शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

उधाणामुळे बंधाऱ्यास ११ ठिकाणी भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:40 IST

धेरंड-शहापूर गावांतील २५० शेतक-यांना फटका; एक हजार हेक्टर भातशेतीत घुसले पाणी; पाच दिवस झाले तरी शासनाचा नाही पत्ता

-जयंत धुळपअलिबाग : गेल्या आठवड्यात सलग चार दिवस आलेल्या उधाण भरतीमुळे तालुक्यातील खारेपाट विभागातील धेरंड आणि शहापूर या गावांच्या पूर्वेस असलेल्या धरमतर खाडीच्या समुद्र संरक्षक बंधाºयास तब्बल ११ ठिकाणी मोठी भगदाडे पडली आहेत. उधाणाचे पाणी दोन्ही गावांतील एक हजार हेक्टरपेक्षा जास्त भातशेतीत घुसल्याने सुमारे २५० शेतकºयांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती शहापूरचे आपद्ग्रस्त शेतकरी अमरनाथ पाटील यांनी दिली आहे.भातशेतीत येणारे पाणी थांबविणे, भविष्यात उधाणाचे पाणी शहापूर व धेरंड गावांतील मानवी वस्तीत घुसू नये, यासाठी संरक्षक बंधाºयाची ११ ठिकाणी पडलेली भगदाडे सामूहिक श्रमदानाने बुजवण्याकरिता गेल्या पाच दिवसांपासून ग्रामस्थांचे शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.हवामान खात्याने १३ ते १७ जुलै दरम्यान उधाणाच्या मोठ्या लाटांचा इशारा दिला होता. त्याआधी दोन वेळा संरक्षक बंधाराफुटीमुळे उधाणाचे पाणी गावातील घरांत पोहोचले होते. या पार्श्वभूमीवर दोन्ही गावांतील ग्रामस्थ दिवस-रात्र पाळत लावून संरक्षक बंधाºयांवर नजर ठेवून होते. १५ जुलैला उधाणाच्या भरतीमुळे बंधाºयास ११ ठिकाणी भगदाडे पडली.ग्रामस्थांमध्ये संतापगेल्या पाच दिवसांपासून दररोज किमान १०० ग्रामस्थ बंधाºयाची भगदाडे बुजवण्याकरिता श्रमदान करत आहेत. नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्याकरिता सतर्क असल्याचा दावा करणाºया रायगड जिल्हा प्रशासन वा जिल्हा आपत्ती निवारण यंत्रणा यांना जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १५ ते २० कि.मी. अंतरावर आलेल्या या नैसर्गिक आपत्तीची कोणतीही कल्पना नाही. सरकारच्या तलाठ्यापासून कोणीही कर्मचारी वा अधिकारी गावांत फिरकलेला नाही, त्यामुळे नुकसानभरपाईसाठीचे पंचनामे करण्याची कामदेखील गावांत सुरू झाली नसल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे नंदन पाटील यांनी दिली आहे.‘एमआयडीसी’ची बेफिकिरीमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)ने शहापूर व धेरंडमधील शेतकºयांच्या जमिनी टाटा पॉवर प्रकल्पासाठी संपादित केल्या आहेत. या जमिनी आणि धरमतर खाडी यामधील समुद्र संरक्षक बंधारे यांची दुरुस्ती आणि देखभाल करण्याची जबाबदारी एमआयडीसीची आहे. त्यामुळे खारभूमी विकास विभाग या संरक्षक बंधाºयाची देखभाल व दुरुस्ती करत नाही आणि गेल्या काही वर्षांत एमआयडीसीने आपली जबाबदारी निभावलेली नसल्याने सातत्याने संरक्षक बंधारे फुटून भातशेतीचे नुकसान होत असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी सांगितले.

टॅग्स :alibaugअलिबाग