी घेतली नाही. त्याचप्रमाणे औद्योगिक वापर सुरू करण्यासाठी नगर रचना विभागाकडून क्षेत्र (झोन) बदलाची कोणतीही प्रक्रिया केली नव्हती. नोकरी मिळेल या आशेने २००७ साली शेतकºयांनी जमिनी दिल्या. शेतीही नाही व नोकरीही नाही, अशा परिस्थितीत शेतकरी गेली दहा वर्षे जीवन जगत आहेत, असेही अर्जात नमूद आहे.

खासगी भांडवलदारांनी घेतलेल्या जमिनी दहा वर्षे कालावधी होऊनही काहीही न केल्यामुळे या जमिनींच्या बाबत अहवाल सादर करण्याचे अलिबागच्या तहसीलदारांना कोकण विभागीय आयुक्तांनी ३ मे २०१७ रोजी श्रमिक मुक्ती दल या शेतकºयांच्या संघटनेबरोबर झालेल्या बैठकीत सांगितले होते. त्या आदेशान्वये केवळ पटनी एनर्जी या कंपनीचे, वापर न केलेल्या जमिनीचे रीतसर पंचनामे करून अलिबागच्या तहसीलदारांनी कूळवहिवाट शाखेला ८ नोव्हेंबर २०१७ रोजी अहवाल सादर केला. मात्र, हिंगलाज लॅण्ड इ. प्रा. लि., देवर्षी लॅण्ड इ. प्रा. लि., गजेंद्र लॅण्ड इ. प्रा. लि., गोकुळ लॅण्ड इ. प्रा. लि., स्टेप डेव्हलपर्स, गणेश लॅण्ड इ. प्रा. लि., जय अंबे रियालिटी प्रा. लि., गिरीराज लॅण्ड इ. प्रा. लि., गायत्री लॅण्ड इ. प्रा. लि. या कंपनीच्या बाबत प्रत्यक्ष वस्तुस्थिती पंचनामे जिल्हाधिकाºयांना गेली तीन वर्षे सादर केलेले नाहीत. त्यामुळे मूळ मालकास कायद्यानुसार जमीन परत देण्याची प्रकिया थांबलेली असल्याचे अर्जात नमूद आहे.

कायद्यानुसार खरेदी केलेले क्षेत्र खरेदी दिनांकापासून दहा वर्षाच्या आत जर नियोजित कारणाकरिता वापरास प्रारंभ केला नाही, तर त्या जमिनी मूळमालकास परत दिल्या पाहिजेत, असे कायदेशीर बंधन कंपन्यांवर आहे. त्यानुसार आम्ही शेतकरी सदर जमिनी मूळ मालकास परत मिळण्यासाठी आपणाकडे कायदेशीर आग्रही मागणी करीत असल्याचे अर्जात म्हटले आहे.

सद्यस्थितीत याबाबत सुनावणी सुरू आहेत. कंपन्यांनी जमिनी खरेदी करताना रीतसर परवानगी घेतली आहे किंवा नाही, ज्या हेतूसाठी जमिनी खरेदी केल्या तो हेतू अमलात आणला आहे किंवा नाही, आदी विविध मुद्द्यांची तपासणी करण्याकरिता या सुनावणी होत आहेत. सुनावणीच्या पूर्ततेअंती या बाबतचा निष्कर्ष व निर्णय सांगता येईल. - भरत शितोळे, अप्पर जिल्हाधिकारी, रायगड

४५० एकर जमीन खरेदीसहा गावांतील एकूण ५४० शेतकºयांची ४५० एकर जमीन कंपन्यांनी खरेदी केलेली आहे. पटनी कंपनीने २३६ एकर जमिनीची खरेदीखते नोंदणीकृत केली आहेत, तर १०४ एकर जमिनीचे साठेकरार शेतकºयांबरोबर केले आहेत.स्टेप डेव्हलपर्स या कंपनीने ३० एकर, तर उवर्रित हिंगलाज लॅण्ड इ. प्रा. लि., देवर्षी लॅण्ड इ. प्रा. लि., गजेंद्र लॅण्ड इ. प्रा. लि., गोकुळ लॅण्ड इ. प्रा. लि., गणेश लॅण्ड इ. प्रा. लि., जय अंबे रियालिटी प्रा. लि., गिरीराज लॅण्ड इ. प्रा. लि. आणि गायत्री लॅण्ड इ. प्रा. लि. या कंपन्यांनी एकूण ९० एकर जमीन खरेदी केलेली असल्याचे मेढेखार येथील शेतकरी मनोज पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.