शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्रशासनाने कंपन्यांची पाठराखण थांबवावी अन्यथा आंदोलन करु, शेकापचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 00:33 IST

अलिबाग आणि पेण तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जेएसडब्ल्यूच्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते

रायगड : जिल्ह्यातील महत्वांच्या कंपन्यांमध्ये कोरोनाने शिरराव केला आहे. रिलायन्स, जेएसडब्ल्यू, सुदर्शन यासह अन्य काही कंपनीतील कर्मचाऱ्यांना लागण झाली आहे. मात्र प्रशासन जाणून बुजून कंपन्यांची पाठराखण करत असल्याचा आरोप शेकापचे माजी आमदार सुभाष पाटील यांनी केला आहे.

अलिबाग आणि पेण तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जेएसडब्ल्यूच्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते. कोरोनाबाबतचे नियम धाब्यावर बसवत असल्याने तेथे प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे तातडीने जेएसडब्ल्यू कंपनीने कामकाज बंद करावे अशी मागणीही पाटील यांनी केली.

नागोठणे येथील रिलायन्स तसेच सुदर्शन कपंनीतील वाढती रुग्ण संख्या नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहे. जिल्हा प्रशासन फक्त बैठका घेत आहे. ग्राऊंडवर त्याचे काम दिसत नाही. त्यामुळे आपल्याला कोणीच वाली नसल्याची धारणा संबंधीत ग्रामपंचायतींची झाली आहे. प्रशासनाच्या अधिकाºयांमध्ये समन्वयाचा अभाव आहे, तसेच कंपनीच्या बाबतीमध्ये बोटचेपे धोरण घेत असल्यानेच त्यांची हिंमत वाढली असल्याचे पाटील यांनी निर्दशनास आणून दिले. प्रशासनाने आता याबाबात ठोस उपाय योजना करावी अन्यथा आम्हाला या विरोधात आंदोलन करावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला.

मंगळवारी पेझारी, आंबेपूर परिसरातील कर्मचारी पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. कंपनीपेक्षा लोकांचे जीव महत्वाचे असल्याचे सांगत सुरक्षित काम करता येत नसेल तर काही काळासाठी कंपनी बंद ठेवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.कोरोना झालेले कामगार हे कंत्राटी आहेत, त्यांच्याशी कंपनीचा संबंध नसल्याचा पवित्रा कंपनी व्यवस्थापनाकडून घेतला जातो. रिलायन्स, सुदर्शनसह अन्य कंपन्यांमधील कामगार कोरोना पॉझिटीव्ह असतील तर त्यांची सविस्तर माहिती जिल्हा प्रशासनाच्या माहितीपत्रात दिली जाते. मात्र जेएसडब्ल्यूचे नाव कुठेही येणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याचा आरोप होतो आहे.या आरोपांची पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दखल घेत संबंधीत यंत्रणांना निर्देश देण्यात येतील असे त्यांनी दोनच दिवसांपूर्वी स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड