शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

२१ हजार प्रकरणांत ८ कोटी वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:37 IST

राष्ट्रीय लोकअदालत : निपटारा करण्यात रायगड जिल्हा पुन्हा दुसऱ्या स्थानी

अलिबाग : प्रलंबित आणि वादपूर्व प्रकरणांचा निपटारा तत्काळ व्हावा, यासाठी राष्ट्रीय लोकअदालत नुकतीच पार पडली. २१ हजार २९३ प्रकरणांमध्ये तडजोड करून तब्बल आठ कोटी ४८ लाख ४९ हजार ४२७ इतक्या रकमेची पक्षकारांना वसुली करून देण्यात यश आले आहे. सर्वाधिक प्रकरणांचा निपटारा करून रायगड जिल्ह्याने महाराष्ट्रात द्वितीयक्र मांक प्राप्त केला आहे. यातील विशेष बाब म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून रायगड जिल्हा सातत्याने पहिल्या ते तिसºया क्रमांकावर आहे.पार पडलेल्या लोकअदालतीमध्ये भूसंपादन, मोटार अपघात, दिवाणी, कलम १३८ एन.आय. अ‍ॅक्ट, विवाह, तडजोडपात्र फौजदारी खटले, दिवाणी-फौजदारी अपील, सहकार न्यायालय आणि कामगार न्यायालय, बँका, नगरपालिका, ग्रामपंचायतीच्या पाणीपट्टीसंदर्भातील अशी अनेक वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. या लोकअदालतीमध्ये कामकाजाचा वेगाने निपटारा होण्यासाठी एकूण ३९ कक्ष उभारण्यात आले होते. लोक अदालतीमध्ये पाच वर्षांपेक्षा जुनी अशी एकूण ५२ प्रकरणे तसेच जुनी १० ते ३० वर्षे जुनी १२ प्रकरणे निकाली काढण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहिती सचिव रायगड जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश संदीप स्वामी यांनी दिली. तसेच अलिबाग तालुक्यातील मल्याण, उसर, कुणे या गावांतील एमआयडीसीकरिता संपादित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या वाढीव मोबदल्याचा वाद मागील २० वर्षांपासून प्रलंबित होता. हा वाद लोकअदालतीमध्ये सामोपचाराने मिटवून शेतकºयांना वाढीव नुकसानभरपाई मिळवून देण्यात आल्याकडे वरिष्ठ न्यायाधीश स्वामी यांनी स्पष्ट केले.राष्ट्रीयकृत बँका, महावितरण, विमा कंपन्या, भूसंपादन यांचे अधिकारी आणि सर्व पक्षकारांनी तडजोडीमध्ये पुढे येऊन सहभाग नोंदविला.भरघोस प्रतिसादजिल्हाधिकारी कार्यालय, सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, ग्रामपंचायत विभागातील अधिकारी, पदाधिकारी, न्यायिक अधिकारी, जिल्हा विधिज्ञ मंडळ, विधि स्वयंसेवक, न्यायालयीन कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले पुढील लोकअदालतीला असाच भरघोस प्रतिसाद मिळावा, अशी अपेक्षा प्राधिकरणाचे अध्यक्ष तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा इंगळे यांनी व्यक्त केली.मुरुड तालुक्यातील प्रलंबित सहा प्रकरणे निकालीमुरुड : येथील दिवाणी न्यायालयात नुकत्याच आयोजित केलेल्या लोकन्यायालयात प्रलंबित असलेले एक दिवाणी व पाच फौजदारी गुन्हांचा समावेश असलेली प्रकरणे निकाली निघाली. राजपुरी येथील वेलकम पर्यटक संस्था व जंजिरा पर्यटक सहकारी संस्थेमधील वाद विकोपाला जाऊन लोक अदालतीमध्ये हा वाद मिटवला गेला आहे. वेलकम सोसायटीचे चेरमन जावेद कारभारी यांना व्यवसायाच्या वैमनस्यातून पायाला जोरदार दुखापत करण्यात आली होती. सर्व आरोपींवर ३२६ सारखा गंभीर गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला होता. असे असतानासुद्धा जावेद कारभारी यांनी मोठे मन करून लोकअदालतीमध्ये हा वाद मिटवल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. हे प्रकरण सामंजस्यामुळे मिटल्याने राजपुरी मोहल्ल्यातील सामंजस्य व शांतता अबाधित राखली जाणार आहे. राजपुरी ते जंजिरा प्रवेशद्वारापर्यंतची पर्यटक वाहतूक आता निर्विघ्न पार पडणार आहे. वस्तुत: जावेद कारभारी यांना गंभीर जखमी केल्याने १२ ते १३ जणांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केल्यामुळे मोहल्ल्याची शांतता भंग पावली होती. तथापि, लोकन्यायालयाची शिष्टाई कामी आली असून, येथील वाद आता कायमचा मिटला आहे. दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश एम. ए. के. शेख यांनी जावेद कारभारी व इस्माइल अदमाने यांना गुलाब पुष्प देऊन समेट घडवून आणला आहे. मुरुड पंचायत समिती व मुरुड नगरपरिषद यांची थकीत घरपट्टी व पाणीपट्टीची एक कोटी ५० हजार रुपयांची वसूल करण्यात लोकन्यायालयाला यश मिळाले आहे. पंच म्हणून अ‍ॅड. डी. एन. पाटील व अ‍ॅड. मृणाल खोत यांनी कामकाज पाहिले. या वेळी बार असोसिएशनचे अ‍ॅड. संजय जोशी आदी उपस्थित होते.