शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

३५ फुटांवरून कोसळलेली कार आदळली मालगाडीवर, भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 07:36 IST

या अपघातात धर्मानंद यशवंत गायकवाड (वय ४१, रा. नेरळ), मंगेश मारिया जाधव (४६, रा. मुंबई), नितीन मारुती जाधव (४८, रा. मुंबई) यांचा जागीच मृत्यू झाला.

कर्जत : कर्जत-कल्याण राज्य मार्गावर मंगळवारी पहाटे भीषण व विचित्र अपघात झाला. कर्जतहून नेरळकडे जात असताना रेल्वे पुलाचा कठडा तोडून कार ३५ फूट खाली कोसळली. दुर्दैव असे की, याच वेळी रेल्वे रुळावरून एक मालगाडी जात होती. त्यावर ती कार आदळली. या अपघातात एका पत्रकारासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन जण गंभीर जखमी असून, त्यातही एका पत्रकाराचा समावेश आहे. जखमींना प्रथमोपचार करून पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात धर्मानंद यशवंत गायकवाड (वय ४१, रा. नेरळ), मंगेश मारिया जाधव (४६, रा. मुंबई), नितीन मारुती जाधव (४८, रा. मुंबई) यांचा जागीच मृत्यू झाला. संताेष सखाराम जाधव (३८, रा. नेरळ) आणि जयवंत रामचंद्र हबाळे (४३, रा. बेकरे) हे जखमी आहेत. अपघातात ठार झालेले धर्मानंद गायकवाड हे मूळचे कर्जत तालुक्यातील असून, ते नेरळमधील राजेंद्रगुरुनगरमध्ये वास्तव्यास होते. ते स्थानिक वर्तमानपत्रासाठी काम करीत होते. धर्मानंद हे नेरळ येथून आपले काम आटोपून मंगेश, नितीन या दोन मावस भावांसह व संताेष आणि जयवंत या मित्रांसमवेत कार (एमएच ४६ बीआर ४२६१) ने कर्जत-कल्याण राज्य मार्गावरून जात होते.  किरवली गावानजीक आले असता गाडीवरील ताबा सुटल्याने त्यांची कार रेल्वे पुलाचे सुरक्षा कठडे तोडून ३५ फूट खाली कोसळली. त्याचवेळी पुलाखालून पनवेलहून कर्जतकडे मालगाडी जात होती. कार त्या मालगाडीवर आदळली आणि तिघांनी आपला जीव गमावला.

मालगाडीचे तीन डबे झाले वेगळेहा अपघात इतका भीषण होता की, कार जोरात आपटल्याने मालगाडीच्या शेवटच्या तीन डब्यांचे दोन कपलिंग तुटले व धावणाऱ्या मालगाडीपासून तीन डबे वेगळे  झाले. या अपघाताची माहिती समजताच पोलिस अपघातस्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले. यामुळे कर्जत-पनवेल रेल्वे मार्ग पहाटे चार ते सकाळी साडेसात वाजेपर्यंत बंद होता. त्यानंतर रुळांची तपासणी करून रेल्वे मार्ग सुरू करण्यात आला.

टॅग्स :Karjatकर्जतAccidentअपघात