शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

उधाणामुळे बंधाऱ्यास ११ ठिकाणी भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:40 IST

धेरंड-शहापूर गावांतील २५० शेतक-यांना फटका; एक हजार हेक्टर भातशेतीत घुसले पाणी; पाच दिवस झाले तरी शासनाचा नाही पत्ता

-जयंत धुळपअलिबाग : गेल्या आठवड्यात सलग चार दिवस आलेल्या उधाण भरतीमुळे तालुक्यातील खारेपाट विभागातील धेरंड आणि शहापूर या गावांच्या पूर्वेस असलेल्या धरमतर खाडीच्या समुद्र संरक्षक बंधाºयास तब्बल ११ ठिकाणी मोठी भगदाडे पडली आहेत. उधाणाचे पाणी दोन्ही गावांतील एक हजार हेक्टरपेक्षा जास्त भातशेतीत घुसल्याने सुमारे २५० शेतकºयांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती शहापूरचे आपद्ग्रस्त शेतकरी अमरनाथ पाटील यांनी दिली आहे.भातशेतीत येणारे पाणी थांबविणे, भविष्यात उधाणाचे पाणी शहापूर व धेरंड गावांतील मानवी वस्तीत घुसू नये, यासाठी संरक्षक बंधाºयाची ११ ठिकाणी पडलेली भगदाडे सामूहिक श्रमदानाने बुजवण्याकरिता गेल्या पाच दिवसांपासून ग्रामस्थांचे शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.हवामान खात्याने १३ ते १७ जुलै दरम्यान उधाणाच्या मोठ्या लाटांचा इशारा दिला होता. त्याआधी दोन वेळा संरक्षक बंधाराफुटीमुळे उधाणाचे पाणी गावातील घरांत पोहोचले होते. या पार्श्वभूमीवर दोन्ही गावांतील ग्रामस्थ दिवस-रात्र पाळत लावून संरक्षक बंधाºयांवर नजर ठेवून होते. १५ जुलैला उधाणाच्या भरतीमुळे बंधाºयास ११ ठिकाणी भगदाडे पडली.ग्रामस्थांमध्ये संतापगेल्या पाच दिवसांपासून दररोज किमान १०० ग्रामस्थ बंधाºयाची भगदाडे बुजवण्याकरिता श्रमदान करत आहेत. नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्याकरिता सतर्क असल्याचा दावा करणाºया रायगड जिल्हा प्रशासन वा जिल्हा आपत्ती निवारण यंत्रणा यांना जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १५ ते २० कि.मी. अंतरावर आलेल्या या नैसर्गिक आपत्तीची कोणतीही कल्पना नाही. सरकारच्या तलाठ्यापासून कोणीही कर्मचारी वा अधिकारी गावांत फिरकलेला नाही, त्यामुळे नुकसानभरपाईसाठीचे पंचनामे करण्याची कामदेखील गावांत सुरू झाली नसल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे नंदन पाटील यांनी दिली आहे.‘एमआयडीसी’ची बेफिकिरीमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)ने शहापूर व धेरंडमधील शेतकºयांच्या जमिनी टाटा पॉवर प्रकल्पासाठी संपादित केल्या आहेत. या जमिनी आणि धरमतर खाडी यामधील समुद्र संरक्षक बंधारे यांची दुरुस्ती आणि देखभाल करण्याची जबाबदारी एमआयडीसीची आहे. त्यामुळे खारभूमी विकास विभाग या संरक्षक बंधाºयाची देखभाल व दुरुस्ती करत नाही आणि गेल्या काही वर्षांत एमआयडीसीने आपली जबाबदारी निभावलेली नसल्याने सातत्याने संरक्षक बंधारे फुटून भातशेतीचे नुकसान होत असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी सांगितले.

टॅग्स :alibaugअलिबाग