शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

२१ हजार प्रकरणांत ८ कोटी वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:37 IST

राष्ट्रीय लोकअदालत : निपटारा करण्यात रायगड जिल्हा पुन्हा दुसऱ्या स्थानी

अलिबाग : प्रलंबित आणि वादपूर्व प्रकरणांचा निपटारा तत्काळ व्हावा, यासाठी राष्ट्रीय लोकअदालत नुकतीच पार पडली. २१ हजार २९३ प्रकरणांमध्ये तडजोड करून तब्बल आठ कोटी ४८ लाख ४९ हजार ४२७ इतक्या रकमेची पक्षकारांना वसुली करून देण्यात यश आले आहे. सर्वाधिक प्रकरणांचा निपटारा करून रायगड जिल्ह्याने महाराष्ट्रात द्वितीयक्र मांक प्राप्त केला आहे. यातील विशेष बाब म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून रायगड जिल्हा सातत्याने पहिल्या ते तिसºया क्रमांकावर आहे.पार पडलेल्या लोकअदालतीमध्ये भूसंपादन, मोटार अपघात, दिवाणी, कलम १३८ एन.आय. अ‍ॅक्ट, विवाह, तडजोडपात्र फौजदारी खटले, दिवाणी-फौजदारी अपील, सहकार न्यायालय आणि कामगार न्यायालय, बँका, नगरपालिका, ग्रामपंचायतीच्या पाणीपट्टीसंदर्भातील अशी अनेक वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. या लोकअदालतीमध्ये कामकाजाचा वेगाने निपटारा होण्यासाठी एकूण ३९ कक्ष उभारण्यात आले होते. लोक अदालतीमध्ये पाच वर्षांपेक्षा जुनी अशी एकूण ५२ प्रकरणे तसेच जुनी १० ते ३० वर्षे जुनी १२ प्रकरणे निकाली काढण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहिती सचिव रायगड जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश संदीप स्वामी यांनी दिली. तसेच अलिबाग तालुक्यातील मल्याण, उसर, कुणे या गावांतील एमआयडीसीकरिता संपादित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या वाढीव मोबदल्याचा वाद मागील २० वर्षांपासून प्रलंबित होता. हा वाद लोकअदालतीमध्ये सामोपचाराने मिटवून शेतकºयांना वाढीव नुकसानभरपाई मिळवून देण्यात आल्याकडे वरिष्ठ न्यायाधीश स्वामी यांनी स्पष्ट केले.राष्ट्रीयकृत बँका, महावितरण, विमा कंपन्या, भूसंपादन यांचे अधिकारी आणि सर्व पक्षकारांनी तडजोडीमध्ये पुढे येऊन सहभाग नोंदविला.भरघोस प्रतिसादजिल्हाधिकारी कार्यालय, सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, ग्रामपंचायत विभागातील अधिकारी, पदाधिकारी, न्यायिक अधिकारी, जिल्हा विधिज्ञ मंडळ, विधि स्वयंसेवक, न्यायालयीन कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले पुढील लोकअदालतीला असाच भरघोस प्रतिसाद मिळावा, अशी अपेक्षा प्राधिकरणाचे अध्यक्ष तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा इंगळे यांनी व्यक्त केली.मुरुड तालुक्यातील प्रलंबित सहा प्रकरणे निकालीमुरुड : येथील दिवाणी न्यायालयात नुकत्याच आयोजित केलेल्या लोकन्यायालयात प्रलंबित असलेले एक दिवाणी व पाच फौजदारी गुन्हांचा समावेश असलेली प्रकरणे निकाली निघाली. राजपुरी येथील वेलकम पर्यटक संस्था व जंजिरा पर्यटक सहकारी संस्थेमधील वाद विकोपाला जाऊन लोक अदालतीमध्ये हा वाद मिटवला गेला आहे. वेलकम सोसायटीचे चेरमन जावेद कारभारी यांना व्यवसायाच्या वैमनस्यातून पायाला जोरदार दुखापत करण्यात आली होती. सर्व आरोपींवर ३२६ सारखा गंभीर गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला होता. असे असतानासुद्धा जावेद कारभारी यांनी मोठे मन करून लोकअदालतीमध्ये हा वाद मिटवल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. हे प्रकरण सामंजस्यामुळे मिटल्याने राजपुरी मोहल्ल्यातील सामंजस्य व शांतता अबाधित राखली जाणार आहे. राजपुरी ते जंजिरा प्रवेशद्वारापर्यंतची पर्यटक वाहतूक आता निर्विघ्न पार पडणार आहे. वस्तुत: जावेद कारभारी यांना गंभीर जखमी केल्याने १२ ते १३ जणांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केल्यामुळे मोहल्ल्याची शांतता भंग पावली होती. तथापि, लोकन्यायालयाची शिष्टाई कामी आली असून, येथील वाद आता कायमचा मिटला आहे. दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश एम. ए. के. शेख यांनी जावेद कारभारी व इस्माइल अदमाने यांना गुलाब पुष्प देऊन समेट घडवून आणला आहे. मुरुड पंचायत समिती व मुरुड नगरपरिषद यांची थकीत घरपट्टी व पाणीपट्टीची एक कोटी ५० हजार रुपयांची वसूल करण्यात लोकन्यायालयाला यश मिळाले आहे. पंच म्हणून अ‍ॅड. डी. एन. पाटील व अ‍ॅड. मृणाल खोत यांनी कामकाज पाहिले. या वेळी बार असोसिएशनचे अ‍ॅड. संजय जोशी आदी उपस्थित होते.