शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
5
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
6
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
7
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
8
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
9
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
10
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
11
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
12
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
13
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
14
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
15
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
16
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
17
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
18
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
19
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
20
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली

९८० शेतक-यांची अलिबागमध्ये सुनावणी, सर्वोच्च न्यायालय प्रतिनिधी न्यायाधीश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 06:56 IST

शहापूर-धेरंड येथील प्रस्तावित टाटा औष्णिक वीज प्रकल्पाला स्थानिक शेतक-यांचा विरोध असून यामधील पाच शेतक-यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

अलिबाग : शहापूर-धेरंड येथील प्रस्तावित टाटा औष्णिक वीज प्रकल्पाला स्थानिक शेतकºयांचा विरोध असून यामधील पाच शेतकºयांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या पाच शेतक-यांव्यतिरिक्त अन्यही शेतकºयांचा देखील विरोध आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शेतकºयांना त्यांचे म्हणणे मांडण्याकरिता नवी दिल्लीत येण्याऐवजी मुंबई उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचे प्रतिनिधी न्यायाधीश नियुक्त करून शेतकºयांचे म्हणणे स्थानिक पातळीवरच ऐकून घेवून अहवाल सर्वोच्च न्यायालयास सादर करावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार मंगळवारी येथील जिल्हा पोलीस मुख्यालयातील जंजिरा सभागृहात स्थापन करण्यात आलेल्या न्यायालयात सर्वोच्च न्यायालयाचे प्रतिनिधी न्यायाधीश तथा रायगड जिल्हा व सत्र न्यायाधीश मु.गो.सेवलीकर यांच्यासमोर शेतकºयांची सुनावणी सुरू झाली.शेतकºयांच्या न्याय्य हक्काकरिता त्यांचे म्हणणे स्थानिक पातळीवर जाणून घेण्याकरिता सर्वोच्च न्यायालयाने विशेष व्यवस्था करण्याची इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या पाच शेतकºयांप्रमाणे उर्वरित सर्व शेतकºयांचे म्हणणे देखील सर्वोच्च न्यायालयाने जाणून घेणे गरजेचे आहे, अशी भूमिका शेतकºयांच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणाºया अ‍ॅड. गायत्री सिंग यांनी मांडली होती. ती भूमिका मान्य करुन या सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचे प्रतिनिधी म्हणून न्यायाधीश तथा रायगड जिल्हा व सत्र न्यायाधीश मु.गो.सेवलीकर यांची नियुक्ती केली आहे. या सुनावणीत एकूण ९८० शेतकरी आपले म्हणणे नमूद करणार असल्याची माहिती या श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा संघटक राजन भगत यांनी दिली आहे.रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड आदी नऊ गावांच्या क्षेत्रावर टाटा-रिलायन्सचे औष्णिक वीज प्रकल्पासाठी तेथील शेतकºयांच्या जमिनी घेतल्या आहेत. यातील बाधित पाच शेतकºयांनी ‘एमआयडीसी’च्या भूसंपादनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. याचिका दाखल केलेल्या पाच शेतकºयांची केवळ तीन एकर शेतजमीन आहे. उर्वरित २ हजार ५०० शेतकºयांची १२०० एकर जमीन कंपनीने आधीच विकत घेतली असल्याने ,या पाच शेतकºयांनी दाखल याचिका फेटाळण्यासाठी एमआयडीसीच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयास विनंती केली होती. मात्र शेतकºयांच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयात लढणाºया अ‍ॅड. गायत्री सिंग यांनी या प्रकरणात नक्की किती शेतकरी होरपळले आहेत याची चौकशी करावी. ज्या शेतकºयांच्या जमिनी घेतल्या असे सांगण्यात येत आहे, त्या शेतकºयांनी जमिनीच्या किमतीचे पैसे घेतलेले नाहीत अशी वस्तुस्थिती सर्वोच्च न्यायालयात नमूद केली होती.शेतकरी समाधानीअ‍ॅड. गायत्री सिंग यांनी केलेल्या विनंतीवरून सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन या जमिनींपैकी न विकलेल्या जमिनीच्या मालक शेतकºयांचे म्हणणे जाणून घेण्याचा निर्णय दिला. आणि मंगळवारपासून सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष व्यवस्थेच्या माध्यमातून तीन दिवसांच्या या सुनावणीत ९८० शेतकºयांचे म्हणणे आणि साक्षी नोंदवून घेतल्या जाणार आहेत.भूदान चळवळीचे प्रणेते विनोबाजी भावे यांच्या रायगड जिल्ह्यातील शेतकºयांकरिता सर्वोच्च न्यायालयाने विशेष व्यवस्थेचा निर्णय घेवून सर्व शेतकºयांचे म्हणणे येथेच जाणून घेण्याची व्यवस्था केबद्दल मंगळवारी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शेतकºयांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :RaigadरायगडFarmerशेतकरी