शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

नागलोली येथे अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 23:57 IST

११ प्रवासी किरकोळ जखमी : चालकाच्या प्रसंगावधानाने दुर्घटना टळली

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील नागलोली येथे ब्रेक फेल झाल्याने एसटीला अपघात झाल्याची घटना शुक्र वारी २२ फे ब्रुवारी रोजी घडली. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला. प्रवाशांना वाचविण्यात एसटी साइडपट्टीला धडकल्याने तीन प्रवाशंसह आठ विद्यार्थ्यांना किरकोळ जखमी झाले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरीजवळील म्हसळा-नागलोली मार्गावर दांडगुरीकडे येताना श्रीवर्धन आगराच्या एसटीचा तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्याने वाचविण्यासाठी एसटी रस्त्याच्याकडेला आदळून अपघात झाला. या वेळी चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत बचावकार्य सुरू केले. एसटीमध्ये २३ प्रवासी होते. यामध्ये तन्वी बिरवाडकर (१६, रा. धनगरमलई), अनुष्का बिरवाडकर (११,रा. धनगरमलई), कुणालीदर्गे (१२), श्वेता अलीम (१५, रा. कासार कोंड), दिव्या फटकरे (१५), दीपेश अलीम (१३), शुभम तटकरे (१३), सलोनी घडशी (१५, कासार कोंड), या विद्यार्थ्यांसह पार्वती रायगवळी (७०), सुजाता मोरे (६२), प्रमोदिनी म्हामुणकर (४५, रा. खोपोली) हे प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींना तत्काळ बोर्लीपंचतन येथील प्राथमिक रुग्णालयात हलवण्यात आले. एसटी प्रशासनाने किरकोळ जखमी झालेल्या प्रवासांना घटनास्थळी ५०० रुपयांची तत्काळ मदत के ली. तर वाहक विजय जगदाळे यांच्या पायाला मार लागला.म्हसळा ते दांडगुरी व परत दांडगुरी ते धनगरमलईवरून बोर्लीपंचतन येथे येणाऱ्या एसटीचे चालक गौतम कांबळे व वाहक विजय जगदाळे हे होते. सकाळी विद्यार्थी घेऊन ही एसटी निघाली असताना नागलोली गावाच्या तीव्र उतारावर एसटीचा ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखून चालकाने पुढील तीव्र उताराचे वळण न मारता सरळ बस रस्त्याच्या समोरील बाजूला खाली उतरवत झाडाला धडक देऊन थांबवली. त्यामुळे बसचे दोन्ही चाक खड्ड्यात गेल्याने प्रवाशांना झटका बसला, यात ११ जणांना किरकोळ मार लागला आहे. सर्व प्रवासी सुखरूप असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. या वेळी दिघी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.ग्रामीण भागात नादुरुस्त एसटीच्ग्रामीण भागातील रस्ते खराब असल्याने या भागासाठीही खराब झालेल्या तसेच आयुष्यमान संपत चाललेल्या गाड्या वापरल्या जात आहेत. रस्ता खराब तर आहेच शिवाय दुसरी पर्यायी व्यवस्थाही महामंडळाकडे नाही. या गाड्यांच्या खिडक्यांना काचा नसतात. इंडिकेटरही खराब असतात. बºयाच गाड्या तर चावीविनाच सुरू होतात. रस्ता खराब असल्याने तर या बसगाड्यांची अधिकच दुर्दशा झाली आहे. या खराब गाड्यांतून प्रवास करणे मात्र प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे.च्धनगरमलई ते बोर्ली रस्ता अरुंद आहे. दुतर्फा प्रचंड जंगल असून या मागावर एकेरी वाहतूक मोठ्या शिताफीने होते. येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे, साळविंडे ते दांडगुरी जवळपास १३ किलोमीटरचा रस्ता वाहतुकीस योग्य राहिलेला नाही.

टॅग्स :Accidentअपघातalibaugअलिबाग