शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

उधाणामुळे बंधाऱ्यास ११ ठिकाणी भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:40 IST

धेरंड-शहापूर गावांतील २५० शेतक-यांना फटका; एक हजार हेक्टर भातशेतीत घुसले पाणी; पाच दिवस झाले तरी शासनाचा नाही पत्ता

-जयंत धुळपअलिबाग : गेल्या आठवड्यात सलग चार दिवस आलेल्या उधाण भरतीमुळे तालुक्यातील खारेपाट विभागातील धेरंड आणि शहापूर या गावांच्या पूर्वेस असलेल्या धरमतर खाडीच्या समुद्र संरक्षक बंधाºयास तब्बल ११ ठिकाणी मोठी भगदाडे पडली आहेत. उधाणाचे पाणी दोन्ही गावांतील एक हजार हेक्टरपेक्षा जास्त भातशेतीत घुसल्याने सुमारे २५० शेतकºयांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती शहापूरचे आपद्ग्रस्त शेतकरी अमरनाथ पाटील यांनी दिली आहे.भातशेतीत येणारे पाणी थांबविणे, भविष्यात उधाणाचे पाणी शहापूर व धेरंड गावांतील मानवी वस्तीत घुसू नये, यासाठी संरक्षक बंधाºयाची ११ ठिकाणी पडलेली भगदाडे सामूहिक श्रमदानाने बुजवण्याकरिता गेल्या पाच दिवसांपासून ग्रामस्थांचे शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.हवामान खात्याने १३ ते १७ जुलै दरम्यान उधाणाच्या मोठ्या लाटांचा इशारा दिला होता. त्याआधी दोन वेळा संरक्षक बंधाराफुटीमुळे उधाणाचे पाणी गावातील घरांत पोहोचले होते. या पार्श्वभूमीवर दोन्ही गावांतील ग्रामस्थ दिवस-रात्र पाळत लावून संरक्षक बंधाºयांवर नजर ठेवून होते. १५ जुलैला उधाणाच्या भरतीमुळे बंधाºयास ११ ठिकाणी भगदाडे पडली.ग्रामस्थांमध्ये संतापगेल्या पाच दिवसांपासून दररोज किमान १०० ग्रामस्थ बंधाºयाची भगदाडे बुजवण्याकरिता श्रमदान करत आहेत. नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्याकरिता सतर्क असल्याचा दावा करणाºया रायगड जिल्हा प्रशासन वा जिल्हा आपत्ती निवारण यंत्रणा यांना जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १५ ते २० कि.मी. अंतरावर आलेल्या या नैसर्गिक आपत्तीची कोणतीही कल्पना नाही. सरकारच्या तलाठ्यापासून कोणीही कर्मचारी वा अधिकारी गावांत फिरकलेला नाही, त्यामुळे नुकसानभरपाईसाठीचे पंचनामे करण्याची कामदेखील गावांत सुरू झाली नसल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे नंदन पाटील यांनी दिली आहे.‘एमआयडीसी’ची बेफिकिरीमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)ने शहापूर व धेरंडमधील शेतकºयांच्या जमिनी टाटा पॉवर प्रकल्पासाठी संपादित केल्या आहेत. या जमिनी आणि धरमतर खाडी यामधील समुद्र संरक्षक बंधारे यांची दुरुस्ती आणि देखभाल करण्याची जबाबदारी एमआयडीसीची आहे. त्यामुळे खारभूमी विकास विभाग या संरक्षक बंधाºयाची देखभाल व दुरुस्ती करत नाही आणि गेल्या काही वर्षांत एमआयडीसीने आपली जबाबदारी निभावलेली नसल्याने सातत्याने संरक्षक बंधारे फुटून भातशेतीचे नुकसान होत असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी सांगितले.

टॅग्स :alibaugअलिबाग