शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

नवीन तलाठ्यांकडे गावाचा कारभार

By निखिल म्हात्रे | Published: January 31, 2024 5:14 PM

सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतरच या 13 जिल्ह्यांमधील उमेदवारांच्या निवड प्रक्रियेची कार्यवाही करण्याला सुरुवात करण्यात आली आहे.

अलिबाग - मागील काही दिवस प्रतीक्षित तलाठी परीक्षेची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आल्यानंतर आता निवड झालेल्यांसह प्रतीक्षा यादीवर असणाऱ्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात येत आहे. जिल्ह्यात 218 जागांसाठी तलाठी भरती झाली होती. रायगड जिल्ह्यात 218 जागांसाठी हजारोंच्या संख्येने अर्ज आले होते. पैकी 218 जणांची निवड यादी आणि 135 उमेदवारांची प्रतीक्षा यादी 6 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यात 13 आदिवासीबहुल जिल्ह्यांमधील पेसा अंतर्गत रिक्त जागांबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने हे जिल्हे वगळून अन्य 23 जिल्ह्यांमधील निवड यादीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

निवड यादी अर्थात यशस्वी उमेदवारांची यादी जिल्हानिहाय तयार करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतरच या 13 जिल्ह्यांमधील उमेदवारांच्या निवड प्रक्रियेची कार्यवाही करण्याला सुरुवात करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात तलाठी पदे रिक्त असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. तसेच, एकाच तलाठ्याला चार गावांचा कारभार पहावा लागत होता. त्यामुळे संबंधित तलाठी वैतागून गेले होते. तलाठीपदाची भरती करावी, अशी सातत्याने मागणी होत होती. निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी राजस्व सभागृहात सकाळी 10 वाजल्यापासून सुरु झाली आहे. शैक्षणिक प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, आधारकार्ड अशा विविध कागपत्रांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती नायब तहसीलदार संतोष पाटील यांनी दिली.

काही उमेदावार हे उशिरा दाखल झाले होते. त्यामुळे कागदपत्रांची पडताळणी होणार का नाही, अशी चिंता त्यांना सतावत होती. मात्र, हजर असलेल्या प्रत्येक उमेदवाराच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असल्याचे संबंधित कर्मचाऱ्याने सांगितल्याने त्यांचा जीव भांड्यात पडला.

टॅग्स :alibaugअलिबाग