शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

हुतात्मा स्मारकांच्या सुशोभीकरणासाठी ८९ लाखांचा निधी, सेनेचे आमदार मनोहर भोईर यांच्या प्रयत्नांना अखेर यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 02:21 IST

शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्मा स्मारकांची दुरवस्था झाली आहे. स्मारकांच्या रंगरंगोटी आणि दुरुस्तीसाठी शासनाने ९८ लाख रुपये मंजूर केले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता

उरण : शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्मा स्मारकांची दुरवस्था झाली आहे. स्मारकांच्या रंगरंगोटी आणि दुरुस्तीसाठी शासनाने ९८ लाख रुपये मंजूर केले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अनिल करपे यांनी दिली. शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर यांनी राज्यातील हुतात्मा स्मारकांच्या झालेल्या दुरवस्थेची बाब सभागृहात निदर्शनात आणून दिल्यानंतर राज्यातील २०४ हुतात्मा स्मारकांची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.स्वातंत्र्य संग्रामात सविनय कायदेभंग आंदोलनांतर्गत देशभरात आंदोलने सुरू होती. ‘इंग्रज भारत छोडो’चा नारा देत देशभरात आंदोलनाचा भडका उडाला होता. त्याच वेळी चिरनेर येथेही २५ सप्टेंबर १९३० साली ‘जंंगल सत्याग्रह’ आंदोलन सुरू करण्यात आले होते. शांततामयरीतीने सुरू असलेल्या जंगल सत्याग्रहात हजारो आंदोलक सहभागी झाले होते. या वेळी ब्रिटिश पोलिसांनी निर्दयपणे केलेल्या बेछूट गोळीबारात आठ हुतात्मे धारातीर्थी पडले, तर अनेक जण जखमी झाले.लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या धाकू गवत्या फोफेरकर, नवश्या महादेव कातकरी (चिरनेर), रामा बामा कोळी (मोठी जुई), हसुराम बुधाजी घरत (खोपटे), रघुनाथ मोरेश्वर न्हावी (कोप्रोली), परशुराम रामा पाटील (पाणदिवे), आनंदा माया पाटील (धाकटी जुई), आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे) या उरण तालुक्यातील आठ हुतात्म्यांची स्मारके शासनाने परिसरात उभारली आहेत. स्वातंत्र्य संग्रामातील या महत्त्वाच्या लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे आणि स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याचे सर्वांनाच स्मरण व्हावे आणि हुतात्म्यांच्या स्मृती कायम तेवत राहाव्या यासाठी उरण परिसरात हुतात्म्यांच्या मूळगावी शासनाने स्मारके उभारली आहेत. मात्र, बहुतांश स्मारकांची अवस्था पार दयनीय झाली आहे. अनेक हुतात्मा स्मारकांच्या छतांचे सिमेंटचे पत्रे फुटले आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्याने छताला गळती लागते. स्मारकात पाणी साचून दुर्गंधी पसरते. शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे स्मारकांचा वापर मुतारी, शौचालय, कपडे, मासळी सुकविण्यासाठी आणि शेतीची अवजारे ठेवण्यासाठी होऊ लागला आहे.

टॅग्स :Raigadरायगड