शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

नागलोली येथे अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 23:57 IST

११ प्रवासी किरकोळ जखमी : चालकाच्या प्रसंगावधानाने दुर्घटना टळली

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील नागलोली येथे ब्रेक फेल झाल्याने एसटीला अपघात झाल्याची घटना शुक्र वारी २२ फे ब्रुवारी रोजी घडली. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला. प्रवाशांना वाचविण्यात एसटी साइडपट्टीला धडकल्याने तीन प्रवाशंसह आठ विद्यार्थ्यांना किरकोळ जखमी झाले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरीजवळील म्हसळा-नागलोली मार्गावर दांडगुरीकडे येताना श्रीवर्धन आगराच्या एसटीचा तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्याने वाचविण्यासाठी एसटी रस्त्याच्याकडेला आदळून अपघात झाला. या वेळी चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत बचावकार्य सुरू केले. एसटीमध्ये २३ प्रवासी होते. यामध्ये तन्वी बिरवाडकर (१६, रा. धनगरमलई), अनुष्का बिरवाडकर (११,रा. धनगरमलई), कुणालीदर्गे (१२), श्वेता अलीम (१५, रा. कासार कोंड), दिव्या फटकरे (१५), दीपेश अलीम (१३), शुभम तटकरे (१३), सलोनी घडशी (१५, कासार कोंड), या विद्यार्थ्यांसह पार्वती रायगवळी (७०), सुजाता मोरे (६२), प्रमोदिनी म्हामुणकर (४५, रा. खोपोली) हे प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींना तत्काळ बोर्लीपंचतन येथील प्राथमिक रुग्णालयात हलवण्यात आले. एसटी प्रशासनाने किरकोळ जखमी झालेल्या प्रवासांना घटनास्थळी ५०० रुपयांची तत्काळ मदत के ली. तर वाहक विजय जगदाळे यांच्या पायाला मार लागला.म्हसळा ते दांडगुरी व परत दांडगुरी ते धनगरमलईवरून बोर्लीपंचतन येथे येणाऱ्या एसटीचे चालक गौतम कांबळे व वाहक विजय जगदाळे हे होते. सकाळी विद्यार्थी घेऊन ही एसटी निघाली असताना नागलोली गावाच्या तीव्र उतारावर एसटीचा ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखून चालकाने पुढील तीव्र उताराचे वळण न मारता सरळ बस रस्त्याच्या समोरील बाजूला खाली उतरवत झाडाला धडक देऊन थांबवली. त्यामुळे बसचे दोन्ही चाक खड्ड्यात गेल्याने प्रवाशांना झटका बसला, यात ११ जणांना किरकोळ मार लागला आहे. सर्व प्रवासी सुखरूप असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. या वेळी दिघी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.ग्रामीण भागात नादुरुस्त एसटीच्ग्रामीण भागातील रस्ते खराब असल्याने या भागासाठीही खराब झालेल्या तसेच आयुष्यमान संपत चाललेल्या गाड्या वापरल्या जात आहेत. रस्ता खराब तर आहेच शिवाय दुसरी पर्यायी व्यवस्थाही महामंडळाकडे नाही. या गाड्यांच्या खिडक्यांना काचा नसतात. इंडिकेटरही खराब असतात. बºयाच गाड्या तर चावीविनाच सुरू होतात. रस्ता खराब असल्याने तर या बसगाड्यांची अधिकच दुर्दशा झाली आहे. या खराब गाड्यांतून प्रवास करणे मात्र प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे.च्धनगरमलई ते बोर्ली रस्ता अरुंद आहे. दुतर्फा प्रचंड जंगल असून या मागावर एकेरी वाहतूक मोठ्या शिताफीने होते. येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे, साळविंडे ते दांडगुरी जवळपास १३ किलोमीटरचा रस्ता वाहतुकीस योग्य राहिलेला नाही.

टॅग्स :Accidentअपघातalibaugअलिबाग